tag:blogger.com,1999:blog-16683910333458487582024-02-07T06:13:14.481-08:00प्रथमेश तेंडुलकर Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.comBlogger61125tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-5012810793519453392022-01-24T23:39:00.001-08:002022-01-24T23:39:31.042-08:00"तीचं" येणं हा खरंच "Problem" असतो का...???<div><b><br></b></div><div><b>"तीचं" येणं हा खरंच "Problem" असतो का...???</b></div><div><br></div><div>माझ्या या मथळ्याचा अर्थ कदाचित तुम्हाला पहिल्यांदा वाचल्यावर समजला नसेल. पण हा लेख वाचल्यानंतर मला नक्की काय म्हणायचं होतं हे तुमच्याही लक्षात येईल. आपण एखाद्या गोष्टीला आपल्या आपल्या नजरेतून बघतो आणि त्यानुसार त्याला काय म्हणायचं हे ठरवतो. अनेकदा आपल्या घरातील मोठे, किंवा आजूबाजूचे मोठे त्या गोष्टीला जे म्हणतात तेच आपणही म्हणू लागतो. म्हणजेच काय तर ज्या वयात समज नसते त्या वयात आपल्याला एखाद्या गोष्टीला "अमुक अमुक" म्हणतात हे कळलं की आपण त्याचं अनुकरण करतो आणि पुढे त्या गोष्टीला ते नाव रूढ होतं. आणि हे रूढ झालेलं नाव काही केल्या आपल्या मनातून, विचारातून जात नाही, ते तसंच राहतं, कायमचं.</div><div><br></div><div>ही सगळी झाली प्रस्तावना, आता मूळ मुद्द्यालाच हात घालू. आपल्या शरीराची एक रचना असते आणि काही नैसर्गिक प्रक्रिया असतात. काही नैसर्गिक प्रक्रिया आपल्याला फार "चांगल्या" वाटतात पण काही मात्र आपल्याला "चांगल्या" वाटत नाहीत. त्याबद्दलच्या गैरसमजामुळे असेल म्हणा किंवा लहानपणापासून आपण आपल्या जवळच्या मोठ्या व्यक्तींकडून हे ऐकल्यामुळे म्हणा, पण आपल्यालाही काही प्रक्रिया "चुकीच्या" किंवा कधीकधी "घृणास्पद" वाटू लागतात. वेगवेगळ्या दुर्गम भागात मी <b>2016-17 </b>पासून काम करतो आहे. या भागातील मुली <b>"मासिक पाळी"</b> या विषयाकडे एखाद्या "विटाळ" नजरेने पाहतात. पाळीबद्दल अनेक गैरसमज यांच्या मनात लहानपणापासून रूढ झालेले असतात. बऱ्याचदा ते त्यांच्या घरातील मोठ्यांकडून ऐकलेले असतात किंवा आजूबाजूला पाहून, कोणाचं तरी ऐकून निष्कर्ष काढलेले असतात.</div><div><br></div><div><b>प्रोजेक्ट MAHA</b> च्या माध्यमातून "मासिक पाळी" विषयावर मार्गदर्शन समुपदेशन कार्यशाळा घेताना <b>मासिक पाळीबद्दल माहिती सांगायच्या आधी आम्हाला सामना करावा लागतो तो यांच्या मनातील गैरसमजाशी, विविध अंधश्रद्धेशी आणि मनात घट्ट बसलेल्या "विटाळ" भावनेशी</b>. त्यासाठी आधी त्यांचा विश्वास जिंकणं महत्वाचं असतं आणि मग आपण त्यांची मैत्रीण आहोत हा विश्वास निर्माण करावा लागतो. ज्या विषयावर मुली एक-दोघातही बोलायला कचरतात तो विषय आता सर्वांसमोर बोलला जाणार. बापरे..! किती टेन्शन. मुलींचे शंकान्नी ग्रासलेले चेहरे, हावभाव त्यांच्या मनाची घालमेल स्पष्ट करतात. पण याच मुली नंतर हळूहळू कार्यशाळा enjoy करत बोलू लागतात, शंका विचारतात. <b>एका कळीचं फुललेलं फूल होण्याची प्रक्रिया जशी असते तश्या या मुली हळू हळू खुलतात</b>. हा वर्कशॉप सुरु असताना मी दिपालीला मदत करण्यासाठी तीथेच मागे असतो. आणि यादरम्यान बऱ्याचदा एक शब्द माझ्या कानाला खटकत होता. "<b>Problem</b>". शाळेतल्या मुली त्यांना "Problem" येतो, कधी येतो सांगत होत्या. <b><i>मासिक पाळी हा Problem नाही हे माझ्या मनात घट्ट होतं म्हणूनच की काय माझ्या कानांना "Problem" शब्द खटाकायला लागला.</i></b> पण पाळी येणं याला "Problem" का बरं म्हणतात? हा प्रश्न होताच. नंतर जाणवलं की बऱ्याचदा शिक्षिकाही मासिक पाळीला "Problem" म्हणत होत्या. आत्ता माझ्या लक्षात आलं की <b>आपली ताई, आई, मॅडमच जर याला Problem म्हणत असतील तर या मुलीही त्याला Problemच म्हणणार. कारण मोठ्यांचं ऐकावं, ते बरोबरच असतात, नाही का? पण इथे ते बरोबर नाहीत हे मुलींना सांगणं गरजेचं होतं. कारण मासिक पाळीला Problem म्हटलं की "ती" म्हणजे काहीतरी चुकीचं हे त्यांच्या मनावर घट्ट बसतं.</b></div><div><br></div><div>म्हणून या Workshop च्या शेवटी मी या मुलींशी संवाद साधला. <b>सुरवातीला लाजणाऱ्या मुली नंतर दादा किंवा सर म्हणून उत्तरं देत होत्या. दिपालीने तीचं काम उत्तम केलं होतं आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आत्ता जर यापुढे त्यांना पाळी आली तर त्याला आम्ही Problem म्हणणार नाही, हेही त्यांनी सांगितलं.</b> बदल एका दिवसात घडत नाही. तो हळू हळू आपल्या वागण्यातून, बोलण्यातून घडत असतो. <b>म्हणून जेव्हा आपण "तीचं" येणं हे problem समजायचं बंद करू आणि आपल्या मुलींना हा Problem नाही हे सांगू तेव्हाच मासिक पाळीकडे सर्वांचा बघायचा दृष्टिकोन बदलेल. हा बदल घडवण्यासाठी आम्ही प्रयत्न सुरु केले आहेत, आपणही आमच्यासोबत या.</b></div><div><br></div><div>धन्यवाद,</div><div>प्रथमेश शशिकांत तेंडुलकर</div><div><b>Founder - Chaitanya Social Welfare Foundation</b></div><div><br></div><div>©prathameshtendulkar2022</div><div><br></div><div><b>तळटीप</b> - सदर पोस्ट आवडली तर आपण शेअर करू शकता. Copy-Paste करत असाल तर कृपया पूर्ण पोस्ट Copy-Paste करून शेअर करावी.</div><div><br></div><div><div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjLfZePwkR6XS24WDD5vgGGU5FVb32VQD4Y9RZlUTRz8Jy8KOV98574kiiYMSAYvLqsbH4BvVm6AVs7X9ncllj-OMnEG2Cr4cZchNQM9rGSoSDO2gs2VzaAUEJwvTBqnCGu4ilYr8d5mBA/s1600/1643096364672799-0.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;">
<img border="0" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgjLfZePwkR6XS24WDD5vgGGU5FVb32VQD4Y9RZlUTRz8Jy8KOV98574kiiYMSAYvLqsbH4BvVm6AVs7X9ncllj-OMnEG2Cr4cZchNQM9rGSoSDO2gs2VzaAUEJwvTBqnCGu4ilYr8d5mBA/s1600/1643096364672799-0.png" width="400">
</a>
</div><br></div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-58614155126305942362021-06-12T06:19:00.001-07:002021-06-12T06:19:49.646-07:00World Child Labor Dayच्या निमित्ताने...<div>World Child Labor Dayच्या निमित्ताने</div><div><br></div><div>१२ जून हा जागतिक बालकामगार विरोध दिन. हा दिवस साजरा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय कामगार संघटनेनं 19 वर्षापूर्वी पुढाकार घेतला. 14 वर्षाच्या आतील बालमजूरी संपवणे आणि त्या मुलांना त्यांच्या शिक्षणाचा हक्क मिळवून देणे हा या दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे. बालकांना त्यांचे बालपण मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक संघटना कार्यरत आहेत. आजही जगभरात, विशेषकरुन भारतासारख्या विकसनशील देश आणि इतर मागासलेल्या देशात बालमजुरांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या देशांत बालकामगार विरोधी कायदे झाले असले तरी बालमजुरांच्या संख्येत म्हणावी तितकी घट झाली नाही. त्यावर जगभरात जागरुकता निर्माण करण्यासाठी 12 जून रोजी जागतिक बालकामगार विरोधी दिवस साजरा करण्यात येत आहे.</div><div><br></div><div>मूळात बालकामगार निर्माण का होतात? इथपासून या विषयाचा विचार करण्याची गरज आहे. ज्या वयात चांगलं शिक्षण मिळण्याची गरज असते त्या वयात अनेकदा मेहनतीची कामं या मुलांना करावी लागतात. अशीच एक घटना काही महिन्यांपूर्वी माझ्या समोर आली. दोन विद्यार्थी, एक सहावीला आणि एक आठवीला. काही वर्षांपूर्वी आपले वडील गमावले आणि आई मूक-बधिर असल्याने लहानसहान कामं करायची. त्यातच कोरोनामध्ये त्यांच्या आईचं कामही बंद झालं. लहान असले तरी घरातली परिस्थिती त्यांच्या समोर होती. तीन महिन्याचं घराचं भाडं थकलेलं, घरात पुरेसं रेशन नाही, म्हणून या दोघांनी कामं करायला सुरवात केली. एक हॉटेल मधून चहा वेगवेगळ्या दुकानात नेऊन द्यायचा आणि दुसरा बिल्डींग मध्ये साफसफाई करायचा. त्यातून मिळणाऱ्या पैशातून यांच्या घराला थोडाफार हातभार लागायचा. ही घटना मला त्यांच्या एका शिक्षिकेकडून समजली. सर्वात आधी सर्व शिक्षकांनी मिळून त्यांचं घरभाडे दिले. मग चैतन्यतर्फे त्यांच्या घरी आम्ही किराणा साहित्य घेऊन गेलो होतो, मुलांना भेटलो, त्यांची प्रगती पुस्तकं बघितली. त्यानंतर त्या मुलांचं शैक्षणिक पालकत्व घेण्याचा निर्णय आम्ही घेतला. इयत्ता दहावी पर्यंत दोघांनाही आम्ही चैतन्यच्या माध्यमातून मदत करणारच आहोत पण पुढील शिक्षणासाठीही साहाय्य करणार आहोत.</div><div><br></div><div>ही दोन मुलं म्हणजे एक उदाहरण आहे. मुळात गरिबीचं चक्र तुटायला मदत शिक्षण करतं. वेगवेगळ्या खेड्यात, आदिवासी भागात काम करताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की मुलांचे आई-वडील शिकलेले नसतात, त्यामुळे उत्पन्नाची साधनं मर्यादित आणि त्यामुळेच शिक्षणाबाबतची अनास्था. या सर्वाचा एकत्रित परिणाम होऊन हे पालक आपल्या मुलांना शाळेत पाठवायच्या ऐवजी कामावर घेऊन जातात. तिथे पैसेही मिळतात आणि थोडफार खायलाही मिळतं. पण मुळातच हे चक्र काही संपत नाही. हे चक्र संपवण्यासाठी या मुलांना योग्य शिक्षण मिळणं गरजेचं आहे.</div><div><br></div><div>चैतन्यतर्फे काम करताना आम्ही याच गोष्टींवर विशेष लक्ष देत आहोत. योग्य वयात योग्य शिक्षण मुलांना कसं मिळेल, त्यांना सकस आहार कसा मिळेल, शैक्षणिक सोई सुविधा कशा मिळतील याकडे आम्ही लक्ष देतो. जेणेकरून ही मुलं व्यवस्थित शिकतील आणि त्यांना शिक्षणाचं महत्व पटेल आणि त्यामुळेच त्यांच्या येणाऱ्या पिढीला कामावर घेऊन जायच्याऐवजी ते त्यांना शिकवू शकतील. एकदा हे चक्र तुटलं की बालकामगार कमी होण्यासाठी मदतच होईल.</div><div><br></div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div><div>संस्थापक - चैतन्य सोशल वेलफेअर फाउंडेशन</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-56176866933804206552021-06-12T06:17:00.001-07:002021-06-12T06:17:12.559-07:00On the occasion of World Child Labor Day<p dir="ltr">On the occasion of World Child Labor Day</p>
<p dir="ltr">12 June is World Child Labor Protest Day. The International Labor Organization took the initiative 19 years ago to celebrate this day. The purpose of this day is to end child labor under the age of 14 and give those children their right to education. Many organizations are working nationally and internationally to help children achieve their childhood. Even today, child labor is rampant all over the world, especially in developing countries like India and other backward countries. Although anti-child labor laws have been enacted in these countries, the number of child laborers has not declined significantly. World Anti-Child Labor Day is being celebrated on June 12 to create awareness around the world.</p>
<p dir="ltr"><u>We have to think on the Question of "</u>Why are child laborers <u>created?"</u> At an age when they need to get a good education, these children often have to work hard. A similar incident occurred to me a few months ago. Two students, one was in std. sixth and one was in std. eighth. They lost their father a few years ago, and their mother unable to speak & hear. She lost her job in Covid. Though they are small, the situation at home was in front of them. The rent for the house was exhausted for three months, there was not enough ration in the house, so both of them started working. One would take the tea from the hotel to different shops and the other would clean the building. The money earned from it helped his family a little. One of their teachers told me about this. First of all, all the teachers paid their rent together. Then we took groceries to their house, & then we met the children, saw their progress books. We then decided to take care of those children academically. We are going to help both of them till their SSC & also for further education.</p>
<p dir="ltr">Basically education helps to break the cycle of poverty. In different villages, while working in tribal areas, one thing we realizes that the parents of the children are not educated, so their income are limited and <u>hence its create </u>the apathy towards education. As a result of all this, their parents take their children to work instead of sending them to school. There they get money and some food. But basically this cycle never ends. These children need to get proper education to end this cycle.</p>
<p dir="ltr">These are the things where we are paying special attention to them while working for Chaitanya Social Welfare Foundation. We pay attention to how children get the right education at the right age, how they get a healthy diet, how they get educational facilities. So that these children can learn properly and understand the importance of education and that is why they will educate their children instead of taking them to work for the next generation. Once this cycle is broken it will only help to reduce child labor.</p>
<p dir="ltr">Prathamesh S. Tendulkar</p><p dir="ltr">Founder - Chaitanya Social Welfare Foundation</p>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-18877234295682421282021-05-29T03:00:00.001-07:002021-05-29T03:05:05.555-07:00स्वातंत्र्यवीर...<div>स्वातंत्र्यवीर...</div><div><br></div><div>काल २८ मे, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती. त्याच्या १ दिवसांनंतर ही पोस्ट फेसबूकवर लिहिण्याचं कारण असं विशेष नाही पण काही विरोधी आणि अनेक सावरकर समर्थनार्थ पोस्ट वाचल्या आणि वाटलं उत्तर द्यावं.</div><div><br></div><div>छत्रपति म्हणताच जसे शिवराय आठवतात, लोकमान्य म्हणताच टिळक दिसतात तसेच स्वातंत्र्यवीर, हे नाव घेताच डोळ्यासमोर उभे राहतात ते सावरकर. आद्य क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांनी जी स्वातंत्र्याची मशाल पेटवली त्या मशालीने ब्रिटिशांना होरपळून काढायचं काम सावरकरांनी केले. अखंड हिंदुस्तानचा पुरस्कार करणारे सावरकर हे त्यावेळी देशातील एकमेव नेते होते. हिंदुत्व हा जरी श्वास असला तरी सावरकर विज्ञाननिष्ठ होते आणि हाच फरक आजही अनेक आमच्या लोकांना कळला नाही याचं दुःख आहे. कर्मकांडापेक्षा देशसेवा हा धर्म त्यांनी मानला. "निश्चल देहाकडून देवाकडे जातानाच्या वाटेवर मधे माझा देश येतो, माझी मातृभूमी येते आणि तीची सेवा हाच माझा धर्म" या एका वाक्यातून सावरकर समजतात.</div><div><br></div><div>सावरकर वाचताना अनेक पैलू समोर येतात. मुळातच जहाल मतवादी असलेले सावरकर उत्तम लेखक आणि कवी होते. जहाल वाणी असलेला माणूस कविता पण करू शकतो हे विलक्षण. स्वातंत्र्यदेवतेचे गीत असो वा ने मजसी ने सारखी कविता, प्रत्येक शब्दातून देशभक्ती ओसंडून वाहते. स्वातंत्र्यदेवतेचे गीत ऐकताना अजूनही अंगावर शहरा येतो यातच सर्व येतं. प्रखर हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांना हेही माहीत होतं की देशाची फाळणी झाली तर स्वातंत्र्य मिळणे अवघड होईल. आपल्या लोकांनी कसं एकत्र राहिलं पाहिजे आणि एकजुटीने कसा लढा द्यावा हे त्यांनी लिहिलेल्या पत्रांमधे स्पष्ट होतं. हिंदुत्व म्हणजे धर्मांध नव्हे, हिंदुत्व म्हणजे इतर धर्मांचा तिरस्कार नव्हे हे विचार मांडणारे सावरकर आजच्या लोकांना कळालेच नाहीत. विज्ञानाची कास धरल्या शिवाय पुढे आपली प्रगती होणार नाही हा सिधांत मांडणाऱ्या सावरकरांचे नाव आजचे नेते फक्त राजकारणासाठी घेतात.