Monday 15 December 2014

वात्सल्य, चैतन्य आणि मी…

आज एका वेगळ्या विषयावर Blog  लिहिण्याची संधी मळते आहे… सामाजिक कार्य (social work ) हा काही जणांचा चेष्टेचा विषय असतो आणि काहींच्या तो खूप जवळचा विषय असतो… काहींना वाटत कि एका विशिष्ट वयात हे काम करायचं असत पण माझा मते काहीतरी सामाजिक कार्य करण्यासाठी वयाची नाही तर इच्छेची गरज असते… अनेकांचा असाही गैरसमज असतो कि सामाजिक काम म्हणजे काही पैसे donate करणे म्हणजे सामाजिक कार्य…  माझामते हे पूर्णपणे चूकहि नाही आणि पूर्ण बरोबर हि नाही… सामाजिक काम २  प्रकारे करता येऊ शकत, १ वेळ देऊन आणि २ वेळ नसल्यास आर्थिक मदत करून…


हल्लीच आम्ही ( मी आणि माझ्या चैतन्य group मधल्या सर्वांनी) मुंबईत एका अनाथालयाला भेट दिली… वात्सल्य trust अस नाव त्या संस्थेच… माझ्या  आयुष्यातील एखाद्या अनाथालयाला भेट हि पहिलीच… तिथे जाउन काय करायचं, कोणाला भेटायचं कस वागायचं असे अनके प्रश्न घेऊन (सोबत group सुद्धा घेऊन) आम्ही तिथे पोहोचलो… सकाळी १०:३० वाजता तिथे पोहोचलो, आधी contact केल्या असल्यामुळे  तिथल्या काही लोकांना आम्ही येणार हि कल्पना होतीच… तेव्हा तेथील एका madamनी आम्हाला त्यांचासोबत घेऊन गेले आणि तेथील सर्व काम दाखवल… प्रत्येक वयोगटातील मुलांची खोली (रूम्स ) वेगळ्या होत्या…अगदी नुकत्याच जन्माला आलेल्या लहान  मुलांपासून ते अगदी ८-९ वर्षाच्या मुलांपर्यंतची सोय तिथे होती… नुसती राहण्याची आणि जेवणाचीच नाही तर अगदी त्यांच्या आरोग्याचीही योग्य काळजी तिथे घेत होते… पण वात्सल्य च काम तिथेच सीमित नाही तर त्यांनी मुलींच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक सबलीकरणाकडे वाटचाल सुरु केली आहे… नर्सिंग पासून ते अगदी ग्लास पेंटिंग पर्यंत वर्ग तिथे भरवले जातात आणि मुलींना आर्थिक दृष्ट्या सबळ करण्याच हे एक महत्वाच पाउल आहे… असे बरेच उपक्रम तिथे राबवले जातात…

त्याची माहिती घेत घेत आमचे २ ते ३ तास कसे गेले हे मलाही कळल नाही… मग आम्हाला तिथे वात्सल्यचे trustee सराफ काकांना भेटण्याची संधी मिळाली… आमच्या उपक्रमाच कौतुक तर त्यांनी केलच पण "हे सगळ तुमचच आहे" अस सांगून त्यांनी आपण सर्व एका कुटुंबातील आहोत ह्याची जाणीव करून दिली…

३-४ तासांचा हा एक नवीन अनुभव घेऊन आम्ही तिथून बाहेर आलो ते पुढे काय करायचं ह्या विचारानेच… वात्सल्य visit हि कुठल्याही पिकनिक किंवा ट्रेक पेक्षा एक वेगळा आणि छान अनुभव होता… आजकाल कोणी आपल्या माणसांसाठी कोणी इतक करत नाही तिथे वात्सल्य सारखी संस्था हे चांगल काम करते आहे… माझ वैयक्तिक मत विचारलं तर अनाथाश्रम आणि वृद्धाश्रम ह्यांची गरजच पडू नये…  मी ज्या लहान मुलांना पाहिलं ती तर इतकी गोंडस होती कि त्यांना सोडायची इच्छा त्या आई - वडिलांना तरी कशी होते हा प्रश्न मनात आल्याशिवाय राहत नाही… आपल्या चुकांची शिक्षा त्या लहान मुलांना का द्यावी? असे अनेक प्रश्न नव्याने माझ्यासमोर आले पण वात्सल्य सारख्या संस्था आहेत तो पर्यंत ह्या मुलाचं भविष्य अंधकारमय नाही हे सुद्धा खर आहे…