</div><div><br></div><div>सावरकर म्हटले की आठवते ती जगप्रसिद्ध उडी. पण सावरकर विरोधकांना दिसतात ते माफीनामे. सावरकरांनी तुरुंगातून लिहिलेले माफीनामे. पण आम्हाला वरवर बघायची सवयच आहे म्हणा, त्या मागचं राजकारण आम्ही बघत नाही. पण माफीनामे देऊन सुद्धा सावरकरांनी पुन्हा राजकारणात प्रवेश केला याचाच अर्थ माफीनामे ही एक खेळी होती. शिवरायांनी सुद्धा मस्तवाल अफजलखानाला अनेक पत्रं लिहिली होती ज्यातून शिवाजी महाराज खानाला घाबरले असा संदेश त्यांना द्यायचा होता पण खरंच ते घाबरले होते का? तर नाही. खानाला आपल्या टप्प्यात खेचण्यासाठी खेळलेली ती एक खेळी होती. इतका सारासार विचार करण्याची बौद्धिक क्षमता विरोधकांकडे असेल असे वाटत नाही.</div><div><br></div><div>ऐन तारुण्यात काळ्या पाण्याच्या शिक्षेला सामोरे जाणाऱ्या सावरकरांवर जेव्हा अर्धवट माहितीच्या आधाराने आजचे काही तरूण टीका करतात तेव्हा त्यांना सावरकरांची महती एकाच वाक्यात सांगवी वाटते. गर्लफ्रेंडसाठी कविता करण्याच्या आणि पत्रं लिहिण्याच्या वयात सावरकर देशभक्तीपर कविता लिहीत होते. जेवढं आपलं वय नाही तेवढी वर्ष सावरकरांनी देशासाठी तुरुंगात शिक्षा भोगली आहे. आणि स्वतःला सावरकरवादी म्हणवणार्या माझ्या मित्रांनी एकदा सावरकर वाचून समजून घ्यावे. कारण "स्वातंत्र्यवीर" हे डोक्यावर घेण्याचा विषय नसून डोक्यात घेण्याचा विषय आहे.</div><div><br></div><div>धन्यवाद</div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div><div><br></div><div>#सावरकर #स्वातंत्र्यवीर</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-6255806682263804662021-04-30T23:39:00.001-07:002021-04-30T23:40:13.814-07:00प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा...<div>महाराष्ट्र, 1 मे हा महाराष्ट्र दिन, ज्यादिवशी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मराठी भाषिकांना मिळाला. यासाठी प्रचंड मोठा लढा झाला आणि 105 हुतात्म्यांच्या बलिदानामुळे मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आपल्याला मिळाला.</div><div><br></div><div>महाराष्ट्राला फार जुना इतिहास आहे. एखाद्या राज्याच्या नावातच "राष्ट्र" असं उल्लेख असलेला महाराष्ट्र हे भारतातलं एकमेव राज्य आहे. महाराष्ट्र या शब्दाचाच मुळात अर्थ हा की महान राष्ट्र. महाराष्ट्र म्हणजे असं राज्य की ज्या राज्यात राष्ट्रीयत्व समावण्याची क्षमता आहे. राष्ट्रावर, म्हणजेच हिंदुस्थानावर जेव्हा जेव्हा संकटं आली, परकीय आक्रमकांनी हल्ला केला तेव्हाही महाराष्ट्र सर्वात आधी राष्ट्राच्या संरक्षणार्थ मदतीसाठी गेला. महाराष्ट्राला जसा गौरवशाली इतिहास आहे तशीच साधू संतांची, मराठी साहित्याची मोठी परंपरा आहे. पण महाराष्ट्राला महाराष्ट्र हे नाव कधी रूढ झालं असावं? याचा विचार केला तर इतिहासात फार पूर्वीपासून "महाराष्ट्र" हा शब्द रूढ झाला होता आणि वापरला गेला आहे.</div><div><br></div><div>इसवीसन ५५० ते ७५३ पर्यंत महाराष्ट्रावर चालुक्यांनी राज्य केले. चालूक्योदय काळात “महाराष्ट्र” ही संकल्पना रूढ होत होती. पुढे महाराष्ट्र हाच शब्द रूळला गेला, ते चालुक्यांच्याच नंतरच्या काळातील शिलालेखावरून कळते. इ. स. १००८ मधिल सीताबर्डी येथिल स्तंभात चालूक्य राजा सहावा विक्रमादित्य याचा मांडलिक असेलेला नागपुर प्रांताचा महासामंत स्वतःला “महाराष्ट्रकूट” म्हणवून घेतो. </div><div><br></div><div>इ. स. ६३४, ऐहोळे येथिल लिहिलेल्या/कोरलेल्या शिलालेखात एक श्लोक आहे ज्यात महाराष्ट्र या शब्दाचा उल्लेख येतो.</div><div><br></div><div>“अगदमदधिपतित्वं यो महाराष्ट्रकाणाम्।</div><div>नवनवतिसहस्त्रग्रामभाजां त्रयाणाम्।।" </div><div><br></div><div>अर्थ: चालुक्यांचा राजा दुसरा सत्याश्रय पुलकेशी हा तीनही महाराष्ट्रांचा सार्वभौम राजा झाला.</div><div><br></div><div>या श्लोकावरून दोन गोष्टी कळतात, एक तर महाराष्ट्र हा शब्द तेव्हा प्रचलित होता आणि त्यात तीन खंडमंडळे होती. आता ही तीन खंडमंडळे कोणती तर,</div><div>अपरांत - दंडकारण्य - म्हणजेच आजचे विदर्भ</div><div>कोकण - देश - वऱ्हाड होय.</div><div><br></div><div>याचाच अर्थ हा की मराठी बोलणाऱ्या मराठी भाषिकांच्या राज्याचे "महाराष्ट्र" हे नाव साधारण ३००० वर्षांपासून नैसर्गिकरित्या अस्तित्वात आहे. १ मे १९६० रोजी आपल्या राज्यास भारतीय संघराज्य शासनातर्फे अधिकृत मान्यता मिळाली आणि मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र आम्हाला मिळाला.</div><div><br></div><div>जय महाराष्ट्र.</div><div><br></div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div><div><br></div><div>🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸🔸</div><div><br></div><div>संदर्भ - मराठी आमुची मायबोली.</div><div><br></div><div>#महाराष्ट्र #महाराष्ट्रदिन #मराठी</div><div><br></div><div>©prathameshtendulkar2021</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-90309924852942906902021-04-24T00:20:00.001-07:002021-04-24T00:20:46.034-07:00"तेंडुलकर" नावाचा ब्रँड<div>"तेंडुलकर" नावाचा ब्रँड</div><div><br></div><div>सचिन तेंडुलकर, हे एक नाव नाही, हा एक ब्रॅंड आहे. माझ्या लहानपणी एखाद्याच नाव सचिन असेल आणि त्याला क्रिकेटची आवड असेल तर त्याला आमच्या Areaचा सचिन तेंडुलकर ह्या नावाने गौरवले जायचे. योगायोगाने माझ अडनाव सुद्धा तेंडुलकर असल्याने शाळेत असो वा कॉलेजमधे सगळीकडे Center of Attraction चा विषय असायचा. मग सचिन तुझा कोण रे? नातेवाईक का? असे अनेक प्रश्न विचारले जायचे. त्याची एक सवयच लागली नंतर मला. किंबहुना सचिनशी माझ नाव कोणत्यातरी कारणाने जोडलं जातंय या विचारानेच आपली "कॉलर टाईट" असायची.</div><div><br></div><div>अस म्हणतात की, "भारतात क्रिकेट हा जर धर्म असेल तर सचिन हा त्या धर्माचा देव आहे." माझे आई-वडील सुनील गावस्कर, कपिल देव, चेतन शर्मा, दिलीप वेँगसरकर "ह्यांना आम्ही खेळताना पाहिले" असं अभिमानाने सांगतात पण आम्ही गर्वाने सांगतो की, "आम्ही सचिनला खेळताना पाहिलं आहे." जेव्हापासून क्रिकेट हा खेळ समजायला लागला तेव्हापासून मी सचिनला खेळताना पाहिलंय. परिस्थिती कुठलीही असो, भारत जिंकणार याची एकमेव आशा म्हणजे सचिन. सचिन आउट झाला आणि वाटायच की,"गेली मॅच अता." सचिन बाद झाला की मग टीव्ही पटापट बंद व्हायचे कारण आता कोणाचा खेळ बघायचा? बघण्यासाठी उरलंच काय? हा प्रश्न नेहमी पडायचा. काय जादू होती ह्या माणसात काय माहीत पण त्याचा खेळ बघताना मजा यायची. सचिन आउट झाला की वाटायच आपणच हरलोय. सचिन ने शतक केलं की वाटायचं आपणच काहीतरी मोठ केलंय. त्याच्या बॅट मधून निघालेला प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकार म्हणजे आम्हा सचिनवेड्या लोकांसाठी पर्वणीच असायची. सचिनची प्रत्येक खेळी ही प्रत्येक क्रिकेट रसिकासाठी पर्वणी होती. एकदा वसीम अक्रमने एका मुलाखतीत म्हटलं की, "सचिनचं मैदानावरचं असणं हेच विरोधी संघाला भीतीदायक वाटायचं". हे वाक्य वाचताना मला सचिन महाभारतातल्या श्रीकृष्णासारखा वाटतो. म्हणजे कौरावांकडे लाखाची सेना आणि पांडवसैन्यात एकटा श्रीकृष्ण. सचिन शेवटपर्यंत मैदानावर असेल तर आपण नक्की जिंकू अशी आशा प्रत्येकाला असायची आणि विरोधी संघाला हरण्याची भीती. कधीकधी एखादा आजारी माणूस जर मरणासन्न अवस्थेत असेल तर डॉक्टर सुद्धा बोलतात की हे आता देवाच्या हाती आहे तसंच आमची मॅच हरायला आली की यातून फक्त सचिनच मॅच वाचवू शकतो, अशी काही प्रमाणात वेडी आशा आम्हाला असायची.</div><div><br></div><div>सचिनचा फक्त खेळच उत्कृष्ट होता असं नाही. त्याचं वागणं, बोलणं, त्याच्या नम्र आणि शांत स्वभावाने त्याने त्याच्या विरोधकांना सुद्धा जिंकलं होत. आपण अनेकदा बघितलं आहे की अनेक दिग्गज पंचांच्या चुकीच्या निर्णयावर भर मैदानात चिडले आहेत. कोहली पासून ते कॅप्टन कूल धोनी सुद्धा पंचांसोबत भिडला. पण चुकीच्या निर्णयांचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो सचिनला. तब्बल ३९ वेळा सचिनला चुकीच्या निर्णयांचा फटका बसला. शतकाच्या उंबरठ्यावर असताना जेव्हा एखाद्या चुकीच्या निर्णयामुळे आपल्याला माघारी यावं लागतं तेव्हा काय वाटतं हे एखादा मनापासून क्रिकेट खेळणाराच सांगू शकतो. पण अनेकदा असं होऊनसुद्धा पंचांच्या निर्णयाचा आदर करत सचिनने ते सर्व निर्णय मान्य केले. यावरूनच कळतं की सचिन किती शांत असेल. एकदा ब्रेट लीच्या (ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज) गोलंदाजीवर ब्रेट ली कडून चुकून एक बॉल हातातून निसटून जोरात सचिनच्या खांद्यावर आदळला. चूक सचिनची नव्हती, चुकून तो बॉल निसटून सचिनला लागला. असं वाटलं की सचिन आता ब्रेट लीला रागात बोलतो की काय, पण पुढच्याच क्षणाला सचिनने ब्रेट ली सोबत हात मिळवला आणि खेळ पुन्हा सुरु झाला. त्याच्या शांत असण्याचं यापेक्षा वेगळं उदाहरण नको सांगायला.</div><div><br></div><div>माणूस म्हणून जन्माला आलेल्या व्यक्तीला देवपण सहज मिळत नाही, ते मिळवावं लागतं. सचिनने ते आपल्या कर्तुत्वाने मिळवले आहे आणि ही काही सामान्य गोष्ट नव्हे. मला सामाजिक विषयाकडे आकर्षित करणारा एकमेव व्यक्ती म्हणजे सचिन. कॉलेजमध्ये असताना सतत कानावर यायचं की सचिन इतक्या गरीब मुलांचा शिक्षणाचा खर्च करतो, सचिन इतर काही सामाजिक कामं करतो, तेव्हा त्याच्यासारखं काहीतरी काम आपणही करावं अशी इच्छा मनात ठेऊन मी या क्षेत्रात उतरलो. आज सामाजिक क्षेत्रात कामं करणाऱ्या ज्या व्यक्तींना मी आदर्श मानतो त्यात सचिन एक आहे. मैदानावर संघ अडचणीत असताना मदतीला धावून जाणारा सचिन वैयक्तिक आयुष्यातसुद्धा अनेक गरजूंच्या मदतीला धावून गेला आहे. गरीब मुलांच्या शिक्षणापासून ते एखाद्या गावात वीज नेण्यासाठी सचिन नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे.</div><div><br></div><div>पण हे देवपण मिळताना अनेक कठीण प्रसंगांतून सचिन जाऊन आला. स्वतःचे वडील वारले असताना सुद्धा जो व्यक्ती वर्ल्डकप मधे सेंचुरी करून भारताला पुढे नेऊ शकतो ह्यातून त्याची त्याच्या खेळाविषयीची श्रद्धा दिसते. कुठल्याच आलोचकाला तोंडाने उत्तर न देता आपल्या खेळाने उत्तर देणाऱ्या सचिनचा आदर्श सर्वांनी घ्यावा असा आहे. स्वभावात नम्रता आणि खेळातील प्रामाणिकपणा ह्या सचिनच्या जमेच्या बाजू. आणि कोणत्याही प्रसंगात चेहऱ्यावर स्मितहास्य ही तर सचिनची खासियत. कुठलाही गाजावाजा न करता अनेक गरीबांना मदत करणारा, सामाजिक कार्यात अग्रस्थानी असणारा सचिन हा प्रत्येकासाठी आदर्शच म्हणावा असा आहे.</div><div><br></div><div>करोडो लोकांच्या अपेक्षा खांद्यावर घेऊन देशासाठी खेळत राहणं, त्यात प्रत्येकाला सेंच्युरीने आनंद द्यायचा आणि त्याचं प्रत्येक आउट होणं करोडो लोकांच्या मनाला चटका लाऊन जायचं. आजकाल लोक स्वतःच स्वतःला अनेक उपाधी लावून घेतात पण लोकांनी देवपण बहाल केलेल्या आमच्या लाडक्या क्रिकेटच्या देवाचा आज वाढदिवस, वाढदिवसाच्या सचिनला खूप शुभेच्छा.</div><div><br></div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div><div><br></div><div>#sachintendulkar</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-34012855812460721482020-07-13T00:28:00.001-07:002020-07-13T00:28:30.816-07:00पावनखिंडीतील रणसंग्राम...!!!<div>पावनखिंड...! ! ! </div><div><br></div><div>लहानपणी इतिहासाच्या पुस्तकात हे एक चित्र पाहीलं होतं आणि पावनखिंडीतील पराक्रम वाचला होता. "लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे" या वाक्याचा अर्थ हळू हळू समजत गेला. १३ जुलै १६६०, मराठ्यांच्या जाज्वल्य पराक्रमाचा दिवस, बलिदान दिवस. अफाट शत्रू विरुद्ध मूठभर मराठे. कसे लढले असतील? कुठे झालेली ही लढाई? का झाली? यासाठी थोडी आधीची माहिती घेऊया.</div><div><br></div><div>महाराजांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखान मारला आणि अखंड हिंदुस्थानात परकीय आक्रमकांना धक्का बसला. अफजलखान मारणं ही अशक्य गोष्ट जी शिवरायांनी शक्य केली. आदिलशाही सलतनतीला हा जबरदस्त धक्का होता. महम्मद आदिलशहाच्या मृत्यू नंतर त्याचा वारीस अली आदिलशहा गादीवर बसला आणि आदिलशाही राजकारणाची सूत्रे बडी बेगम (आदिलशहाची बेगम) हीच्याकडे गेली. आणि अफजल मारल्यानंतर शिवाजी महाराजांचा पाडाव करण्यासाठी तीने कर्नूलचा किल्लेदार सिद्दी जौहरची नेमणूक केली, सोबत बापाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी उतावळा झालेला फाजल खान (अफजल खानाचा मुलगा) दिला. प्रचंड सैन्य (साधारण चाळीस हजार), तोफा, संपत्ती घेऊन सिद्दी स्वराज्याकडे निघाला. त्यातच औरंगजेबाने त्याचा मामा शास्ताखानाला स्वराज्यात धाडले. स्वराज्यावर दुहेरी संकट होते. त्यामुळे सिद्दीच्या फौजा स्वराज्यात घुसू नयेत म्हणून स्वराज्याचा कारभार आऊसाहेबांकडे (जिजाऊमातांकडे) सोपवून राजे पन्हाळ्यावर गेले. सिद्दीला वाटले की महाराज घाबरून पळत आहेत पण स्वराज्याचे कमीतकमी नुकसान व्हावे म्हणून सिद्दीला पन्हाळ्यावर खेचण्यासाठी शिवाजी महाराजांनी केलेली ही खेळी होती.</div><div><br></div><div>भर उन्हात सिद्दीने पन्हाळ्याला वेढा दिला. एका बाजूला सिद्दी जौहरचा पन्हाळ्याच्या पायथ्याला पडलेला कडक वेढा, विशाळगडाला सूर्व्यांचा वेढा आणि दुसरीकडे स्वराज्यावर चाल करून आलेला शास्ताखान. दुहेरी संकटात सापडलेलं स्वराज्य आणि छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यात अडकले होते. वेढा फोडण्याचे अनेक प्रयत्न झाले, खासे सरसेनापती नेतोजी (नेताजी नाही) पालकर पराभूत झाले. पुढे जोरदार पाऊस सुरु झाला. सर्वांना वाटलं की पावसात वेढा कमकुवत होईल, दारू-गोळा भिजेल आणि मग हल्ला करून निसटता येईल. पण सिद्दी तयारीचा योद्धा होता. भर पावसातही सिद्दीचा वेढा जरासुद्धा हलला नाही. आता जास्त काळ महाराज गडावर थांबू शकत नव्हते कारण शास्ताखानाचाही बंदोबस्त करायचा होता. तेव्हा महाराजांनी शत्रूला गाफील ठेऊन वेढ्यातून निसटण्याचे ठरवले. तहाची बोलणी चालू झाली. आणि 12 जुलैच्या रात्री (गुरुपौर्णिमेच्या रात्री)आषाढ पौर्णिमेच्या रात्री राजे निवडक मावळ्यांना घेऊन वेढ्यातून निसटले. एका बाजूला शिवा काशीद महाराजांचे रूप घेऊन मसाईच्या पठाराकडे निघाले. सीद्दीला फसवण्याची एक खेळी होती. इतक्यात घात झाला, सिद्दीच्या नजरबाजांनी पालखी पाहिली आणि ते थेट सिद्दीकडे आले. शिवा काशीदला पकडून ठार करण्यात आले. स्वराज्यसाठी शिवा काशीद यांनी बलिदान दिले. पण सिद्दी चिडला आणि सिद्दी मसूद, फाजल खान आणि सोबत काही हजार हाशम शिवरायांच्या पाठीवर निघाले. इथून खरी झुंज सुरू झाली.</div><div><br></div><div>रानावनातून वाट काढत सकाळी सर्वजण गजापूरच्या खिंडीजवळ पोहोचले. आणि मागून येणारा शत्रू नजरेच्या टप्प्यात आला. प्रत्येकजण शिर तळहातावर घेऊन धावत होते पण इथे कडवी झुंज द्यावी लागणार होती कारण गनीम हजारोंच्या संख्येने आणि ताज्या दमाचा होता आणि इथे आपले मावळे रात्रभर धावून दमलेले आणि कमी संख्येने होते. अशावेळी राजे सुखरूप विशाळगडावर पोहोचावेत यासाठी सगळे सज्ज झाले. लाख मेले तरी चालेल पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे म्हणून सर्वांनी शिवरायांना अर्धे मावळे घेऊन विशाळगड गाठण्यास सांगितले, तोपर्यंत एकही गनिम घोडखिंड पार करणार नाही या वचनाशी सर्व कटिबद्ध झाले. राजांना मुजरा केला, अर्धे मावळे घेऊन राजे विशाळगडाकडे गेले आणि बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, कित्येक बांदल आणि मावळे गनिम अंगावर घायला सज्ज झाले. लक्षात घेण्यासारखी गोष्ट ही होती की पन्हाळगड ते घोडखिंड हे अंतर भर पावसात, चिखलात धावत पार करून हे सर्व लढायला सज्ज होते. त्या सैन्याचे नेतृत्व स्वतः बाजीप्रभू करत होते. बाजी छातीचा कोट करून शत्रूसमोर उभे राहीले. टप्प्याटप्प्यावर एक एक छोटं पथक ठेवलं. दांडपट्टा, तलवार, भाले, दगड जे मिळेल ते घेऊन शत्रूवर तुटून पडायचं. सकाळी सुरु झालेली झुंज दुपारपर्यंत सुरु होती. प्रत्येक मावळ्यांच्या अंगावर वार व्हायलाच जागा नव्हती. रक्ताळलेलं शरीर पण ऊर्जा मात्र छत्रपती होते म्हणून कसलंच भान मावळ्यांना नव्हतं. सर्वांनी मिळून शत्रूला अशी काही झुंज दिली की एक गनिम घोडखिंडीतून पुढे सरकू शकला नाही.</div><div><br></div><div>इकडे राजांनी सुर्वेन्चा वेढा फोडला, राजे गडावर जायला निघाले, पोहोचले आणि लगेचच राजांनी वर पोहोचताच तोफांचे ३ बार उडवण्याचा आदेश दिला. तीन बार झाले, तीन तोफा धडाडल्या आणि राजे सुखरूप गडावर पोचले हे बाजींना समजलं. चोख कामगिरी बजावणारे बाजी धारातीर्थी पडले. या युद्धात बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीद आणि कित्येक बांदल, मावळे धारातीर्थी पडले.</div><div><br></div><div>आता पावनखिंडीजवळ मोठे स्मारक उभं केलंय. मुख्य रस्त्यावरून खाली पन्नास एक पायऱ्या उतरून गेलं की एका छोटय़ाशा ओढय़ावर असलेला पूल ओलांडावा लागतो. पायऱ्या उतरताना खाली नजरेसमोर पसरलेली दाट झाडी. कल्पनासुद्धा मनाला शिवत नाही की खाली काही असेल. पण तो छोटासा पूल ओलांडला की अचानक उजवीकडे ढाल-तलवार अन् भगवा झेंडा असं स्मारक सामोरं येतं. इथून पुढे सुरू होते पावनखिंड. </div><div><br></div><div>हे सारे वाचताना तो इतिहास अंगावर काटा उभा करतो. त्या भयाण रात्री, कोसळत्या पावसात, इतकं अंतर धावून पार केलेलं आणि अशा परिस्थितीत ती मंडळी कुठल्या निष्ठेने लढली असतील असे वाटू लागते. निष्ठा एकच, ऊर्जा एकच, छत्रपती. त्यांच्या निष्ठेपुढे नतमस्तक व्हायला होते. मृत्यू पाठीवर असताना केवळ आपल्या राजासाठी, स्वराज्यासाठी अग्निकुंडात देहार्पण करण्यास आसुसलेले ते बाजीप्रभू, फुलाजी प्रभू, शिवा काशीद आणि कित्येक बांदल, त्यांची स्वराज्यनिष्ठा आणि स्वामीनिष्ठा अलौकिकच म्हणावी लागेल. कुठे सत्तेसाठी भावांचे रक्त आणि वडिलांचे प्राण याचाही विचार न करणारा औरंगजेब आणि आपले राजे सुखरूप गडावर पोहोचावेत म्हणून स्वतः वीरमरण पत्करणारे हे वीर. आजही तो प्रसंग वाचनात आला तरी अंगावर काटा उभा राहतो. आम्ही हॉलिवूड मुव्ही '300' मोठ्या आवडीने पाहतो पण घोडखिंडीत 300 मावळ्यांनी लढलेली लढाई आपण जाणून घ्यायचं प्रयत्न पण करत नाही म्हणून हा छोटासा प्रयत्न तुमच्यासाठी.</div><div><br></div><div>नरवीर बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू,शिवा काशिद, बांदलसेना व ज्ञात अज्ञात वीरांना विनम्र अभिवादन 🙏</div><div><br></div><div>जय भवानी, जय शिवराय...</div><div>ऊर्जा छत्रपती...</div><div><br></div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-43224987488660939572020-02-01T18:00:00.001-08:002020-02-01T18:00:51.627-08:00महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..<div>महापराक्रमी म्हाळोजीबाबा घोरपडे..</div><div><br></div><div>मूकर्रब खानाची फौज संगमेश्वराच्या वेशीला उभी होती. शंभूराजे संगमेश्वरी होते आणि या शिवपुत्राच्या घास घ्यायला पिसाळलेले मुघल संगमेश्वरी येउन पोहोचले. पण शंभूराजांच्या आधीच मूकर्रब खानाचा सामना झाला तो सरलष्कर म्हाळोजीबाबांशी. "ये बुढा, हमारा क्या बिगाडेगा" या गैरसमजात असलेला मूकर्रब खान आणि त्याची फौज मराठ्यांवर तुटून पडली. एकच जयघोष झाला, दीन दीन शब्दाला "हर हर, महादेव"गर्जना भिडली. खणखणल्या भाले, तलवार. आणि एक मराठा हजारोंच्या गनिमांवर भारी पडत होता. रक्ताचा चिखल झालेला, मांसाचे तुकडे पडलेले, प्रेतांचा खच पडला पण म्हाळोजीबाबा लढतच होते, गनीम कापत होते.</div><div><br></div><div>इतकं शौर्य मूकर्रब खानाने बघून तो बोलला, "पहिले इस बुढे को लगाम डालो". असं म्हणताच गनिमाने म्हालोजींना घेरलं, चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूप्रमाणे म्हाळोजीबाबा लढत होते. मूकर्रब खानाने एक नेमबाज बोलावला. एक बाण म्हाळोजीबाबांच्या दंडात घुसला आणि तलवार खाली पडली आणि पुढचा बाण कंठात घुसून म्हाळोजीबाबा गुढग्यावर बसले. वाघ जखमी झाला हे बघून गनीम म्हालोजींवर तुटून पडला आणि 1 फेब्रुवारी 1689साली म्हाळोजीबाबा पडले.</div><div><br></div><div>स्वराज्यासाठी, शंभूराजांसाठी जीव ओवाळून टाकणारे मावळे हीच स्वराज्याची दौलत होती. पैशासाठी, वतनासाठी फितूर होणारे अनेक होते पण लाखांचा पोशिंदा जगावा म्हणून लढणारे म्हाळोजीबाबा स्वराज्याची खरी दौलत होती. 331व्या पुण्यतिथीनिमित्ताने म्हाळोजीबाबांना विनम्र श्रद्धांजली.</div><div><br></div><div>जय शिवराय.</div><div><br></div><div>प्रथमेश श. तेंडुलकर</div>Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-52128538056344348992019-08-28T11:25:00.003-07:002019-08-28T11:37:59.026-07:00मंतरलेले दिवस<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
<b>25 ऑगस्ट 2019</b>ला आम्ही सांगली विभागातील एका गावाला (पूरग्रस्त गावाला) मदत देऊन आलो. या लेखातून गेल्या 15 दिवसांचा माझा अनुभव मांडणार आहे. मदत करताना आणि त्याआधीचे सर्व अनुभव या लेखातून मांडणार आहे. म्हणून हा लेख कदाचित थोडा मोठा, दोन टप्प्यात होईल. कसा आहे ते नक्की कळवावे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
बऱ्याच दिवसांपासून महाराष्ट्रात आलेल्या पुराच्या बातम्या पाहत होतो, त्याने झालेलं नुकसान पाहत होतो. पण काही कारणाने चैतन्यतर्फे हा उपक्रम करावा असा विचार नव्हता. इतकं मोठं नुकसान आणि आपली मदत कोणापर्यंत आणि किती पुरी पडणार याचा काहीच अंदाज नव्हता. 7 ऑगस्टला संध्याकाळी बातम्यांमध्ये पुराची बातमी पाहिली आणि तिथली एकूण परिस्थिती बघून कोणाचं मन हेलावलं नसेल असा माणूस कदाचित दुर्मिळ असेल. म्हणून हा उपक्रम थोड्या प्रमाणात का होईना पण करायचाच असं ठरवलं आणि 8 ऑगस्ट 2019ला आमच्या कमिटीमधील सदस्यांना कल्पना देऊन या उपक्रमाची तयारी सुरु केली केली. सर्वात महत्वाचे होते की नक्की मदत कुठे करायची? सांगली कोल्हापूर सारखाच एक पूर कोकण विभागात आला होता. दुसरा प्रश्न हा होता की स्थानिक पातळीवर योग्य मार्गदर्शन कोण करेल? हे पहिले दोन महत्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी सर्वात आधी मी माझ्या संपर्कांत असलेल्यांपैकी काही विश्वासू व्यक्तींना (सांगली, कोल्हापूर आणि कोकण विभागातील) संपर्क केला. त्यांच्याशी बोलल्यानंतर अजून एक समजलं की सांगली कोल्हापूर विभागातील पुराचे प्रमाण आणि त्यातून झालेले नुकसान सर्वात जास्त होते. आणि त्यातच <b>डॉ. महेशकुमार ढाणे </b>सरांची ओळख झाली. त्यांनी सांगली विभागातील लोकांना नक्की कोणत्या गोष्टीची गरज आहे, काय करावं लागेल याची सर्व माहिती दिली. "तुम्ही इथलं माझ्यावर सोडा, आपण नक्की काहीतरी चांगलं करू" असं म्हणणारे डॉक्टर ढाणे सांगलीच्या भिलवडी आणि भुवनेश्वरवाडीच्या लोकांसाठी देवदूतापेक्षा कमी नव्हते. अशी सर्व तयारी झाल्यावर 9 ऑगस्ट 2019 पासून या उपक्रमाची सुरवात झाली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सुरवातीला आम्ही सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर जमा करण्याकडे भर दिला. लोकांनी सुद्धा भरभरून सपोर्ट केला. लोकांचा चैतन्यवरील विश्वास पाहून हा उपक्रम नक्की पूर्ण होईल हा आत्मविश्वास आला. एका मित्राची बोलकी प्रतिक्रिया होती. त्याने त्याचं नावं गोपनीय ठेवावं म्हणून सांगितलं म्हणून ते इथे लिहीत नाही पण तो म्हणाला की, <b><i>"मला मदत करायची होती पण कशी करू आणि कुठे करू हेच समजत नव्हतं. तुझी पोस्ट वाचली आणि मार्ग सापडला. तुम्ही योग्य ठिकाणीच मदतीचं वाटप कराल ही खात्री आहे."</i></b> लोकांचा आपल्यावर किती विश्वास आहे याचं हे उदाहरण होतं. सॅनिटरी नॅपकिन आणि ORS पावडर यांची गरज पूर्ण होते न होते तोच डॉ. ढाणे यांनी एका गावाची माहिती दिली. <b>भुवनेश्वरी देवीच्या</b> मंदिराला लागूनच वसलेलं गाव, भुवनेश्वर वाडी. साधारण 70 कुटुंबांचं हे गाव. या सर्वांना शक्य तेवढी मदत पोहोचवायचं आम्ही ठरवलं आणि डॉक्टरांकडून मिळालेल्या माहिती नुसार सामान आणि सामानासाठी लागणारे पैसे जमा करण्यासाठी सुरवात झाली. या मदतीत <b>प्रत्येक कुटुंबाला एक फॅमिली पॅक द्यायचा ठरला ज्यात काही दिवस पुरेल इतकं अन्नधान्य, ब्लॅंकेट, चटई, लहान मुलांचे डायपर्स, ORS पावडर, रोजच्या वापरातल्या वस्तू, महिलांना साड्या, सॅनिटरी नॅपकिन अश्या वस्तू देण्यात आल्या. सोबतच प्रत्येक कुटुंबातील लहान मुलांना शाळेसाठी दप्तरासकट शालेय साहित्य देण्यात आले. </b><i><u>एका कुटुंबाला मदत करताना घरातील मुलांचं शिक्षण मागे पडू नये म्हणून केलेला हा एक प्रयत्न होता.</u></i></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
खरंतर चैतन्यतर्फे अश्या अस्मानी संकटात सापडलेल्यांना मदत करायची ही पहिलीच वेळ. त्यामुळे मदत कशी जमवायची हा एक खूप मोठा प्रश्न होता. पण चांगल्या कामासाठी अनेक हात आपोआप जोडत जातात तसेच हात आमच्या सोबत जोडले गेले. आणि 70 कुटुंबांना करायची मदत हळू हळू जमा झाली आणि वाटायची तारीख ठरली <b>25 ऑगस्ट 2019</b>. पण खरं आव्हान तर पुढे होतं. सर्व सामान तर जमा झालेलं पण त्याचं व्यवस्थित पॅकिंग करणं बाकी होतं, फॅमिली पॅक करायचे होते आणि असं बरंच काम होतं आणि तेही लवकरात लवकर करायचं होतं. अशावेळी चैतन्यच्या तीन मुली स्वतःहून पुढे आल्या आणि त्यांनी हे सर्व काम हाती घेतलं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी सर्व सामान जमा केलं. स्नेहालीने 70 शालेय साहित्याचे पॅकिंग केलं. <b>पूजा, स्नेहाली आणि दिपाली</b>ने मिळून सर्व फॅमिली पॅक तयार केले. 14 तारखेपासून ते 24 तारखेपर्यंत स्वतःचा जॉब सांभाळून, घरची कामं सांभाळून रात्री 12-1 वाजेपर्यंत जागून आम्ही चौघांनी हे सर्व पॅक तयार केले. पॅक तयार होईपर्यंत कोणालाच भूक, झोप आठवत नव्हती. <i><u>स्वतःसाठी प्रत्येकजण करतो पण हे दुसऱ्यासाठी करत होते हे विशेष.</u></i> यांच्यासोबत विशेष कौतुक करावं ते यांच्या सर्व कुटुंबातील सदस्यांचं. स्नेहाली आणि पूजाच्या घरी बरंच सामान उतरवलं तरी त्यांच्या सदस्यांनी यासाठी मदत केली, कुठलीही तक्रार न करता. उलट स्नेहालीच्या घरी पॅकिंग करताना खायला काय हवं नको ते सुद्धा तीची आई बघत होती. चांगलं काम करताना माणूस एकटा नसतो हेच खरं. इतकी मेहनत घेतल्यावर काम पूर्ण झालंच पाहिजे होतं आणि ते आम्ही केलंच. 9 तारखेपासून 24 तारखेपर्यंतचे हे दिवस आमच्यासाठी मंतरलेले होते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत एकच विषय डोक्यात, "बाकी वस्तू कश्या जमवायच्या इ.". सुरवातीला आम्ही हे सामान टेम्पो मधून पाठवणार होतो पण प्रत्यक्ष हा अनुभव घ्यायचा होता म्हणून आम्ही ठरल्या प्रमाणे 24-25 तारखेच्या रात्री 12 वाजता हा प्रवास सुरु केला, तो प्रवास आणि सांगलीतील अनुभव पुढील लेखात मांडणार आहे. नक्की वाचा.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रथमेश श. तेंडुलकर</div>
<div style="text-align: justify;">
Mob. N0. - 9869371580</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b>*सामानाचे पॅकिंग करतानाचे आणि इतर फोटो सोबत जोडत आहे</b></div>
<div style="text-align: justify;">
<b><br /></b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTzHe7UUigB27dQhWYeLtbs1QoXBbrP8_m1rvW41F49hO-o4KEF_QmE-1ad4ZV_iTq5eQGu9lAbWk5UgqXaVk27wZOy17KaoFLBZltB4P2UFSHMoBKGRYbGAEFsq2bZg5COpCSohDv4_11/s1600/IMG-20190820-WA0030-01.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="960" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiTzHe7UUigB27dQhWYeLtbs1QoXBbrP8_m1rvW41F49hO-o4KEF_QmE-1ad4ZV_iTq5eQGu9lAbWk5UgqXaVk27wZOy17KaoFLBZltB4P2UFSHMoBKGRYbGAEFsq2bZg5COpCSohDv4_11/s320/IMG-20190820-WA0030-01.jpeg" width="240" /></a></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: center;">
<b>पूजाच्या घरी उतरवलेलं सर्व अन्नधान्य, चटई, ब्लॅंकेट आणि इतर सामान</b></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhC9ehyphenhyphen1H78tQ60Gu91n5DkHrbBuGr0-UAcNj37UdehECvRNdHyQ0wECcnTRPZGmiBLEVaphtUNmxajX7t6YdYqdseqRQYgCH2v7dMZEV9ofv0df-WAdIGZyuT9fMpoXw1OqqRAW_N5TjaM/s1600/IMG-20190824-WA0025-01.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="780" data-original-width="1040" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhC9ehyphenhyphen1H78tQ60Gu91n5DkHrbBuGr0-UAcNj37UdehECvRNdHyQ0wECcnTRPZGmiBLEVaphtUNmxajX7t6YdYqdseqRQYgCH2v7dMZEV9ofv0df-WAdIGZyuT9fMpoXw1OqqRAW_N5TjaM/s320/IMG-20190824-WA0025-01.jpeg" width="320" /></a></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: center;">
<b>स्नेहालीच्या घरी जमा केलेलं "शैक्षणिक साहित्य"</b></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtiOnqb2H9oEzSAlCqrqmib4VcoqSqfzi7fU3XZZK3Xbz1RjNJ2VCbvtybcsq7390M-xzYug7ctyPX0fB2BaZxNfG3qjsNSqQ8BlgoZhtiD_mH_RdRHV5OUmxIb2AwZjo8IjlS2_qKRDTc/s1600/IMG_20190823_173008-01.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="240" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhtiOnqb2H9oEzSAlCqrqmib4VcoqSqfzi7fU3XZZK3Xbz1RjNJ2VCbvtybcsq7390M-xzYug7ctyPX0fB2BaZxNfG3qjsNSqQ8BlgoZhtiD_mH_RdRHV5OUmxIb2AwZjo8IjlS2_qKRDTc/s320/IMG_20190823_173008-01.jpeg" width="320" /></a></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: center;">
<b>फॅमिलीपॅक तयार करताना दीपाली आणि स्नेहाली.</b></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBQee_vSxsamrkmcAz83X8IIsZATS5uPXruONbtP98-8_dhm3NK_Z8T8aO95GPUYuKdazFz5v8z9gvvtScc25f5FI8H43OxP-f1zmlBWjnQirytKyiVyXEOhDsjOnE1gR4z2rp8IaOpIuc/s1600/IMG-20190823-WA0030-01.jpeg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1280" data-original-width="960" height="320" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgBQee_vSxsamrkmcAz83X8IIsZATS5uPXruONbtP98-8_dhm3NK_Z8T8aO95GPUYuKdazFz5v8z9gvvtScc25f5FI8H43OxP-f1zmlBWjnQirytKyiVyXEOhDsjOnE1gR4z2rp8IaOpIuc/s320/IMG-20190823-WA0030-01.jpeg" width="240" /></a></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div style="text-align: center;">
<b>दीपाली, स्नेहाली, पूजा यांच्या मेहनतीने तयार झालेले फॅमिली पॅक </b></div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-7322952513523228542019-05-29T09:36:00.001-07:002019-05-29T09:36:28.755-07:00हा ABP, माझा नाही..<p dir="ltr">हा ABP, माझा नाही..</p>
<p dir="ltr">भारताच्या स्वतंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत स्वातंत्र्योत्तर भारतात किती आहे? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे ABP माझावरील २८ मे रोजी झालेली चर्चा. २८ मे म्हणजे स्वतंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. कदाचित २ ऑक्टोबर इतकी फेमस नसल्याने कुठल्याही वृत्तपत्रात त्याची बातमी नसेलच हे अपेक्षितच होतं. कारण सावरकर म्हटलं की या कणा नसलेल्या लोकांच्या लेखण्या खुंटतात आणि तोंडं सुटतात आणि हाच प्रकार केला ABP माझाने. सावरकर - नायक की खलनायक? यावर एक चर्चा आणि प्रसन्न जोशी सारखे पत्रकार असले की समजून जायचं की चर्चा एकांगी होणार. प्रसन्न सोबत नम्रता वागळे पण होत्या पण "नमस्कार मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या माझा विशेष मध्ये आपलं स्वागत आहे... etc एवढंच बोलण्यापुरतं त्यांचा सहभाग होता. असो तो मुद्दा नव्हे. मुद्दा हा की एबीपी माझाला या चर्चेसाठी जो मुहूर्त मिळाला त्याचं टायमिंग आणि कार्यक्रमाचे मुद्दे.</p>
<p dir="ltr">आज एबीपी माझा म्हणतंय की "कार्यक्रमातून सावरकरांचा अपमान करायचा हेतू नव्हता, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणं हा उद्देश नव्हता इ." मूळातच कार्यक्रमाच्या शीर्षकातूनच (सावरकर - नायक की खलनायक) सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेतला गेला. जर एबीपी माझाने सावरकरांचे कार्य दाखवणारे कार्यक्रम दाखवले होते आणि त्यांच्या मनात सावरकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका नव्हती तर "नायक की खलनायक" हे शीर्षक का? आणि यातून शंका उत्पन्न करायची नव्हती? आणि जर एबीपी माझाच्या (प्रसन्नच्या किंवा त्यांच्या इतर पत्रकारांच्या) मनात शन्का होती तर त्यांनी ती शंका सावरकर वाचून दूर करायला हवी होती, त्याचा जहीर कार्यक्रम घेण्याची काय गरज? कोणत्या प्रेक्षकाने एबीपी माझाकडे मागणी केली की "भौ आमची माहिती अपूर्ण आहे तर कार्यक्रम घेऊन पूर्ण करा.''? जर अशी कोणती मागणी नाही, तुम्हाला शंका घ्यायची नव्हती (जाहीर केलेल्या पत्रकाप्रमाणे), तर असा जाहीर कार्यक्रम घेण्याची गरजच नव्हती.</p>