"वात्सल्य म्हणजे एका आईच आपल्या मुलासाठीच असलेल निस्वार्थी प्रेम…" ह्या मुलांना देखील आईच्या प्रेमाची उब वात्सल्य मध्ये मिळते आहे आणि त्यात आमची मदत होते आहे हे आमच भाग्य आहे… देवाच्या कृपेने हि मदत अशीच सुरु राहील आणि आपली साथ सुद्धा माझ्या ह्या कामात मिळत राहील हि अपेक्षा…

आपला,

प्रथमेश तेंडूलकर

Thursday 11 December 2014

खानाच्या फौजेतील मराठी सरदार…?

आज ह्या विषयावर लिहिण्याचं कारण एकच… काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी          ( आणि विकासासाठी ) २ "मित्र" पक्ष एकत्र आले… विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान हल्ला चढवणारे आज मात्र एकत्र आहेत… तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना आणि अनेक कट्टर समर्थक असलेल्यांच्या भावना पाहताना अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्या समोर मांडण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…

अनेक दिग्गजांनी एकत्र येउन केलेली आणि हिंदुत्व हा समान धागा पकडून असलेली अनेक वर्षांची युती विधानसभेच्या निवडणुकी आधी काही दिवस संपली… युती तुटू नये हि अनेकांची भावना होती कारण पक्षांचे कार्यकर्ते युतीत मानाने एकत्र आले होते… एक भावनिक नात निर्माण झालं होतं… युती का तुटली, कोणामुळे तुटली ह्या वादात मला पडायचं नाही कारण त्याची कारणं अनेक आहेत… युती तुटली आणि मग दोन्ही मित्र (जुने मित्र ) एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे ठाकले… मग आरोप प्रत्यारोपांचे "बाण" सुटले… जुन्या मित्रांची तुलना अफजल खानशी झाली… कालपर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणारे कार्यकर्ते आज मात्र एकमेकांना दोष देत होते… "पाठीत खंजीर खुपसला", "आता मनं तुटली आहेत ती जोडली जातील असा वाटत नाही " अशी अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली… अश्या वातावरणात निवडणूक पार पडली… आणि निवडणुकीचे निकालही लागले…

निवडणुकीचे निकाल लागले आणि चित्र बदलल… निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नव्हत त्यामुळे खानाच्या फौजेला सत्तेसाठी कोणाची तरी गरज लागणार होती… मग भेटी सुरु झाल्या, गुप्त बैठका झाल्या… आज पाठींबा देणार, उद्या नाही अशा अफवा उठायला लागल्या … "आम्ही देऊ ते घ्या " अशा गोष्टी समोर आल्या… त्यात दोन गट पडले, एक होते सत्तेत जाऊ म्हणणारे आणि दुसरे होते ते सत्तेत न जाता आत्मसन्मान न गमावता विरोधात बसू म्हणणारे… पण बराच काळ विचार झाल्यानंतर निर्णय सत्तेत जाण्याचा झाला आणि बरेचसे जुने आणि निष्ठावंत सैनिक नाराज झाले… "गद्दारांना क्षमा नाही… " अस म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांची आठवण आणि कमतरता  त्या निमित्ताने सर्वांना जाणवली…

ह्या घटनेने समर्थकांच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्यांनी मतदान केल त्यांना हा निर्णय फारसा पटला नाही… but Boss is Always Right ह्याप्रमाणे कदाचित नाईलाजास्तव हा निर्णय सर्वांनी हे मान्य केलेला आहे… पण ह्यात सरशी कोणाची झाली आणि कोण हरल ह्यापेक्षा मतदारंच्या भावना राजकारणी लोकांसाठी किती लवचिक असतात ह्याच दर्शन सर्वांना झाल… ह्यात  गोंधळाला तो मात्र मराठी माणूस आणि कट्टर सैनिक…

ह्या नंतर सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात पण अद्यानांत शहाणपण असते अस म्हणून आपल समाधान करून घ्यायचं एवढाच काय ते आपल्या हाती…

एक मराठी माणूस
जय महाराष्ट्र…

(** वरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र त्याबद्दल क्षमस्व...)