<p dir="ltr">दुसरा मुद्दा. कार्यक्रम सावरकरांवर होता ना? मग सावरकर नायक की खलनायक हा प्रश्न विचारत प्रसन्न जोशी शेवटी हिंदूराष्ट्रवाद या त्याच्या आवडत्या विषयाकडे वळला आणि भाजपच्या प्रवक्त्याला "तुम्ही हे मान्य करा की त्यांचा हिंदुत्ववाद, हिंदूराष्ट्रवाद तुम्हाला मान्य नाही की मान्य आहे.." मुळात कार्यक्रम सावरकरांच्या विषयाचा असताना भाजपाच्या प्रवक्त्याला हा प्रश्न का विचारला गेला? याचं उत्तर एबीपी माझा ने द्यावं. आणि जेव्हा स्वतः गांधीवादी प्रवक्ते सावरकरांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना जे बरोबर बोलले ते ऐकून सुद्धा त्याविरुद्ध प्रश्न हिंदुत्ववादी प्रवक्त्याला प्रसन्न जोशी एकांगीपणे विचारत असताना एबीपी माझाला सावरकरांच्या कोणत्या कार्याचा आदर करायचा होता?</p>
<p dir="ltr">आज पत्रक काढून त्यावर आपली बाजू मांडणाऱ्या एबीपी माझाने असाच कार्यक्रम २ ऑक्टोबरला घेण्याची हिंमत करावी. कारण जसे काही लोक सावरकर आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत तसेच काही जण गांधीवाद न मानणारे सुद्धा आहेत, म्हणून त्याचीही "चिकित्सा" एबीपी माझाने जाहीर कार्यक्रम घेऊन करावी. आणि प्रसन्न जोशीने एकाच प्रश्नाच उत्तर द्यावं की जर तू फक्त अहिंसाच परमोधर्म मानतो तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचे योगदान तुम्ही अमान्य करणार का? कारण भारताला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालं नाही हेही तितकंच सत्य आहे.</p>
<p dir="ltr">असल्या टुकार चर्चा बघितल्या की आपल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाकडे बघून कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवतात,</p>
<p dir="ltr">नाचविता ध्वज तुझा, गुंतले शृंखलेत हात..<br>
तुझ्या यशाचे पवाड गाता, गळ्यात ये तात..<br>
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार,<br>
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर..<br>
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार,<br>
आई वेड्यांना आधार..<br>
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार..!</p>
<p dir="ltr">या ओळींनीसह सर्व क्रांतिकारकांना वंदन करून या लेखाचा शेवट करतो. जय हिंद.</p>
<p dir="ltr">प्रथमेश श. तेंडुलकर</p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-69014957858760487232019-03-18T08:43:00.001-07:002019-03-18T08:43:33.987-07:00कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...<p dir="ltr"><b>कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...</b></p>
<p dir="ltr">राजकारणाबद्दल जेव्हापासून वाचायला लागलो, काही नेत्यांबद्दल आदरयुक्त कुतूहल वाटू लागलं. अशी काही व्यक्तिमत्व नेहमीच आदरणीय आहेत. अटलजी, प्रमोद महाजन आणि मनोहर पर्रिकर ही यातील अशी नावं आहेत की वैचारिक मतभेद असो अथवा नसो पण यांच्याबद्दल चुकूनही वाईट विचार येत नाहीत. अजातशत्रू या शब्दाचा खरा अर्थ इथेच समजतो. पण भारतीय राजकारणाचं, भारतीयांचं दुर्दैव हेच की वरील तीनही जण आज हयात नाहीत. काल मनोहर पर्रिकर गेले ही बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. एक चांगला नेता हरपला ही सर्वांचीच भावना होती. पण मला जाणवलेले पर्रिकर पाहता एक चांगला माणूस हरपला हेच राहून राहून मनाला वाटत होतं.</p>
<p dir="ltr">दीड दोन वर्षांपूर्वी पर्रिकरांना live ऐकायचं भाग्य मिळालं. मास्टर्सचं शिक्षण घेत असताना डिफेन्स संदर्भातील एका जागतिक परिषदेत भाग घेण्याचं भाग्य मिळालं आणि मी ती परिषद फक्त पर्रिकरांना live ऐकण्यासाठी attend केली. पर्रिकर तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री होते. IIT मधून passout झालेले संरक्षणमंत्री अशी एक प्रतिमा त्यांच्याबद्दल माझ्या मनात होती. मनोहर पर्रिकर आणि रघुनाथ माशेलकर यांना live ऐकण्याची इच्छा फार होती आणि त्यातली एक इच्छा त्यादिवशी पूर्ण होत होती. सकाळी 10 वाजता वाशीच्या International Conference Hallमध्ये पर्रिकरांचं भाषण होतं. मिळेल तशी जरा स्टेजच्या जवळची सीटवर बसलो होतो. इतर नेत्यांप्रमाणे पर्रिकर उशिरा येतील अशी सगळ्यांची अटकळ होती आणि तिथेच पर्रिकरांनी सिक्सर मारला. वेळेच्या 10मिनिटं आधीच पर्रिकर आले. बरोब्बर 10 वाजता उदघाटन झालं आणि 10:20ला पर्रिकर सर्वांशी बोलायला उभे राहिले. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम असल्याने समोर सर्व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि कंपन्यांचे एम्प्लॉयी बसले होते.  पर्रिकरांनी भाषणाची सुरवातच अभियंता आणि त्यांचं देशातील त्यांच्या योगदानाने सुरु झालं. ज्ञान कसे घ्यावे इथून सुरु झालेलं भाषण मधेच एखादा विनोद करत पर्रिकरांना त्यांच्या कॉलेज जीवनात घेऊन गेलं. IITमधली शिक्षणाची पद्धत, तिथे त्यांनी शिकलेल्या गोष्टींसोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे या विषयावर बोलताना पर्रिकरांनी दिलेलं त्यांच्या वडिलांचे उदाहरण आजही लक्षात आहे. सकाळी 10:20ला सुरु झालेलं पर्रिकरांचं भाषण 10:55ला संपलं. तो 30-35 मिनिटांचा संवाद आजही मनात घर करून आहे. त्यानंतर पर्रिकर कॉन्फरेन्स हॉल मधून Exhibition Hallमध्ये आले. सर्व उपकरणांची आणि इतर प्रोजेक्ट्सची पर्रिकर नीट आणि कुतूहलपूर्वक माहिती घेत होते.</p>
<p dir="ltr">अर्ध्या तासाच्या भाषणादरम्यान आणि Exhibition Hallमध्ये पर्रिकरांना न्याहाळताना त्यांच्यातला माणूस दिसला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकतंत्र असलेल्या देशाचे संरक्षणमंत्री आणि इतकी साधी राहणी, जाणवतच नव्हतं. निळा हाफस्लीव्हचा शर्ट, काळी ट्राउसर असा पोशाख परीधान केलेल्या पर्रिकरांमधल्या साध्या माणसाचं दर्शन तेव्हा झालं, हल्लीच्या काळात नगरसेवकसुद्धा सुटा-बुटात फिरतात हो. पर्रिकरांचा साधेपणाच सर्वांना भावणारा होता. पर्रिकरांसाठी त्यांच काम आणि देशावरील प्रेम हे सर्वश्रेष्ठ होतं. कर्करोगाने त्रस्त असतानाही ते गोव्याच्या विधिमंडळात उपस्थित होते. माझ्या लेखाचं शीर्षक, <b>"कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती..."</b> याचा अर्थच मुळात हा आहे की स्वतःला सतत देशसेवेच्या कर्तव्यात मग्न ठेवणाऱ्या पर्रिकरांना मृत्यूने विश्रांती दिली. पर्रिकरांना नेताना मृत्यूचेही मन कदाचित हेलावले असेल. पण काय करणार, नियतीपुढे कोणाचे चालते. पण एक मात्र नक्की, पर्रिकर सर, तुमची एक्सिट मन हेलावणारी ठरली.</p>
<p dir="ltr">प्रथमेश श. तेंडुलकर </p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-91440929978216429382019-01-29T03:23:00.004-08:002019-01-29T03:23:44.081-08:00Travelog - One Day Trek to Sinhagad 2019<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<h2 style="text-align: center;">
<b>Travelog - One Day Trek to Sinhagad 2019</b></h2>
<div dir="ltr" style="text-align: center;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
माझा पहिला ट्रॅव्हलॉग माहुली गड ट्रेक आमच्या बऱ्याच मित्र-मैत्रिणींना आवडला म्हणून सिंहगड ट्रेकचा ट्रॅव्हलॉग लिहावा असे वाटले. माहुली ते सिंहगड दरम्यान अनेक ट्रेक केले पण प्रत्येकाचा ट्रॅव्हलॉग लिहावा वाटला नाही किंबहुना माहुली इतकाच सिंहगड सुद्धा मध्यम कठीण प्रकारात येतो म्हणून या ट्रेकचा अनुभव लिहून ठेवणे महत्वाचे वाटले.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixsDL2nuUxg3pKtbUveWog1i0x7dJlEiEK-IAIKJwm23CiEJyQkZ45ain-WefvVTD8YAtP23Zv_M12-AYLQYWr4E_pltRqJwDUhHpSqYkuhd2gHDBhQL9tzn21txD-1zAe84Hth25Wy7hj/s1600/Base.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="774" data-original-width="1600" height="307" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEixsDL2nuUxg3pKtbUveWog1i0x7dJlEiEK-IAIKJwm23CiEJyQkZ45ain-WefvVTD8YAtP23Zv_M12-AYLQYWr4E_pltRqJwDUhHpSqYkuhd2gHDBhQL9tzn21txD-1zAe84Hth25Wy7hj/s640/Base.JPG" width="640" /></a></div>
<b><br /></b>
<b>सिंहगडाबद्दल थोडी माहिती..</b><br />
<b><br /></b></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
सिंहगड (पूर्वीचे नाव कोंढाणा) स्वराज्यातील एक महत्वाचा गड. सिंहगडाला तसा खूप महत्वाचा इतिहास आहे. सिंहगड आधी आदिलशाहीत होता. दादोजी कोंडदेव हे कोंढाण्याचे किल्लेदार होते. दादोजींच्या मृत्यूनंतर शिवाजी महाराजांनी कोंढाणा स्वराज्यात सामील करून घेतला. पण महाराजा शहाजीराजे भोसले यांना दगा करून कैदेत ठेवल्यानंतर त्यांना सोडण्याच्या बदल्यात शिवाजी महाराजांनी कोंढाणा आदिलशाहीला परत दिला. त्यानंतर पुन्हा कोंढाणा स्वराज्यात आला पण त्यानंतर मिर्झाराजा जयसिंगच्या स्वारीत पुरंदरच्या तहात कोंढाणा मोगलांकडे दिला. तेव्हा कोंढाण्याचा सुभेदार होता उदयभान राठोड. कोंढाण्यासारखा बळकट किल्ला मोगलांच्या हाती असू नये म्हणून शिवाजी महाराजांनी मोहिमेवर जायचे ठरवले पण त्यांचा बालमित्र आणि स्वराज्याचे सुभेदार तानाजी स्वतःच्या मुलाचं लग्न सोडून तानाजी, सूर्याजी, शेलारमामा आणि काही निवडक मावळे सोबत घेऊन "आधी लगीन कोंढाण्याचं, मग माझ्या रायबाचं" म्हणत कोंढाणा मोहिमेवर गेले. मोठं युद्ध झालं, गड स्वराज्यात आला पण राजांना त्यासाठी त्यांचा मित्र, स्वराज्याचा सुभेदार गमवावा लागला. तानाजी मालुसरे यांना वीरमरण आले.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b>सिंहगड ट्रेक अनुभव</b></h3>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
सिंहगड ट्रेकसाठी २७ जानेवारी २०१९ला आम्ही आमच्या खाजगी बसने सकाळी ४:१५ला मुंबईहून निघालो. मुंबईत थंडी इतकी जाणवत नव्हती पण माझा फेवरेट स्पॉट, लोणावळा आला आणि थंडी जाणवायला लागली. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाने खंडाळा-लोणावळा परिसरातून जाताना काँक्रीटच्या कुशीतून निसर्गाच्या मांडीवर डोकं ठेवल्याचा फील येतो. मजल दरमजल करीत खडकवासला धरणाच्या बाजूने आम्ही सिंहगडाच्या पायथ्याला पोहोचलो. गाडी जाण्याचा मार्ग बंद होता म्हणून गाडी पार्किंगला लावून मुख्य ट्रेकला सुरवात केली. डोणजे गावापासून सिंहगड पायथा पर्यंतचा प्रवास आणि नंतर सिंहगड सर करतानाचा पहिला टप्पा सहज पार झाला. सिंहगड आम्ही तीन टप्प्यात सर केला. पार्किंग ते सिहंगड पायथा, सिंहगड पायथा ते सिंहगड मध्य आणि मध्य ते सिंहगड माथा, या तीन टप्प्यांपैकी पहिला टप्पा सहज पार झाला. दुसरा टप्पा पार करताना थोडी दमछाक झाली. सिंहगड सर करताना आमचे २ ग्रूप झाले आणि चढतं ऊन आणि सरळ चढ यामुळे आमच्यातला एक मावळा अर्ध्यावरच थांबला. एका टपरीजवळ त्यांना बसवून आम्ही पुढे निघालो. सिंहगड चढताना एक गोष्ट नक्की की तुम्हाला प्रत्येक थोड्या अंतरावर ताक, लिंबूपाणी, दही, रानमेवा मिळतो. एनर्जी ड्रिंक पिऊन गड सर करण्यापेक्षा लिंबूपाणी आणि ताक हे आमचं खरं एनर्जी ड्रिंक अधे मध्ये घेत गडाच्या माथ्याच्या दिशेने आम्ही प्रवास करत होतो. शेवटच्या टप्प्यात चढ कठीण होता आणि सूर्यदेव डोक्यावर होते. अशातच माझ्यासोबतच्या अजून एका मावळ्याने थांबण्याचा निर्णय घेतला. पायात क्रॅम्प आल्याने पुढे गड चढणं तीला शक्य नव्हतं आणि मला गड चढायची कितीही इच्छा असली तरी तीला एकटीला अर्ध्यावर सोडून पुढे जाणं पटतही नव्हतं. म्हणून एकाक्षणी मीसुद्धा तिथेच थांबायचा निर्णय घेतला कारण गडमाथा अजून २५-३० मिनिटं वर होता. पण आमचा एक ग्रूप पुढे निघून गेलेला आणि त्यांना हे कळवणार कसं की आम्ही थांबतोय? कोणाच्याच मोबाईलला रेंज नव्हती. आणि आमचं तर ठरलेलं की जेवण एकत्र करायचं. मग आम्ही थांबतोय हे त्यांना कळणार कसं? फक्त या एकाच कारणामुळे आमचा बसलेला मावळा पुन्हा उभा राहीला गड सर करण्यासाठी. मला एक गोष्ट आठवली, तानाजी धारातीर्थी पडल्यानंतर सर्व मावळे धीर खचून पळत होते तेव्हा सूर्याजीने परतीचे दोर कापून टाकले. एकतर पडून मारा किंवा लढून मारा हाच एक पर्याय होता. तसंच या मोबाईलच्या रेन्जने आमचे परतीचे मार्ग बंद करून टाकले (पण मनातून मला आनंद झालेला :-D ). आणि इथून तिसरा टप्पा सुरु झाला.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhknquGLltVAjZeKnHKKrzAizkWKMbEm7nELaDgkEXe41yQhGZZCmhXSHJn2X-OuQ3stYGhqyaeXVXNwi8NVDIsDRmAsgvSiKopsPHxl8AItfoPFNaHMmpSFY7v15oIOWJ3XuiBQjuQ9N0x/s1600/Way+to+Sinhagad.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhknquGLltVAjZeKnHKKrzAizkWKMbEm7nELaDgkEXe41yQhGZZCmhXSHJn2X-OuQ3stYGhqyaeXVXNwi8NVDIsDRmAsgvSiKopsPHxl8AItfoPFNaHMmpSFY7v15oIOWJ3XuiBQjuQ9N0x/s640/Way+to+Sinhagad.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibvfOoyqXdPIuMbi0W4kzXsu0L9yHUcWofUnhXCL17fiTJernQK2kDAu8KMI8UB__kmqsFdZqVQeMRluPu-_hUdiyzvvus0JVYkvCCeQkRbRqzfzXwGDqk5Drig86JnGobw2mbsqVVbeMW/s1600/Vitthal+mandir.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEibvfOoyqXdPIuMbi0W4kzXsu0L9yHUcWofUnhXCL17fiTJernQK2kDAu8KMI8UB__kmqsFdZqVQeMRluPu-_hUdiyzvvus0JVYkvCCeQkRbRqzfzXwGDqk5Drig86JnGobw2mbsqVVbeMW/s640/Vitthal+mandir.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxbRG2GARtdvxg9stRT4TzTXjEaKO7Eq2LMFWNjYMdK6bBuIbq1yyhERoPMfWnQHCYs7Yx0PmaBdzyVEERSdDJoLgGk0NDmJfS-5R1ZVs7MhHRGkYhp6v9OtV7RvXh-MtGJIGoHQdRCsNW/s1600/Way+to+Sinhagad+1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjxbRG2GARtdvxg9stRT4TzTXjEaKO7Eq2LMFWNjYMdK6bBuIbq1yyhERoPMfWnQHCYs7Yx0PmaBdzyVEERSdDJoLgGk0NDmJfS-5R1ZVs7MhHRGkYhp6v9OtV7RvXh-MtGJIGoHQdRCsNW/s640/Way+to+Sinhagad+1.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghIl7n-d_Sg2y5xGQ8vX6OvyIl8I3YAVv4KTodmJXwHMEtQ4OtppA3MgGP6Xqc64WGeu5wdOnyzaNuoJneJ6zr-RfF_eIyXzjZqzsXP30Dov3Ji6D54_3hLcjUE90UFpcZl0owOBit3_lj/s1600/Plastic+bandi.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEghIl7n-d_Sg2y5xGQ8vX6OvyIl8I3YAVv4KTodmJXwHMEtQ4OtppA3MgGP6Xqc64WGeu5wdOnyzaNuoJneJ6zr-RfF_eIyXzjZqzsXP30Dov3Ji6D54_3hLcjUE90UFpcZl0owOBit3_lj/s640/Plastic+bandi.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjphsterE8xPi6SOM7UWQlxMJghdijflgQSMoxlRz8XwCF1efiY98q6ngE4WO9wURdX5_5DK4cesV242jUyvau_ZHqMHKUsv6jaCGkK90STU7lJ1JQsZPxfDGAh0beG6RoXej3-T5Uf61Qx/s1600/Actual+trek.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjphsterE8xPi6SOM7UWQlxMJghdijflgQSMoxlRz8XwCF1efiY98q6ngE4WO9wURdX5_5DK4cesV242jUyvau_ZHqMHKUsv6jaCGkK90STU7lJ1JQsZPxfDGAh0beG6RoXej3-T5Uf61Qx/s640/Actual+trek.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjx9emSShZw7lIE26mAEjppmBRTAGTHRI55p5VeZXNCkCa7BRai1uQC4Em8yD4Ckaz56pMrPMBpT2oVQUc3PeA5254_dzhwHkcGX-KS3qiPCTgJy674aK21xI4uSigzaV3yLDxmMoaIVu9i/s1600/Way+to+Sinhagad+2.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1138" data-original-width="1600" height="454" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjx9emSShZw7lIE26mAEjppmBRTAGTHRI55p5VeZXNCkCa7BRai1uQC4Em8yD4Ckaz56pMrPMBpT2oVQUc3PeA5254_dzhwHkcGX-KS3qiPCTgJy674aK21xI4uSigzaV3yLDxmMoaIVu9i/s640/Way+to+Sinhagad+2.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVYoSdGrM55krxgPQVjRvOtw3U1cBt3k4pQg5PEd6L-lbnvRMs-2EXRfaNFR06FwTE37TA2vbwLT8oTHE1P-T2j1kAKHqt5W4FuNDNvwIVWO_7CF2RBJ4ScHfYutOVYAnalZvTuGdWY_f-/s1600/Way+to+Sinhagad+3.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1033" data-original-width="1600" height="412" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjVYoSdGrM55krxgPQVjRvOtw3U1cBt3k4pQg5PEd6L-lbnvRMs-2EXRfaNFR06FwTE37TA2vbwLT8oTHE1P-T2j1kAKHqt5W4FuNDNvwIVWO_7CF2RBJ4ScHfYutOVYAnalZvTuGdWY_f-/s640/Way+to+Sinhagad+3.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b>सिंहगड - अखेरचा टप्पा</b></h3>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
तिसरा टप्पा हा पूर्ण सिहंगड ट्रेक मधील सर्वात कठीण टप्पा म्हणता येईल. उभी चढण आणि प्रत्येक ठिकाणी निसरडी वाट. दगडांना धरून उभी चढण चढणे म्हणजे एक टास्क होता. पुढे जाऊन मागच्यांना हात देऊन वर घेणे असं करत करत वर जायचं होतं. साधारण हा कठीण टप्पा पार करायला अर्धातास लागला. आता मात्र सिंहगड माथा नजरेत आला. <b>डौलाने फडकणारा भगवा बघून झालेला त्रास विसरलो आणि पुढे पुढे सरकत राहिलो. </b><br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjo6O9X-vS6Lc-I8mZvbeu99fqr_QcLIsFEwGep4wOkxkaHush2I3AE1Yw2fzi3js698YxULZ94gA8Z63z-NgLlNAq4IHJHP1Vz6IAr3zilyjvoUbXCFlSFtWDmQjAMHA3G2e3hnWTollRZ/s1600/Bhagawa.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjo6O9X-vS6Lc-I8mZvbeu99fqr_QcLIsFEwGep4wOkxkaHush2I3AE1Yw2fzi3js698YxULZ94gA8Z63z-NgLlNAq4IHJHP1Vz6IAr3zilyjvoUbXCFlSFtWDmQjAMHA3G2e3hnWTollRZ/s640/Bhagawa.JPG" width="640" /></a></div>
<br />
जसा जसा गड जवळ येत होता तश्या शिवगर्जना ऐकू येत होत्या. खालून वर येताना तर URI मधलं "How's the Josh" करत सर्व वर येत होते. गडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर गेले काही तास आम्ही जी मेहनत केली ती सफल झाल्याचं समाधान वाटलं. वरून खाली बघताना "आपण एवढं वर चढून आलो?' असा प्रश्नही मनात आला. पण हो, आम्ही गडावर होतो, माथ्यावर.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjy_4rctDYWvfCbzMWErNDaDCDukO6M0NUlBlNI4WOYb3si6VNGxwAFNx1KQ8-gtJ5J8KZj0IUgqgDXE7fWXtBO-UocPmvkqkTJ6XJjJ4QpHo4OSpqw0jIvy2R2pkjT1QawNt-uQtqCg8ah/s1600/Pune+daravaja.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjy_4rctDYWvfCbzMWErNDaDCDukO6M0NUlBlNI4WOYb3si6VNGxwAFNx1KQ8-gtJ5J8KZj0IUgqgDXE7fWXtBO-UocPmvkqkTJ6XJjJ4QpHo4OSpqw0jIvy2R2pkjT1QawNt-uQtqCg8ah/s640/Pune+daravaja.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b>सिंहगड दर्शन आणि जेवण</b></h3>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
सिंहगड म्हणजे अगदी नावासारखा, जिंकण्यास अभेद्य. पहिला येतो तो पुणे दरवाजा. त्यापुढे पुणे दरवाजा दोन. आणि मग गडावर पाहण्यासारखी अनेक ठिकाणं आहेत. घोड्याची पागा आहे आणि दारूखाना सुद्धा आहे. पूर्वी या ठिकाणी युद्धसाहित्यातील दारुगोळा ठेवला जात असे. सिंहगडावर तुम्हाला हिरकणी बुरुज सुद्दा दिसेल. आणि सर्वात महत्वाचा तानाजी कडा. जिथून तानाजी आणि त्यांचे साथीदार गडावर चढून आलेले. या व्यतिरिक्त राजाराम महाराजांची समाधी अश्या अनेक गोष्टी पाहणासारख्या आहेत.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ6T173TzFJTwKh8N84g8VZUjBwbv-M09b2yY9JgULH44hJ3IVSaD1g_BK2UiC4gAS_wI8m1-1YuJw_zv-xnlbqypKbKQC90EW2uqQ7iYgkkTjnnKWP942nOoFl-KOGgFQB9XE00eszTaZ/s1600/Pune+daravaja1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiQ6T173TzFJTwKh8N84g8VZUjBwbv-M09b2yY9JgULH44hJ3IVSaD1g_BK2UiC4gAS_wI8m1-1YuJw_zv-xnlbqypKbKQC90EW2uqQ7iYgkkTjnnKWP942nOoFl-KOGgFQB9XE00eszTaZ/s640/Pune+daravaja1.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgw3UNqPa6JTXpYTO4ibFDvPwToagHi55ceUrqZ802LRTpCeAtMuIWmVsNCcCg6Jrc29_e750YrsHqmEurr7wQ4lTWX46so1sBBKkrRnFvBLeuFebL3GspbU8-4YBp09TgJSXSpdl8oY0VU/s1600/Sinhagad+Base.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgw3UNqPa6JTXpYTO4ibFDvPwToagHi55ceUrqZ802LRTpCeAtMuIWmVsNCcCg6Jrc29_e750YrsHqmEurr7wQ4lTWX46so1sBBKkrRnFvBLeuFebL3GspbU8-4YBp09TgJSXSpdl8oY0VU/s640/Sinhagad+Base.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPF-mzCg2WBHcU06sZzfJzz-cvPEb2QL2wr_xGURx2GlW25hOXLv5ZnGWCHQ01fxDUpaURHKVSwfCpn_Z2Cf6izPanKrrTDStq67e5Gh9gTWGIJjVASnwDP96x3w6LnZ-VuZrtMwZHOM29/s1600/Sinhagad+top.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPF-mzCg2WBHcU06sZzfJzz-cvPEb2QL2wr_xGURx2GlW25hOXLv5ZnGWCHQ01fxDUpaURHKVSwfCpn_Z2Cf6izPanKrrTDStq67e5Gh9gTWGIJjVASnwDP96x3w6LnZ-VuZrtMwZHOM29/s640/Sinhagad+top.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEir4kwysPTQ8Iq3ZfjbTX9-BUfPnQTVCl02fhL7oun5kFKhC3Cx04t300QsAOaWI0J31I0rYRgH3DgR5g0N1QrbOe3FR9bABK9lCwfeyl2PnO-cUwB3HPxEFANpetIuSV3Gp3A4CYZkVzVi/s1600/Tofkhana.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEir4kwysPTQ8Iq3ZfjbTX9-BUfPnQTVCl02fhL7oun5kFKhC3Cx04t300QsAOaWI0J31I0rYRgH3DgR5g0N1QrbOe3FR9bABK9lCwfeyl2PnO-cUwB3HPxEFANpetIuSV3Gp3A4CYZkVzVi/s640/Tofkhana.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
इतकं चढून आल्यावर भूक तर लागणारच. गडावर अनेक छोटी हॉटेल आहेत जिथे जेवण्याची सोय होते. आम्ही सर्व एका चटईवर मस्त झाडाच्या सावलीत जेवायला बसलो. गडावरची स्पेशल चुलीवरचं पिठलं आणि ज्वारीची भाकरी,वांग्याचं भरीत, सोबत कांदाभजी आणि मटक्यात लावलेले दही.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnm4-CzfqmKZWU5S7rci6S9cgkEjObHk82vnVGVTfCTfqjuLen4IX4JaijFEcTcb8YkPoAnPSGTVOz-FZeeunwmSOg-8C8eUOG8hL4ZvqVBzh9QlhtxHDdsv5PleySiMhqEX8trnQlezVC/s1600/IMG_20190127_132446.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjnm4-CzfqmKZWU5S7rci6S9cgkEjObHk82vnVGVTfCTfqjuLen4IX4JaijFEcTcb8YkPoAnPSGTVOz-FZeeunwmSOg-8C8eUOG8hL4ZvqVBzh9QlhtxHDdsv5PleySiMhqEX8trnQlezVC/s640/IMG_20190127_132446.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhl59kFsPLzoOT_T7olAjAVoSrcHcm15gYpVSYFX2gN-Lxjh2fQgt1AX0c4wVflib3xNX9-SjDVeoge5AxiRB2ciXLmrgiy_DtK0pxVcAjjGuqLz2BbeWSIvKgla2VGfX7PrF1b8m38F-vJ/s1600/2019-01-28-14-14-37.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="1280" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhl59kFsPLzoOT_T7olAjAVoSrcHcm15gYpVSYFX2gN-Lxjh2fQgt1AX0c4wVflib3xNX9-SjDVeoge5AxiRB2ciXLmrgiy_DtK0pxVcAjjGuqLz2BbeWSIvKgla2VGfX7PrF1b8m38F-vJ/s640/2019-01-28-14-14-37.jpg" width="640" /></a></div>
<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
</div>
मटक्याच्या दह्याची चव वेगळीच. गड चढत असताना आम्हाला एक दही विकणारे काका भेटले. त्यांच्याकडे दही घेऊन खाता खाता मी या दह्याबद्दल अधिक माहिती घेतली. मुळात आपण घरी जे विरजण लावतो त्या दह्याची चव आणि या चवीत खूप फरक होता कारण हे दही करण्यासाठी लागणारं दूध हे एका मडक्यात उकळवलं जातं आणि मग प्रत्येक छोट्या छोट्या मटक्यात त्याचं दही लावलं जातं. या मटक्यात उकळवलेलं दूध आणि मटक्यातच लावलेलं विरजण यामुळे दह्याची चव एक नंबर लागते.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmiYb_z6KEgOll-jDLlEJm4kFGfVrui0dm0D6wKZ3kzmJgwPGjlX9_cVt-onqbFCBrPa2toErctW3uKeWBa0cgau3Vte0HiFgwQnOxJAR4szwX-NWLdrK04HZ1Rt-74OSvghbQB7ZpCws-/s1600/IMG_7771.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjmiYb_z6KEgOll-jDLlEJm4kFGfVrui0dm0D6wKZ3kzmJgwPGjlX9_cVt-onqbFCBrPa2toErctW3uKeWBa0cgau3Vte0HiFgwQnOxJAR4szwX-NWLdrK04HZ1Rt-74OSvghbQB7ZpCws-/s640/IMG_7771.JPG" width="640" /></a></div>
<br />
पुणेकरांना तसंही स्वतःचे (पुण्यातले) पदार्थ जगात भारी असतात हे वाटतच असतं (गैरसमज) पण मटक्यातलं दही हे चवीच्या दृष्टीनेतरी जगात भारी होतं.माझं नशीब जोरात, ज्या ज्या गोष्टी जेवायला आवडतात त्या त्या अगदी भारी चवीच्या तिथे मिळाल्या.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
पैशांचा विचार केला तर हो जेवण बऱ्यापैकी महाग आहे पण हिशोबाचा विचार केलात तर गडाच्या माथ्यावर, चटईवर, झाडाच्या सावलीत बसून असे ऑथेंटिक पदार्थ खायला मिळणार तर थोडे पैसे जास्त गेले तरी प्रॉब्लेम नाही. तशीही आमची मुंबई आर्थिक राजधानी आहेच, मग चालतंय की राव.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b>परतीचा प्रवास</b></h3>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
सगळ्यात मोठा टास्क आत्ता होता. जेवढी उभी चढण आम्ही चढून आलो तेवढीच उभी उतरण होती. त्यामुळे एक मावळा जो अर्ध्यावर होता त्याला घेण्यासाठी एक ग्रूप आलेल्या वाटेने गडउतार झाला आणि आम्ही एक ग्रूप जिथून गाड्या येतात त्या रस्त्याने निघालो. साधारण १०-११ किलोमीटरचं अंतर होतं पण फक्त उतार होता आणि तोही चांगल्या रस्त्याचा. कोणीतरी मागून ढकलावे आणि घरंगळत हळू हळू पायथ्याशी पोहोचावे असं आम्ही चालू लागलो. सुनसान रस्ता आणि त्या रस्त्यावरून चालणारे आम्ही. फक्त पक्षांचा आवाज आणि आमच्या बोलण्याचा आवाज इतकी शांतता होती त्या रस्त्याला. पण हळू हळू आम्ही ते अंतर पार केलं. साधारण दीड तास आम्हाला लागलॆ. डोणजे गावात येऊन मस्त कटिंग चहा आणि बिस्कीट सोबत परतीचा प्रवास सुरु झाला.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
ट्रेकमधून आम्ही परत काय घेऊन गेलो? असं जर कोणी विचारलं तर मी या ट्रेक मधून माझ्या सोबत ऊर्जा घेतली आणि काहीही झालं तरी गड सर करायचाच ही प्रचंड इच्छाशक्ती घेऊन परतलो. ट्रेक करून खाली उतरताना अजून एक अनुभव मला समजला. आमचा एक ग्रूप ट्रेक मार्गाने खाली उतरताना एका आजींच हाड निखळलं होतं हे आमच्या ग्रूपमधील गणेशला समजलं. त्यावेळी त्यांना प्रथमोपचार देण्यासाठी तो पुन्हा वर गेला आणि इतकंच नाही तर आपल्यासोबत इतर 4-5 जण जमवून त्याने त्या आजींना खाली आणलं. गणेशने आणि त्या इतर 4-5 जणांनी जे काम केलं त्याला तोड नाही. आजकाल लोक आपल्या लोकांसाठी काही करत नाहीत पण ना ओळख ना पाळख असलेल्या आजींना मदतीसाठी हे सर्व धावून गेले. गणेशला त्याच कारणामुळे पायथा गाठायला उशीर झाला आणि नक्की का उशीर झाला हे माहित नसल्याने त्याची काळजी तर होतीच पण त्याच्याशी कुठलाच संपर्क नसल्याने मी त्याच्यावर चिडलो सुद्धा पण हे कारण कळलं तेव्हा पट्ठ्याचा अभिमान वाटला. आणि एवढं करून पण मनाचा मोठेपणा दाखवून त्याने "हे मी चैतन्य मधून शिकलो, क्रेडिट चैतन्यच.." असं सांगितलं पण हे क्रेडीट चैतन्यच नाही ते फक्त छत्रपतींच. कारण छत्रपतींच्या गडावर असताना आपल्या डोक्यात शिवविचारच असणार आणि त्याच शिवविचाराने त्याने त्या आजींना मदत केली.<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh19lriLG8iG7IPO9XyphvW-JHuQcv8ws7PQVTQnDHVYiBxmC3S9I4px91Kn1uTqTySKVwxuCyi3PM0jcD1jbN1OuhLEjmgvVN7f_OxKNadgqsVWGsrzIy0KtmmFqpk-fcRUA6ykLm-DjPp/s1600/IMG_7744.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh19lriLG8iG7IPO9XyphvW-JHuQcv8ws7PQVTQnDHVYiBxmC3S9I4px91Kn1uTqTySKVwxuCyi3PM0jcD1jbN1OuhLEjmgvVN7f_OxKNadgqsVWGsrzIy0KtmmFqpk-fcRUA6ykLm-DjPp/s640/IMG_7744.JPG" width="640" /></a></div>
<br />
आपण ट्रेक करतो त्यात एक मजा असते पण त्यासोबत आपल्याला आपल्या मर्यादा कळतात. आपल्या limits आपण किती स्ट्रेच करू शकतो हे कळतं आणि सिंहगडाच्या माथ्यावर पोहचून जेव्हा खाली बघतो तेव्हा २ तास केलेल्या मेहनतीचं जे फळ मिळतं आणि जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाच नाही.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr">
</div>
<div style="text-align: justify;">
जय शिवराय.</div>
<div style="text-align: justify;">
प्रथमेश श. तेंडुलकर <a href="tel:9869371580">(९८६९३७१५८0</a>)</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<br />
<div dir="ltr">
</div>
<div style="text-align: justify;">
काही टीप्स:-</div>
<div style="text-align: justify;">
मटक्यातील दही घ्यायचे असल्यास ते मटक्यातच लावलेले होते का याची खात्री करून घ्यावी. दही मटक्यातच लावलेले असेल तरच त्याला ती चव असेल.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1MnJuRjO9Ip-Y3UQH83mCXKD6gZ_T__eVOAb0_PCrL-R_eJSSKBl7Vm8AFzIbpbd9i5RlnTovFUlV_dWIjw__ylwHSf8scEQ7iiMAwBpwFlcerpv0Z0pVRmSpoWQR4STEWbl9oPChT1VD/s1600/IMG_7809.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1067" data-original-width="1600" height="426" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi1MnJuRjO9Ip-Y3UQH83mCXKD6gZ_T__eVOAb0_PCrL-R_eJSSKBl7Vm8AFzIbpbd9i5RlnTovFUlV_dWIjw__ylwHSf8scEQ7iiMAwBpwFlcerpv0Z0pVRmSpoWQR4STEWbl9oPChT1VD/s640/IMG_7809.JPG" width="640" /></a></div>
<br /></div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com4tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-60259793576123643762018-11-06T19:55:00.001-08:002018-11-06T19:55:57.722-08:00चैतन्यमय दिवाळी<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div dir="ltr" style="text-align: center;">
<b><span style="font-size: large;"><u><i>चैतन्यमय दिवाळी</i></u></span></b></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhhLIpD6IA3O6oJwWN5rvX5fqH8E7yEf4X4KsugbWNZob39CfV1CaZ9eksouxlw1AYCUx-fe-ISgN4hWs9YuUUDgtWPOVCKaPnjPRmdW2dGqdI01w9p1psI_nERLbOvoG6N3DrZJpOde9Ge/s1600/20181105_210839_0001.png" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="900" data-original-width="1600" height="225" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhhLIpD6IA3O6oJwWN5rvX5fqH8E7yEf4X4KsugbWNZob39CfV1CaZ9eksouxlw1AYCUx-fe-ISgN4hWs9YuUUDgtWPOVCKaPnjPRmdW2dGqdI01w9p1psI_nERLbOvoG6N3DrZJpOde9Ge/s400/20181105_210839_0001.png" width="400" /></a></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
दिवाळीची वेगवेगळी रूपं पाहायला मिळतात. आणि त्याप्रमाणे ती दिवाळी साजरी करायची पद्धत बदलते. शाळेत असताना दिवाळीला 21 दिवसांची मोठी सुट्टी असायची. सहामाही परीक्षा संपवून एकदम मोकळ्या वातावरणात दिवाळी साजरी व्हायची. लहान असताना फटाक्यांची विशेष आवड होती. पण जसे जसे मोठे होत गेलो तसे काही आवडी निवडी बदलल्या. फटाक्यांची आवड हळूहळू कमी झाली. पण एक आवड मात्र तशीच आहे आणि पुढेही तशीच राहील, ती म्हणजे फराळ चोपून खायची. लाडू, चकली, चिवडा, करंजी, शंकरपाळी यांची आवड वयासोबत वाढत गेली. पण जसं जसं इतर लोकांमध्ये मिसळत गेलो तेव्हा हेही कळलं की सगळ्यांची दिवाळी आपल्यासारखी नसते. आपण फराळ करतो, फराळ खातो पण आपल्यासारखी अनेक मुलं-मुली आहेत ज्यांना फराळ माहीतही नसतो. अनेकांच्या घरी फराळ बनतही नाही. म्हणून चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे आम्ही या मुलांच्या आयुष्यात दिवाळीचा आनंद निर्माण करायचा एक छोटा प्रयत्न केला. हा प्रयत्न करताना त्या मुलांना दिवाळीचा फराळ काय असतो आणि त्याचा एक वेगळा आनंद असतो याची एक जाणीव करून देण्याचा उद्देश आमच्यासमोर होता.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
म्हणून आम्ही काही शाळांची निवड केली. <b>वाडा तालुक्यातील एक आणि विक्रमगड मधील चार</b>, अश्या एकूण पाच शाळांमध्ये आम्ही फराळ वाटायचे ठरवले. मग तयारी सुरु झाली. फराळ कुठे ठेवायचा इथपासून ते कोणत्या शाळेत किती वाजता जायचं इथपर्यंत सर्व प्लँनिंग सुरु झालं. फराळाची ऑर्डरसुद्धा आम्ही अश्या एका कुटुंबाला दिली की ज्यांची आर्थिक परिस्थिती बेताची होती. पण दिवाळी सोबतच थंडीसुद्धा येते आणि या थंडीत त्या मुलांच्या अंगावर नीट चादर असली पाहिजे म्हणून आम्ही फराळासोबत ब्लँकेट द्यायचे ठरवलं. यासाठी वाडा येथील मालबीडी हे गाव आम्ही निवडलं आणि सोबतच विक्रमगड मधून 4 शाळांची निवड केली. हे सर्व आम्ही गावांत जाऊन सुद्धा वाटू शकत होतो पण आम्ही शाळांचीच निवड का केली याचं कारण म्हणजे या विभागात लोकांमध्ये शिक्षणाबद्दल असलेली उदासीनता. त्यामुळे मुलं शाळेत जात नाहीत. पण शाळेत कोणी खाऊ वाटणार आहेत किंवा काही वस्तू देणार या अपेक्षेने मुलं येतात. गेल्या काही उपक्रमांमधून आम्ही आणि शिक्षकांनी शाळेची पटसंख्या कमी न झाल्याचे अनुभवले आहे. शालेय साहित्य, फूटवेअर, वह्या इत्यादी वाटप केल्यामुळे मुलांचा शाळेकडे ओढा वाढला. काहीतरी खाऊ मिळतो या आशेने का होईना मुलं शाळेत यायला लागली. यासाठीच आम्ही शाळांची निवड केली. दिवाळीचा फराळ वाटायच्या आधी आम्ही काही जण राहुलच्या घरी जमलो, फराळ नीट पिशव्यांमध्ये भरला आणि मग दुसऱ्या दिवशी बसने प्रत्येक शाळेत जाऊन त्यांना फराळ आणि ब्लँकेट दिले. </div>
<table cellpadding="0" cellspacing="0" class="tr-caption-container" style="margin-left: auto; margin-right: auto; text-align: center;"><tbody>
<tr><td style="text-align: center;"><a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPy5xrkqEdUx4iwW13xgPOx1eoXwyFYJF9WstEl1qSc9gqABJsg4dhDLgWlsQi2gcJlYKmTJ_zZR0hWSVXl0SkJrC-VnGqbuMtdJ-drkseQoRYr4jHKxvpZLr10lcxXVJWSd6RZLaGW6TS/s1600/IMG_20181104_123350.jpg" imageanchor="1" style="margin-left: auto; margin-right: auto;"><img border="0" data-original-height="800" data-original-width="1600" height="200" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiPy5xrkqEdUx4iwW13xgPOx1eoXwyFYJF9WstEl1qSc9gqABJsg4dhDLgWlsQi2gcJlYKmTJ_zZR0hWSVXl0SkJrC-VnGqbuMtdJ-drkseQoRYr4jHKxvpZLr10lcxXVJWSd6RZLaGW6TS/s400/IMG_20181104_123350.jpg" width="400" /></a></td></tr>
<tr><td class="tr-caption" style="text-align: center;">ZP School Vikramgad</td></tr>
</tbody></table>
<div style="text-align: justify;">
या 5 शाळांमध्ये एक अनुभव समान होता. तो म्हणजे या विभागातील खूप कमी मुलांना फराळ काय असतो हे माहीत होतं. या विभागात गेल्या काही भेटींच्या अनुभवातून असे लक्षात आले होते की या मुलांना प्राथमिक सुविधाही मिळत नाहीत. तसेच आपण जसे सण साजरे करतो तसे हे करत नाहीत. म्हणूनच चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनतर्फे यावर्षी या सर्व मुलांना फराळ वाटून ही दिवाळी साजरी करण्याचा निर्णय घेतला. पण या फराळासोबत आम्ही प्रत्येकाला एक ब्लॅंकेट दिलं. मुळात नेहमी घालायलाही नीट कपडे या मुलांकडे नव्हते, त्यामुळे दिवाळी सोबत येणाऱ्या थंडीपासून यांचं संरक्षण व्हावं म्हणून हे ब्लॅंकेट वाटण्यात आले. आम्ही शाळेत फराळ वाटतोय हे बघून आजूबाजूच्या घरातील अनेक मुलं तिथे फराळ घ्यायला आली. काहीतरी नवीन खाऊ आपल्याला मिळणार याची एक अशा त्यांच्या डोळ्यात होती. खाऊच्या आशेने काय होईना कदाचित हीच मुलं उद्या शाळेत शिकायला पण येतील. पण या सर्वात एक विचार मनाला चटका लावून जातो तो म्हणजे मुंबई, ठाण्यासारख्या "developed" शहरांपासून 2-3 तासाच्या अंतरावर असणाऱ्या गावांत ही अवस्था असेल तर इतर आदिवासी भागांचा विचार करणे कठीण आहे.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
या लेखाला मी <b>"चैतन्यमय दिवाळी"</b> असं नाव देण्याचं एकच कारण आहे. लहान असताना कंदील बनवणे आणि इतर मजा घेत आपण दिवाळी साजरी करायचो पण ती दिवाळी फक्त आपल्या आणि आपल्या कुटुंबाच्या आनंदापुरती मर्यादित होती. आज <b>चैतन्य सोशल वेल्फेअर फाउंडेशनच्या सर्व परिवाराने</b> एकत्र येऊन स्वतःच्या आनंदात या आदिवासी विभागातील मुलांना सामील करून घेतले याचा आनंद खूप आहे. <i><u>आज हा उपक्रम पूर्ण करून घरी जाताना आमच्यापैकी प्रत्येकजण एक वेगळी दिवाळी साजरी केल्याचा अनुभव घरी घेऊन जाईल. चैतन्यचे सर्व सभासद आणि आमचे दाते यांच्या मदतीने त्या मुलांच्या आयुष्यातील ही दिवाळी चैतन्यमय करण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.</u></i> म्हणूनच ही दिवाळी आमच्यासाठी विशेष आहे.</div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
<br /></div>
<div dir="ltr" style="text-align: justify;">
धन्यवाद</div>
<div dir="ltr">
</div>
<div style="text-align: justify;">
प्रथमेश श. तेंडुलकर (9869371580)</div>
<div style="text-align: justify;">
<b>चैतन्य सोशल वेल्फेअर फॉउंडेशन</b></div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com2tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-81182872616241833142018-06-25T08:50:00.004-07:002018-06-25T08:50:30.836-07:00Trek to Lohagad -- लोहगड - माझ्या नजरेतून<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
महाराष्ट्राच्या कुशीत वसलेल्या गर्द हिरव्या वनराईत २ किल्ले मराठ्यांची शौर्यगाथा सांगत उभे आहेत. एक म्हणजे किल्ले विसापूर आणि किल्ले लोहगड. हे दोन किल्ले म्हणजे २ मित्रच. या दोन किल्ल्यांच्या मधून एक अरुंद खिंड जाते, ती म्हणजे शेलार खिंड. त्यातल्याच एका किल्ल्याला भेट द्यायचा योग आला. तो म्हणजे किल्ले लोहगड.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgceyQzJAQwUEatyHgOMdiQzSjjyzW0Y4jPTz5d-J6BDKWZILUNko8ZvHs3hB7xskhhgYqUoeUkXTlvc2AYGLW5mjrR0G4H9Ye5J-YRGCG9eD0d1yo5fhE_J0lmhIk9A1JarmLdlKyyKfkM/s1600/Loh-7.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="850" data-original-width="1600" height="338" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgceyQzJAQwUEatyHgOMdiQzSjjyzW0Y4jPTz5d-J6BDKWZILUNko8ZvHs3hB7xskhhgYqUoeUkXTlvc2AYGLW5mjrR0G4H9Ye5J-YRGCG9eD0d1yo5fhE_J0lmhIk9A1JarmLdlKyyKfkM/s640/Loh-7.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div style="text-align: justify;">
मुंबई पासून साधारण १२० किलोमीटर वर लोणावळ्याच्या निसर्ग सौंदर्यात वसलेला हा किल्ला. इथे येण्यासाठी जर तुम्ही ट्रेन ने येत असाल तर माळवली स्टेशन पासून येता येते. आम्ही आमच्या गाडीने येथे आलो. किल्ल्याच्या पायथ्याशी पेठ आहे. त्याला लोहगड वाडी असे नाव आहे. सहसा किल्ल्याची पेठ ही किल्ल्याच्या मध्यावर किंवा माथ्यावर असते, पण लोहगडवाडी पायथ्याशी आहे. पावसाळा आणि त्यात रविवार म्हणजे असंख्य पर्यटक लोहगडाला भेट द्यायला आले होते.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-4mtlt7ME9bsF0WgT4IWnkw26Vwi3N-I5PTjuxNNqCAz7iqSFS-c88mOA8h-sgacJBh_g3l8BfqylH5R3GlMf-ZkpSA30YhraXnzxmGeZtqcRihqE5qGvNWbHRnlEiDlE6uWGXdTT9bHg/s1600/Loh-10.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="816" data-original-width="1600" height="324" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi-4mtlt7ME9bsF0WgT4IWnkw26Vwi3N-I5PTjuxNNqCAz7iqSFS-c88mOA8h-sgacJBh_g3l8BfqylH5R3GlMf-ZkpSA30YhraXnzxmGeZtqcRihqE5qGvNWbHRnlEiDlE6uWGXdTT9bHg/s640/Loh-10.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div style="text-align: justify;">
पायथ्यापासून आम्ही किल्ला चढायला सुरवात केली. जोराचा वारा आणि बारीक पाऊस असं एकंदरीत वातावरण होतं. किल्ल्यावर चढताना काही गोष्टी कायम लक्षात राहतात. सर्वप्रथम मला जाणवल्या त्या किल्ल्याच्या पायऱ्या.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGcVfwdsf3TCqR9ArZQpRpIrYiPhz35noehgYix7qKmleyau03gCa2BZrJ8iFNCIg7FWpRjmRyV9nywoQXq32C2sUHXB6x9MVwJrwFco-cZw-Ucxus0kqA-WLmVB2QW-VGoWOyBhVXzYlA/s1600/Loh-1.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em; text-align: justify;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhGcVfwdsf3TCqR9ArZQpRpIrYiPhz35noehgYix7qKmleyau03gCa2BZrJ8iFNCIg7FWpRjmRyV9nywoQXq32C2sUHXB6x9MVwJrwFco-cZw-Ucxus0kqA-WLmVB2QW-VGoWOyBhVXzYlA/s400/Loh-1.jpg" width="300" /></a></div>
<div style="text-align: justify;">
किल्ल्याच्या पायऱ्या रुंद होत्या पण तितक्याच उंच होत्या. प्रत्येक पायरी चढताना जरा जास्तीची मेहनत घ्यावी लागत होती. अश्या पायऱ्या (चढायला कठीण) असण्याचं काय कारण असावं याचा विचार केला तर एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे शत्रूसैन्याला गडावर हल्ला करताना गड चढणे कठीण जावे हाच यामागचा हेतू असावा. पायऱ्या असून सुद्धा त्या उंच पायऱ्या आणि उभी चढण आपल्याला दमवते. हजारो वर्षांचा इतिहास असलेला हा किल्ला नक्की कोणी बांधला याबद्दल अजून ठाम सांगता येत नाही. येथे राष्ट्रकूट, सातवाहन, चालुक्य, यादव अश्या राजवटी होत्या. तिथून पुढे जाताना अजून एक वैशिष्ट्य लक्षात येते ते म्हणजे किल्ल्याचे दरवाजे. किल्ल्याची मजबुती ही त्याच्या दरवाज्यांवरून लक्षात येते. ५-६ फूट रुंद आणि १४-१५ फूट उंच असे अवाढव्य दरवाजे बघताना किल्ल्याचा भव्यपणा जाणवतो. सर्वात पहिला दरवाजा लागतो तो म्हणजे "गणेश दरवाजा". दरवाजाच्या इथे गणपती बाप्पाची एक सुंदर छोटी मूर्ती आहे. म्हणूनच त्या दरवाज्याला गणेश दरवाजा असे नाव पडले असावे. गणेश दरवाज्यातून वर आल्यावर एक प्राचीन शिलालेख आढळतो. यात किल्लेदाराचे नाव कोरलेले आहे. त्यांचं नाव हे धोंडोपंत नित्सुरे, हे नाना फडणवीसांचे कारभारी होते. १४४९ मध्ये यादवांनंतर मलिक अहमदने निजामशाही स्थापन केली आणि तेव्हा लोहगडावर यावनी सत्ता आली. अहमद नगरचा दुसरा बुऱ्हाणशहा इथे कैदेत होता. १६४८ मध्ये लोहगड छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकला आणि मराठ्यांचा भगवा गडावर फडकला. नंतर पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोगलांना देण्यात आला. १६७० मध्ये महाराजांनी हा किल्ला पुन्हा जिंकून स्वराज्यात घेतला. या किल्ल्याचं आणखी एक ऐतिहासिक महत्व म्हणजे शिवरायांनी औरंगजेबाचं नाक ठेचून सुरत लुटून जी संपत्ती होती ती लोहगडावर ठेवली होती. लोह म्हणजे लोखंड, आणि लोखंडासारखा मजबूत असा हा लोहगड.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
गणेश दरवाजातून पुढे मजल दरमजल करत आम्ही आलो. महादरवाजा, नारायण दरवाजा असे पार करत करत शेवटचा दरवाजा म्हणजे "हनुमान दरवाजा". दरवाज्याच्या डाव्या बाजूला द्रोणागिरी पेललेल्या हनुमानाची मूर्ती आहे. हनुमान दरवाजा हा सर्वात जुना दरवाजा. बाकी दरवाजे हे पेशव्यांच्या काळात नाना फडणवीसांनी बांधल्याचे कळते. दरावाज्यातून पुढे येताना एक शिवमंदिर दिसते. गडावर ४५ पाण्याच्या टाक्या आहेत. सर्व बघता आल्या नाहीत पण एक सर्वात मोठी टाकी दिसली. ती टाकी पेशव्यांच्या काळात फडणवीसांनी बांधली असल्याचा शिलालेख त्यावर आहे. गडाच्या माथ्यावर आल्यावर म्हणजे साधारण २५००-३००० फुटांवर ढग अगदी जवळ होते. "ढगांवर स्वार होणे " या म्हणीचा प्रत्यय अशावेळी येतो.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglfBd6wl7S20lY5mQvr54FXBwphHq9ila3c-mGp14SBvEjzRPGXfXtocFsiVKtNvVbVAOZZj8MI-idUvDycarrpF06wsSn8toiVgjqMKf23KfMCDTOS8Mwl1p_34odkZHhTAQBXJrexQP8/s1600/Loh-9.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="610" data-original-width="1188" height="328" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEglfBd6wl7S20lY5mQvr54FXBwphHq9ila3c-mGp14SBvEjzRPGXfXtocFsiVKtNvVbVAOZZj8MI-idUvDycarrpF06wsSn8toiVgjqMKf23KfMCDTOS8Mwl1p_34odkZHhTAQBXJrexQP8/s640/Loh-9.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div style="text-align: justify;">
आम्हाला विंचूकाटा बघायचा होता पण ढगांची गर्दी, सोसाट्याचा वारा आणि पडणारा पाऊस हे दृश्य विलोभनीय होतं. विसापूर किल्ल्याच्या माथ्यावर ढगांची गर्दी बघता किल्ल्याला ढगांचा शिरपेच घातला असं वाटत होतं. पेशव्यांकडून जेव्हा लोहगड ब्रिटिशांनी जिंकला तेव्हा सर्वात आधी त्यांनी विसापूर जिंकला आणि विसापूर वरून लोहगडावर तोफा डागल्या. त्यामुळे लोहगड ब्रिटिशांना जिंकता आला.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
असा हा दणकट किल्ला, ज्याने वर येताना सर्वाना खूप दमवलं पण वर आल्यावर निसर्गाचं देखणं रूप कदाचित मस्तानीच्या देखणेपणापेक्षा सुंदर असावं असं होतं. हा प्रवास माझ्या आणि आमच्या ग्रूपमधील सहकार्याच्या नेहमी लक्षात राहील.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रथमेश तेंडुलकर</div>
<div style="text-align: justify;">
९८६९३७१५८०</div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJ6mX1rBcFduF8k43DyNU1mgvIwXr9Loe1HFn_q1QmyARPgRZuo6ZCTTgRr1JLnLVli2aGU4JQbZBkPkAAeP0gjhSmcPO7WgnhI2mykqeHSxWhyxy70U0E5FQnKGvbexiHPKsKroBwFKwQ/s1600/Loh-2.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1600" data-original-width="1200" height="400" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiJ6mX1rBcFduF8k43DyNU1mgvIwXr9Loe1HFn_q1QmyARPgRZuo6ZCTTgRr1JLnLVli2aGU4JQbZBkPkAAeP0gjhSmcPO7WgnhI2mykqeHSxWhyxy70U0E5FQnKGvbexiHPKsKroBwFKwQ/s400/Loh-2.jpg" width="300" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b>फोटो :- लोहगडावरून नजर ठेवण्याची जागा. खालून येणाऱ्या शत्रूला थोपवता यावं म्हणून वापरण्यात येत असे.</b> </div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4p5xoCseVz0MujvoCdE2sbXjAeUS4xLH9go32EShaf3mZ7EvKJLWRZB2dKVL93nu4MFBNGG7wx-gaXpu9rzU00FRlzen-zci7-zMo3TVEk70B_mEDruAWN5c2M0Bz0qyYWBSChpoLUk-5/s1600/Loh-3.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi4p5xoCseVz0MujvoCdE2sbXjAeUS4xLH9go32EShaf3mZ7EvKJLWRZB2dKVL93nu4MFBNGG7wx-gaXpu9rzU00FRlzen-zci7-zMo3TVEk70B_mEDruAWN5c2M0Bz0qyYWBSChpoLUk-5/s400/Loh-3.jpg" width="400" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b>फोटो :- लोहगडावरील दिशादर्शक फलक</b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7oQMdjCR0AK3jXNIrlZTve9DgDUG_gaHTaoYqQ4u1uzm5AAojhhYxwn1tenhRDBsnfO1KmvdhWk-iaj1zbWFNUsGKNInOjum4RSIdQen1GbrGY-tQq4cxAEghI3EvLm3AnDTB16obqoK-/s1600/Loh-4.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1200" data-original-width="1600" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEj7oQMdjCR0AK3jXNIrlZTve9DgDUG_gaHTaoYqQ4u1uzm5AAojhhYxwn1tenhRDBsnfO1KmvdhWk-iaj1zbWFNUsGKNInOjum4RSIdQen1GbrGY-tQq4cxAEghI3EvLm3AnDTB16obqoK-/s640/Loh-4.jpg" width="640" /></a></div>
<div style="text-align: center;">
<b>फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र</b></div>
<div style="text-align: center;">
<b><br /></b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTupWeFgu7QmV1NjFiOQ7h8LQHHDNOT4_jAUj5Cd94cpUzMyxBlLi6ElBH8MdvfQ-cUvgMtvxpTDszqBoBdWgBDYCpfGCXIsUDSVa4r7-yQSW8uWnTQaxmTmPkCUEshjQR8FESSWu7u06X/s1600/Loh-6.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="883" data-original-width="1600" height="352" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhTupWeFgu7QmV1NjFiOQ7h8LQHHDNOT4_jAUj5Cd94cpUzMyxBlLi6ElBH8MdvfQ-cUvgMtvxpTDszqBoBdWgBDYCpfGCXIsUDSVa4r7-yQSW8uWnTQaxmTmPkCUEshjQR8FESSWu7u06X/s640/Loh-6.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div style="text-align: center;">
<b>फोटो :- लोहगडावरून टिपलेले छायाचित्र</b></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOS2Ilph-SdLk4_GKordOuiBxAmV18VtTu-JKdyVbjYyz_IKVm8Bl8nC1ERUO688CKpaztKSR59CWwL9xoi7pPf_7LLfzZnxPTxQvuhboPUERvjw-sPWIOvikM03gqDG28Zm-qYTYcPssE/s1600/Loh-8.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="818" data-original-width="1600" height="326" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiOS2Ilph-SdLk4_GKordOuiBxAmV18VtTu-JKdyVbjYyz_IKVm8Bl8nC1ERUO688CKpaztKSR59CWwL9xoi7pPf_7LLfzZnxPTxQvuhboPUERvjw-sPWIOvikM03gqDG28Zm-qYTYcPssE/s640/Loh-8.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div style="text-align: center;">
<b>फोटो :- </b><span style="text-align: left;"><b>चैतन्य ग्रूप</b></span></div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-60921276894213187162018-06-05T01:36:00.001-07:002018-06-05T01:36:23.595-07:00वृक्षवल्ली आम्हा सोयरी... <div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
आज ५ जून, जागतिक पर्यावरणदिन. सहसा असे दिवस फक्त एका दिवसापुरतेच साजरे केले जातात. पर्यावरणदिनाच्या दिवशी अनेक जण फोटो काढण्यापुरते वृक्षारोपण कार्यक्रम करतात पण त्याच्यापुढे काय? लावलेल्या झाडांची योग्य काळजी घेतली जाते का? लावलेल्या झाडांपैकी किती झाडे जगतात हा कदाचित संशोधनाचा मुद्दा असेल. आज यावर लेख लिहिण्याचं कारण इतकंच की चैतन्य मित्रमंडळाच्या माध्यमातून गेले २ वर्ष आम्ही पर्यावरणाच्या दृष्टीने जे काम करतोय ते ठळकपणे आज दिसू लागलंय आणि तेच सर्वांसमोर यावं हाच या लेखामागचा उद्देश.<br />
<br />
चैतन्य ग्रूपतर्फे सामाजिक उपक्रम राबवताना पर्यावरणपूरक कोणते उपक्रम राबवता येतील यावर एक विचार झाला. वात्सल्य सोबत काम करताना सराफ काकांनी एक कल्पना सुचवली. बदलापूर येथे एक प्रस्तावित वृद्धाश्रमाची जागा होती. त्या जागेवर त्यांना वृक्ष लागवड करून त्यामध्ये वृद्धाश्रम बांधून त्या आजी-आजोबांचे शेवटचे काही दिवस निसर्गाच्या सानिध्यात जावे ही कल्पना होती. मग त्या जागेवर वर्ष २०१६ मध्ये साधारण ६० झाडांचे रोपण तिथे करण्यात आले. चैतन्य सोबत अजून २ ग्रूप आमच्या सोबत होते. पण ६० झाडांचे रोपण करताना त्यांची योग्य काळजी घेणं आणि त्यांना वाढवणं ही आमची जबाबदारी होती. चैतन्य ग्रूपने ही जबाबदारी गेली २ वर्ष निस्वार्थीपणे सांभाळली आहे. मध्यंतरीच्या काळात पाण्याच्या अभावाने २-३ रोपे मरण पावली पण इतर सर्व झाडे अत्यंत जोमाने वाढली. झाडांच्या वाढीसाठी लागणारे खत व इतर गोष्टी वेळेवर पुरवल्या गेल्या आणि २०१८ मध्ये वाढलेली झाडे बघता केलेल्या कामाचे, कष्टाचे चीज झाले. काही झाडांना तर छोटी छोटी फळं सुद्धा लागली होती. मध्यंतरी सराफ काकांनी तिथे एक आरोग्यसुविधा सुरु केली होती आणि त्याच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला मला बोलावले होते. तेव्हा सर्वांना आवर्जून ते त्या झाडांबद्दल सांगत होते. आम्ही ती झाडे कशी लावली, कोणत्या अडचणी आल्या, झाडांची काळजी कशी घेतली याच्याबद्दल बोलताना चैतन्यचं आणि माझं कौतुक करणाऱ्या सराफकाकांना ऐकलं की आमच्या कामाला अजून कोणाच्या पावतीची गरज वाटत नाही.<br />
<br />
२०१७ मध्ये चैतन्य ग्रूपच्या माध्यमातून पालघर जिल्ह्यात काही झाडांचे रोपण करण्यात आले. त्यावेळी तेथील शाळेतील विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे, झाडांचे महत्व समजावून सांगण्यात आले, झाडांची काळजी कशी घ्यायची याची माहिती देण्यात आली. ठराविक विद्यार्थयांमागे एक झाड या प्रमाणात झाडांचे रोपं करून त्याची काळजी घेण्याची जबाबदारी त्या मुलांवर सोपवण्यात आली. यातून २ गोष्टी आम्ही साध्य केल्या. एक म्हणजे वृक्षारोपण केले आणि दुसरं म्हणजे येणाऱ्या पिढीला वृक्षारोपणाचे महत्व समजावून सांगितले आणि त्यांचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांना देण्यात आली. आमच्यासोबतच आमचे हे बालमित्र पुढील काळात पर्यावरणाच्या दृष्टीने जागरूक राहतील याची काळजी आम्ही घेतली.<br />
<br />
<b><i>५ जूनला एक दिवस पर्यावरण दिवस एका दिवसापुरता साजरा न करता वर्षातले ३६५ दिवस पर्यावरणाचा समतोल राखण्याचे काम आपण सर्वांनी मिळून करण्याची गरज आहे.</i></b><br />
<br />
प्रथमेश श. तेंडुलकर<br />
चैतन्य मित्रमंडळ<br />
(९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)<br />
<br />
<b>** वृक्षारोपण करताना आणि २ वर्षांनंतर झालेली झाडांची वाढ याचे फोटो देत आहे.</b><br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_j4jqsFHz1fuZXl4FvIeI7Hg8KppnaRFpbAMfdpg4orulDibJ4Q07PqEF9jsMmJAJ_Nfb0Irkos_f00pc0MVu6CK275Yvb-xT-oiMOqVxdQO1KME4KILIxvTTOPVJ_meD8fdedyvRE791/s1600/tree10.JPG" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1100" data-original-width="1600" height="440" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh_j4jqsFHz1fuZXl4FvIeI7Hg8KppnaRFpbAMfdpg4orulDibJ4Q07PqEF9jsMmJAJ_Nfb0Irkos_f00pc0MVu6CK275Yvb-xT-oiMOqVxdQO1KME4KILIxvTTOPVJ_meD8fdedyvRE791/s640/tree10.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhB6SOXndjseLkFMBft1W-Kf1mDfFGQvhn4C5_GbaR-q5z75CEyA_JeRqNVHCEnc97_pQgYnjm4tuzGtygfg2gZ36sqUFRD3aDZ_0cTZEjvXAICD6sLf4p8mDl2ej605CRKWTceXOXKXlXL/s1600/tree18.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="1100" data-original-width="1600" height="440" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhB6SOXndjseLkFMBft1W-Kf1mDfFGQvhn4C5_GbaR-q5z75CEyA_JeRqNVHCEnc97_pQgYnjm4tuzGtygfg2gZ36sqUFRD3aDZ_0cTZEjvXAICD6sLf4p8mDl2ej605CRKWTceXOXKXlXL/s640/tree18.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1mqDNtzg0FFs3wlCibFTtxf5Pb4eWF5U4ElR7WmnXukE81AiIiTmVRjPlTjoRdTyyFivuH7xmnb1kz682S11LJs2xfzCIkHyAxCm7zBqb6YsjiITTCiWi3dXJ6PhlQCfO91kajynuU2R8/s1600/26112331_1650727341632562_7370535475789660513_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="605" data-original-width="813" height="476" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh1mqDNtzg0FFs3wlCibFTtxf5Pb4eWF5U4ElR7WmnXukE81AiIiTmVRjPlTjoRdTyyFivuH7xmnb1kz682S11LJs2xfzCIkHyAxCm7zBqb6YsjiITTCiWi3dXJ6PhlQCfO91kajynuU2R8/s640/26112331_1650727341632562_7370535475789660513_n.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7tlnikhlev2ybSLEL57K84_j6AauRrBTR_keee22gKoHpL6T6px0GB7wNullO8wLetF8fTzxRxlkpgAavHEbwIPluNzeSYoFY8Tf5lHYdCN5GzB7uAPfbGAETTc4cwUma7KQ0KgJJ2loK/s1600/26165398_1650727511632545_6448861790525114735_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="540" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh7tlnikhlev2ybSLEL57K84_j6AauRrBTR_keee22gKoHpL6T6px0GB7wNullO8wLetF8fTzxRxlkpgAavHEbwIPluNzeSYoFY8Tf5lHYdCN5GzB7uAPfbGAETTc4cwUma7KQ0KgJJ2loK/s640/26165398_1650727511632545_6448861790525114735_n.jpg" width="360" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRRcjjxGMOM6UyjZhS5QNgoVMyVHu2kDPNbw-Xm6SuqKmX3bXzvnro_HO7uMApmoeZr0_oJRuKQuajlTyNUV7HFyWaNptjLjHrRziN7C47KR2e8sA__UOw66lUYUn4gA3kWGx9UuCaXK_z/s1600/27654495_1698669350171694_1157894228879793103_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhRRcjjxGMOM6UyjZhS5QNgoVMyVHu2kDPNbw-Xm6SuqKmX3bXzvnro_HO7uMApmoeZr0_oJRuKQuajlTyNUV7HFyWaNptjLjHrRziN7C47KR2e8sA__UOw66lUYUn4gA3kWGx9UuCaXK_z/s640/27654495_1698669350171694_1157894228879793103_n.jpg" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiO_PSN-np_2sRgtvOCLyE6HSg-lqf7zS-4AAuuoPuSKaQs_Sv682SCtd2bYARYe8EwtxFOoBK7yqbUsYuFDQPyP3F6B-0iPdRzTbp3UDO5LDf9kZex7d6NO56tN4YvFea9OZVciolVWLsp/s1600/27657609_1698669303505032_123297126374115152_n.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="960" data-original-width="837" height="640" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEiO_PSN-np_2sRgtvOCLyE6HSg-lqf7zS-4AAuuoPuSKaQs_Sv682SCtd2bYARYe8EwtxFOoBK7yqbUsYuFDQPyP3F6B-0iPdRzTbp3UDO5LDf9kZex7d6NO56tN4YvFea9OZVciolVWLsp/s640/27657609_1698669303505032_123297126374115152_n.jpg" width="558" /></a></div>
<br /></div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-51614725102139477952018-03-31T05:28:00.000-07:002018-03-31T05:28:03.495-07:00प्रोजेक्ट :- अभ्यासिका<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
प्रोजेक्ट :- अभ्यासिका</div>
<div style="text-align: justify;">
अभ्यासिका आणि वर्गखोल्यांचे नूतनीकरण</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
चैतन्य मित्रमंडळातर्फे आम्ही जमेल तशी मदत आदिवासी पाड्यांमध्ये करत असतो. अशाच एका आदिवासी पाड्यातील शाळेला भेट देण्याचा योग २०१७ मध्ये आला. श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय, रावतेपाडा या शाळेत सर्व शिक्षक विनावेतन गेले १२ वर्ष आजूबाजूच्या गरीब मुलांना शिकवत आहेत. शाळेत मुलं ४-५ किलोमीटर लांबून पायी प्रवास करत येतात. या शाळेत भेट दिल्यावर आम्हाला अनेक गोष्टी निदर्शनास आल्या. आम्ही सर्व ज्या शाळेत शिकलो (कोणी मराठी माध्यमात तर कोणी इंग्रजी, वैयक्तिक मी मराठी माध्यमात शिकलो) तर शाळा म्हणजे वेगवेगळ्या वर्गखोल्या, बसायला बेंचेस, लाईट-पंखा याची सोय, प्रयोगशाळा, संगणक कक्ष इ. सोयी सुविधा असलेली, अभ्यासाला पोषक वातावरण असलेली शाळा आम्हाला अपेक्षित होती. पण या शाळेत आम्ही भेट दिल्यावर अनेक सोयीसुविधांचा अभाव आम्हाला जाणवला. वर्गांमध्ये बसायला बेंचेस कमी होते, पंखा-लाईट नव्हती, फ्लोरिंग खराब झाली होती असे अनेक प्रॉब्लेम होते.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
म्हणून चैतन्य ग्रुपतर्फे शाळेतील वर्गखोल्या आणि अभ्यासिकेच्या नूतनीकरणाचे काम आम्ही हाती घेतले. साधारण एका महिन्याच्या कालावधीत आम्ही शाळेतील <b>एक अभ्यासिका आणि ३ वर्गखोल्यांचे पुनरुज्जीवन केले. अभ्यासिकेत मुलांना वाचण्यासाठी ५० मराठी पुस्तके देण्यात आली. वर्गखोल्यांच्या फ्लोरिंग, कलरिंग सोबतच वर्गांमध्ये पंखे उपलब्ध करून दिले. सोबतच सर्वात महत्वाचं, शाळेत इ-लर्निंग सुविधा उपलब्ध करून दिली. खालील चित्रांमध्ये आपण ते पाहू शकता.</b></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjt2MbNfX80TwWjRZ0_YT9oCDc-qFJx_uxJG33qvImsnFtZb3UW9lwQ73z9-DDw742yvKYKUW7cJVmaqwMBcH6_Kg-IYcH6NFLZhTECvKgV1PJOJ8WKrQf4ttre3TslLBj1lfLNhKIfJ3H0/s1600/Slide1.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEjt2MbNfX80TwWjRZ0_YT9oCDc-qFJx_uxJG33qvImsnFtZb3UW9lwQ73z9-DDw742yvKYKUW7cJVmaqwMBcH6_Kg-IYcH6NFLZhTECvKgV1PJOJ8WKrQf4ttre3TslLBj1lfLNhKIfJ3H0/s640/Slide1.JPG" width="640" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8uBWW9M5dKcy_DijMGgbCL00POenJLkinXk4912tRuTcjv1MkNQrkJ6_pvyLy34MAaiViYjWWyQN8pPRuox33McY6IHs4i2rnqW-J1gTr0cbuNwgx2I1_MorVGCjyfDaE77fMpuac8VrX/s1600/Slide2.JPG" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="720" data-original-width="960" height="480" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEi8uBWW9M5dKcy_DijMGgbCL00POenJLkinXk4912tRuTcjv1MkNQrkJ6_pvyLy34MAaiViYjWWyQN8pPRuox33McY6IHs4i2rnqW-J1gTr0cbuNwgx2I1_MorVGCjyfDaE77fMpuac8VrX/s640/Slide2.JPG" width="640" /></a></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
शाळा जरी आदिवासी विभागातील असली तरी तिथल्या मुलांना शिक्षणाची प्रचंड आवड आहे. उनातून, पावसातून वाट काढत ४-५ किमी पायी प्रवास करून शाळेत येऊन शिकण्यासाठी जिद्द लागते, ती जिद्द त्या मुलांमध्ये आहे. आणि म्हणूनच चैतन्य ग्रुपतर्फे ज्या सोयीसुविधा आम्ही पुरवण्याचा प्रयत्न केला त्यातून नक्कीच मुलांच्या शिक्षणासाठी आणि एकूणच सर्वांगीण विकासासाठी मदत होईल. हा उपक्रम सफल व्हावा म्हणून चैतन्य ग्रुपला ज्यांनी ज्यांनी मदत केली त्या सर्वांचे शतशः आभार.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)</div>
<div style="text-align: justify;">
चैतन्य मित्रमंडळ</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<b>*आपल्यापैकी कोणालाही आमच्यासोबत पुढील उपक्रमात सहभागी व्हायचं असेल तर <span style="font-size: large;">९८६९३७१५८०</span> या क्रमांकावर संपर्क करावा. Whatsapp मेसेज केला तरी चालेल.</b></div>
<div style="text-align: justify;">
<b>** अधिक माहितीसाठी आमच्या फेसबुक पेजला भेट द्या</b> ( https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks )</div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-52817586540765802462018-03-19T00:16:00.000-07:002018-03-19T00:16:04.615-07:00मदतीचा हात..<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: center;">
<span style="font-size: large;"><b>प्रोजेक्ट :- आरोग्यम धनसंपदा</b></span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: center;">
<b><br /></b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: center;">
<b>पौष्टीक खाऊ उपक्रम</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: small;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही अनेक आदिवासी पाड्यांमध्ये मदत करतो. त्यातीलच एक पाडा म्हणजे रावतेपाडा. २०१७ मध्ये चैतन्य ग्रूप तर्फे पालघर जिल्ह्यातील या पाड्यामध्ये एक मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. आरोग्यसेवेबद्दल या लोकांमध्ये असलेला गैरसमज दूर करणे हा या शिबिरामागचा हेतू होता.</div>
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEih_eqfClE3VeI354OLWOz5BoVUtWqmpzypwMAtKjuQLBCvnzWiP5pr5mKh_CYJvswovoKcFkhlK7Omsckj5pbfqTAObnZ2kaeo47o8pwFUDDOw5UN_7Vq-WFOdksRe1Y-2hXPvydDCwcOL/s1600/21616506_704711809720551_7545949945653398077_n.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="650" data-original-width="960" height="270" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEih_eqfClE3VeI354OLWOz5BoVUtWqmpzypwMAtKjuQLBCvnzWiP5pr5mKh_CYJvswovoKcFkhlK7Omsckj5pbfqTAObnZ2kaeo47o8pwFUDDOw5UN_7Vq-WFOdksRe1Y-2hXPvydDCwcOL/s400/21616506_704711809720551_7545949945653398077_n.jpg" width="400" /></a></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
पण या शिबिरात अजून काही समस्या आम्हाला समजल्या. जसं की अनेक मुलं-मुली ४-५ किलोमीटर लांबचा प्रवास करून शाळेत येतात. गरिबी असल्यामुळे योग्य सकस आहार त्यांना मिळत नसल्याने कुपोषण संबंधी आजार आम्हाला त्या शिबिरात दिसून आले. यातून अशक्तपणा, अशक्तपणामुळे चक्कर येणे असे प्रकार होत होते. आणि या काही कारणांमुळे शाळेत यायचे प्रमाण कमी झाले होते. आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे आम्ही या विषयावर काम करायचे ठरवले.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
आमच्या ग्रूपमधील डॉक्टरांचा सल्ला घेऊन आम्ही शाळेतील सर्व १९५ विद्यार्थ्यांसाठी पौष्टीक सत्व असलेला खाऊ देण्याचा आठवडी तक्ता बनवला. सोमवार ते शनिवार प्रत्येक मुलाला-मुलीला एकएक खाऊ देण्याचे आम्ही ठरवले. समाजातील अनेक व्यक्तींनी या कल्पनेला साथ दिली. आणि १४ नोव्हेंबर २०१७ रोजी बालदिनाचे औचित्य साधून या उपक्रमाला सुरवात झाली. प्रत्येक दिवशी मुलांना काही ना काही खाऊ देण्यात आला. <b>गूळ-चणे, गूळ-शेंगदाणे, केळी, खजूर, उकडलेली अंडी यासोबतच पारले-जी चे बिस्कीट इ. खाऊ देण्याची व्यवस्था करण्यात आली.</b> या उपक्रमात श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालयाच्या सर्व शिक्षकांचे सहकार्य आम्हाला लाभले. स्वतःच काम सांभाळून त्यांनी आम्हाला या उपक्रमात मदत केली.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1GifbuOGO8WRUrVooLIEq-1BzQTCIqHYqPhLS2nVP3qA7s9tJnfCiaVTqrhKBOgW9at6BmS0jbMG8-e83byolESpjwxPwIiO4XIGbTwL_bdzlDTn7vlFEmnjZiqW7KLQ78ZrcXvA-rbQH/s1600/2017-11-14-22-03-03.jpg" imageanchor="1" style="clear: left; float: left; margin-bottom: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="774" data-original-width="1032" height="300" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEg1GifbuOGO8WRUrVooLIEq-1BzQTCIqHYqPhLS2nVP3qA7s9tJnfCiaVTqrhKBOgW9at6BmS0jbMG8-e83byolESpjwxPwIiO4XIGbTwL_bdzlDTn7vlFEmnjZiqW7KLQ78ZrcXvA-rbQH/s400/2017-11-14-22-03-03.jpg" width="400" /></a></div>
त्यानंतर १ जानेवारी २०८ पासून आम्ही शाळेच्या सहकार्याने या सर्व विद्यार्थ्यांना खाऊसोबतच आठवड्यातून एक दिवस खिचडी देण्याचा उपक्रम सुरु केला. नोव्हेंबर २०१७ पासून सुरु झालेला हा उपक्रम ४ महिन्याच्या अविरत कार्यानंतर आता एक टप्पा पूर्ण करून या उपक्रमाची सांगता करण्यात आली. <b>या उपक्रमातून नक्की काय साध्य झाले? नक्की कोणता फरक पडला? या सर्वाची चिकीत्सा करणारा हा लेख लिहून आम्ही आमचे कार्य तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहोत.</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
उपक्रम सुरु करताना आम्ही १९५ विद्यार्थ्यांचे वजन आणि उंची मोजली होती. सोबतच त्यांची आरोग्य तपासणी केली होती.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<b>४ महिन्याच्या या उपक्रमानंतर आम्ही पुन्हा वजन मोजले असता आणि आरोग्य तपासणी केली असता आम्हाला जे आढळले ते पुढील प्रमाणे :-</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
१) विद्यार्थ्यांचे सरासरी वजन २.५ किलो ने वाढले.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
२) अशक्तपणाशी निगडित आजार, डोकेदुखी, थकवा, चक्कर येणे इ. कमी झाले होते.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<b>डॉक्टरांशी बोलल्यानंतर हे वरील निष्कर्ष आमच्या समोर आले. त्याव्यतिरिक्त अनेक शिक्षकांशी बोलल्या नंतर अजून काही गोष्टी आम्हाला समजल्या.</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
१) ४-५ किलोमीटर उपाशीपोटी पायी प्रवास केल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चक्कर यायची. खाऊ आणि खिचडी यामुळे ते प्रमाण बंद झाले.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
२) अशक्तपणामुळे अभ्यासात लक्ष न लागणे इ. प्रकार कमी झाले.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
३) अनेक विद्यार्थी जे शाळेला दांडी मारायचे, असे विद्यार्थी शाळेत नियमित येऊ लागले. त्यामुळे शाळेतील पटसंख्या कमी होती ती वाढायला मदत झाली.</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
वरील सर्व निष्कर्ष पाहिल्यावर आपल्या सर्वांच्या लक्षात येईल की एक गोष्ट पूर्ण केली असता किती फरक दैनंदिन आयुष्यात पडतो. प्रोजेक्ट आरोग्यम धनसंपदा पूर्ण करणे हा चैतन्य ग्रूपसाठी एक आव्हान होते. तुलनेने मोठा प्रोजेक्ट यशस्वीरीत्या हाताळताना मला अनेक लोकांची मदत झाली <u>स्नेहा, वृषाली, गणेश इ. आमचे चैतन्यचे टीममेम्बर्स आणि त्यासोबतच शशिधर भट, मंगेश तेंडुलकर, अमुल्या तेंडुलकर इ. समाजातील अनेक व्यक्तींची झालेली मदत, तसेच श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय आणि सर्व शिक्षक यांचे सहकार्य, यामुळेच हा प्रोजेक्ट यशस्वीरित्या पूर्ण झाला.</u></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
ज्यांची ज्यांची या उपक्रमाला मदत झाली त्या सर्वांचे आभार. चैतन्यतर्फे असेच उपक्रम भविष्यात होत राहोत हीच ईश्वराचरणी प्रार्थना. त्यासाठी आम्हाला आपल्या मदतीची, सहकार्याची आणि आशीर्वादाची गरज आहे. <b>आपल्यापैकी कोणाला आमच्या ग्रूपसोबत या व इतर कामात सहभागी व्हायचं असेल तर ९८६९३७१५८० या क्रमांकावर संपर्क (WhatApp केलं तरी चालेल) करा. तसेच आमच्या फेसबूक पेज ला भेट देऊ शकता.</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
धन्यवाद. </div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१)</div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<b>चैतन्य मित्रमंडळ</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<span style="color: #222222; font-family: arial, sans-serif;">https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/</span></div>
</div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-35610968508197944202018-01-14T23:05:00.002-08:002018-01-14T23:10:28.600-08:00पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग २<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="text-align: justify;">
पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b>विश्वासराव पेशवे, महादजी शिंदे</b></h3>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
विश्वासराव आणि महादजी हे दोघेही पानिपतावर होते. अब्दालीच्या प्रचंड सैन्यासमोर मराठे उभे होते. त्यात भाऊसाहेब, इब्राहीमखान गारदी यांच्या सोबत अजून रणधुरंधर होते, विश्वासराव पेशवे आणि महादजी शिंदे. विश्वासराव हे अत्यंत तरुण होते म्हणजे अगदी १७-१८ वर्षाचे होते. विश्ववासराव हे दिसायला अत्यंत देखणे होते. त्यांच्या देखणेपणाबद्दल आजही बोललं जातं की <b>"स्त्रियांमध्ये देखणी मस्तानी आणि पुरुषात देखणे विश्वासराव." </b>यावरुन आपण अंदाज बांधू शकतो कि विश्वासराव दिसायला किती सुंदर असतील. पानिपतच्या युद्धात विश्वासरावांनी शौर्य गाजवलं पण त्यात ते धारातीर्थी पडले. विश्वासरावांचा देह जेव्हा अफगाणी सैनिकांनी पाहिला तेव्हा ते इतका तरुण, सुंदर देह मृत्यू पावलेला पाहून हळहळले. त्यांनी अब्दालीला सांगितलं, "आपण हा देह घेऊन अफगाणिस्तानला जाऊया. आणि या शरीरात पेंढा भरून त्याच जतन करूया." विश्वासरावांचा, त्यांच्या सौंदर्याचा मोह अफगाणांनासुद्धा आवरला नाही. महादजी शिंदे हे सुद्धा पानिपतच्या लढाईत होते पण ते जिवंत परत आले. त्यांच्या पायाला तलवार लागल्याने थोडी इजा झाली होती पण महादजी शिंद्यांच नाव एवढ्यासाठीच इथे घ्यावं की पानिपताच्या युद्धानंतर जवळपास १५-२० वर्ष महादाजीबाबांनी दिल्लीच्या गादीवर कोण बसेल हे ठरवलं. <b>महाराष्ट्र पानिपत युद्धानंतर खऱ्या अर्थाने किंग मेकर ठरला.</b></div>
<h3 style="text-align: left;">
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<b><div style="text-align: justify;">
<b>इब्राहीमखान गारदी</b></div>
</b></h3>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पानिपतच्या युद्धाला काही लोक धार्मिक रंग देतात जसे पानिपतचे युद्ध हे हिंदू विरुद्ध मुस्लिम असे होते पण मुळात ते युद्ध परकीय आक्रमक विरुद्ध भारतीय असे होते. हिंदू विरुद्ध मुस्लिम युद्ध असतं तर इब्राहीमखान भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढला असता का? पानिपत युद्धाच्या पराक्रमी वीरांची सुरवात जर भाऊसाहेब पेशव्यांपासून सुरु होत असेल तर इब्राहीमखानाचे नाव घेतले नाही तर यादी अपूर्णच राहील. इब्राहीमखान हा मराठ्यांच्या तोफखान्याचा प्रमुख होता. तो आधी फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा. कुकडी नदीच्या युद्धात नानासाहेब पेशवे आणि भाऊसाहेब यांनी इब्राहीमखानाचा पराक्रम स्वतः बघितला म्हणून त्याला या युद्धात आपल्यासोबत घेतले होते. इब्राहीमखानाचा तोफांचा मारा इतका जबरदस्त होता की पानिपतचे युद्ध सुरु झाले आणि पुढल्या तास-दोन तासातच अब्दालीच्या सैन्याला खिंडारं पडली. विजयश्रीची माळ मराठयांच्या गळ्यात पडणार असं वाटत होतं पण मराठे त्यावेळी मान थोडी उंचावायला कमी पडले आणि माळ तुटली.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
इब्राहीमखानाला अब्दालीने युद्धाच्या आधीच तू आमच्या पक्षात ये (पक्षांतर कर) असा सल्ला दिला होता पण त्याने तो साफ धुडकावून लावला. इतकंच नाही तर इब्राहीमखानाला कैद करून अब्दालीसमोर पेश करण्यात आले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. पण त्यावर फार सुंदर उत्तर इब्राहीखानाने अब्दालीला दिले. तो म्हणाला "आलंपना, भाऊसाहेब, आमचे धनी, यांनी पानिपतावर निघण्यापूर्वी मला वचन दिलेले की मी तुझासोबत मातीत पाय रोवून युद्धात उभा राहीन. माझे धनी वचनाला जागले, इतकंच नाही तर त्यासाठी धारातीर्थी पडले. आणि त्यांच्या पश्चात मी त्यांच्याशी प्रतारणा करू? नाही जमणार." इब्राहीमखानाचे हे बाणेदार उत्तर ऐकून अब्दालीने त्याला सोडून दिले. इब्राहीमखान परत जात असतानाच अब्दालीने त्याला थांबवले आणि विचारले, "इब्राहीम, तुम्हारे सारे सैनिक, सरदार मारे गाये. अब वापस जाकर क्या करोगे?" इब्राहीमखान म्हणाला, "कुछ नही हुजूर, परत जाईन, पुन्हा सैन्य गोळा करेन आणि अल्लातालाने मदत केलीच तर माझ्या धन्याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी अफगाणिस्तानावर हल्ला करेन, तुमच्यावर हल्ला करेन. आणि बदला घेईन." इब्राहीमखानाचे हे उत्तर ऐकून अब्दाली प्रचंड चिडला आणि त्याने इब्राहीमखानाला कैद करून त्याची खांडोळी करण्याचा हुकूम दिला. त्यानंतर इब्राहीमखानाच्या शरीराचे बारीकबारीक तुकडे करून गिधाडांना घालण्यात आले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पानिपतमध्ये मराठे जरी हरले तरी २२-२३ वर्षाच्या दत्ताजीचे <b>बचेंगे तो और भी लढेंगे</b> हे उत्तर जितके बाणेदार आहे, ज्यात शौर्य अमाप भरलेलं आहे तसंच इब्राहीमखानाच्या या उत्तरात त्याची भाऊंप्रती, मराठा साम्राज्याप्रती असलेली निष्ठा दिसून येते. अशी निष्ठा, शेवटपर्यंत साथ देणारी माणसं लाभणं ही मराठा साम्राज्याची, भाऊंची पुण्याई होती. यांची चरित्रे आपल्याला सदैव प्रेरणा देतील हे निश्चित.</div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-89029534247247111082018-01-13T03:45:00.000-08:002018-01-13T04:18:15.687-08:00पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<h3 style="text-align: justify;">
<b>पानिपतातील पराक्रमी योद्धे आणि शत्रू :- भाग १</b></h3>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
पानिपत म्हण़जे मराठी मनाची ओली जखम. <b>छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटल्यावर ज्याचा उर अभिमानाने भरून येत नाही आणि पानिपत म्हटलं की ज्याच्या हृदयाला वेदना होत नाहीत तो मराठी नाहीच. </b>पानिपत ही कादंबरी वाचताना आणि पानिपतावरील इतर महत्वाच्या गोष्टी वाचताना काही व्यक्तींचं आकर्षण वाटतं. सदाशिवरावभाऊ पेशवे, विश्वासराव पेशवे, जनकोजी शिंदे, महादजी शिंदे, शमशेर बहाद्दर, इब्राहीमखान गारदी इ. मरहट्टी मंडळी असो किंवा अहमदशाह अब्दाली आणि नजीबखान सारखे शत्रू असोत, सर्व तितकेच पराक्रमी होते. या सर्वांबद्दल वाचावं, लिहावं असं न वाटलं तरच नवल. १४ जानेवारी १७६१ मधील पानिपत युद्धातील त्या योध्यांचा घेतलेला हा एक आढावा.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b><u>दत्ताजी शिंदे</u></b></h3>
<div style="text-align: justify;">
१० जानेवारी १७६०, यमुनाकाठी मराठयांची छावणी लागली होती. मराठी सैन्य दैनंदिन काम करत असतानाच गिलच्यांनी मराठयांवर हल्ला चढवला. तोफा, बंदुका यांचा प्रचंड मारा होत होता. त्या मानाने मराठी सैन्याकडे शस्त्रे आधुनिक नव्हती. मराठी सैन्याच प्रमुख शस्त्र म्हणजे तलवारी, भाले आणि बंदुका पण त्या खूप कमी सैनिकांकडे होत्या. अचानक आलेल्या शत्रूला मराठे कडवा प्रतिकार करत होते. बुर्हाडी घाटावर जानराव वाबळे यांची तुकडी होती पण शत्रूच्या प्रचंड माऱ्यामुळे जवळपास १००-१५० सैनिक धारातीर्थी पडले. मराठी सैन्याची पीछेहाट होत होती आणि तेव्हाच दत्ताजी आपली फौज घेऊन आले, त्वेषाने लढू लागले. दत्ताजी शिंदेंचा कडवट प्रतिकार आणि अमर्याद शौर्य बघून कुतुबशाह आणि नजीबखान यांनी दत्ताजीला लक्ष केले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
दत्ताजी जरी त्वेषाने लढत असले तरी कितीवेळ लढणार बरं? शत्रूच्या गोळ्या लागून दत्ताजी घायाळ होऊन खाली पडले आणि शत्रूसैन्याने त्यांना चहूबाजूने घेरले. कुतुबशाह आणि नजीब हसत हसत त्याच्या समोर आले कारण एक शूर मराठा योद्धा पकडला गेला होता. कुतुबशाहने घायाळ दत्ताजीला हसत हसत विचारले, <b>"क्यू पटेल... और लढोगे?" </b>यावर दत्ताजी गरजले,<b> "क्यू नाही... बचेंगे तो और भी लढेंगे..."</b> त्यांच्या याउत्तरावर नजीबाने चिडून खाली उतरून दत्ताजींचं शीर धडावेगळं केलं. दत्ताजी धारातीर्थी पडले. त्या दिवशी अनेक मराठी सैनिकांची कत्तल झालेली. शत्रू समोर असतानासुद्धा, मृत्यू जवळ उभा असताना सुद्धा मराठी मुलखाचा स्वाभिमान, अभिमान, शौर्य दत्ताजीने दाखवले. "बचेंगे तो और भी लढेंगे" हे नाजिबाला आणि कुतुबशाहला दिलेलं नुसतं उत्तर नव्हतं तर मराठे शत्रूपुढे मायभूमीच्या संरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती द्यायला मागेपुढे बघणार नाहीत हा संदेश होता. अशा या शूर योध्याला शतशः प्रणाम.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<h3 style="text-align: justify;">
<b><u>भाऊसाहेब पेशवे</u></b></h3>
<div style="text-align: justify;">
सध्या पेशवे, पेशवाई हे शब्द महाराष्ट्राच्या राजकारणात जातीय पद्धतीने घेतले जातायत. राजकारण सोडलं तर पानिपतच्या युद्धात भाऊसाहेब पेशवे म्हणजेच सदाशिवरावभाऊ पेशवे यांनी प्रचंड मोठं शौर्य गाजवलं आहे. सदाशिवरावभाऊ पेशवे म्हणजे पानिपतवरील मराठी सैन्याचे प्रमुख नेतृत्व. पानिपतचे युद्ध म्हणजे विशेषतः तरुणांचं युद्ध होतं. भाऊसाहेब पेशवे साधारण तिशीच्या घरात होते, इतकच काय तर मराठयांचा शत्रू अहमदशाह अब्दाली सुद्धा तीस-पस्तिशीचा होता. विश्वासराव तर अगदीच तरुण, कोवळ्या वयाचे. भाऊसाहेब हे अत्यंत हुशार आणि युद्धशास्त्रात निपुण होते आणि म्हणूनच त्यांच्यावर पानिपतच्या युद्धाची जबाबदारी देण्यात आली होती. भाऊसाहेबांचा अजून एक वाखाणण्यायोग्य गूण म्हणजे दूरदृष्टी. पानिपतच्या युद्धातील पराभवाच्या कारणांपैकी एक कारण म्हणजे सैन्यासोबत असलेले व्यापारी, बाजारबुणगे इत्यादी लोकं आणि हेच कारण ओळखून मोहिमेच्या सुरुवातीलाच भाऊसाहेबांनी सैन्यसोडून इतर कोणालाही सोबत घेण्यास विरोध केलेला होता. पण भाऊसाहेबांचं न ऐकणं पुढे याच मराठी फौजेला महागात पडलं.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
सदाशिवरावभाऊंना माणसांची अचूक पारख होती. इब्राहिमखान गारदी हा त्यापैकीच एक. इब्राहीमखान हा फ्रेंचांच्या वखारीत काम करायचा आणि जुन्या एका लढाईत भाऊंना इब्राहीमखानाच्या तोफांनी जेरीस आणले होते. आणि म्हणूनच भाऊसाहेबांनी इब्राहीमखानाला त्याच्या तोफखान्यासकट आपल्यासोबत घेतले होते. याचा अर्थ हाच होता कि मैदानी लढाई करावी लागली तर त्याची पूर्वतयारी भाऊसाहेबांनी आधीच केलेली. पानिपतावर मैदानी लढाईला पर्याय नव्हता, कारण गनिमी कावा पद्धतीने लढण्यासाठी दऱ्या-डोंगर यांचा आडोसा घ्यावा लागतो आणि असे दरी-डोंगर पानिपतावर नाहीत. पानिपतच्या लढाईत भाऊंनी गोल पद्धतीच्या लढाईची व्यूहरचना केली होती आणि अब्दालीने तिरकस फळी , साधारण अर्ध-चंद्रकोरीच्या पद्धतीची व्यूहरचना केली होती. भाऊसाहेब पेशवे हे प्रत्यक्ष लढाईत सहभागी होते. लीड फ्रॉम द फ्रंट अशाप्रकारचं नेतृत्व भाऊसाहेबांचं होतं आणि अब्दाली मात्र रणांगणापासून ५-६ किलोमीटर लांबून दुर्बिणीने युद्ध पाहात होता. प्रत्यक्ष लढाईमध्ये जेव्हा लढायची वेळ आली तेव्हा मोठे मोठे, मातब्बर सरदार माघारी फिरले आणि त्यांनी भाऊसाहेबांना रणांगण सोडायचा सल्लादेखील दिला. पण आपली प्रजा, आपले सैनिक, आपले लोक मृत्यूच्या दाढेत सोडून जाणं जरी सहज शक्य असलं तरी भाऊसाहेबांना ते पटलं नाही. पानिपतच्या युद्धाच्या शेवटच्या टप्प्यात भाऊसाहेब स्वतः घोड्यावर स्वार होऊन शत्रूवर तुटून पडले होते. अगदी मोजकीच ५०-६० माणसांना घेऊन भाऊसाहेब लढत होते आणि त्यादरम्यान इब्राहीमखान गारदी जखमी होऊन पडला होता. ऐन युद्धात लढताना शत्रूच्या तोफेचा एक गोळा भाऊसाहेबांच्या मांडीवर लागला आणि भाऊसाहेब कोसळले. पण लगेचच भाल्याचा आधार घेऊन ते पुन्हा उठून लढू लागले. तेव्हा त्यांना शत्रुसैन्यातील ५ लोकांनी घेरले होते. जखमी अवस्थेतील भाऊसाहेबांनी त्या अवस्थेतसुद्धा ४ सैनिकांना कंठस्नान घातले आणि त्यावेळी भाऊसाहेब धारातीर्थी पडले.</div>
<div style="text-align: justify;">
<br /></div>
<div style="text-align: justify;">
नेतृत्व कसं असावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे भाऊसाहेब पेशवे. पानिपतच्या लढाईत महाराष्ट्राने अनेक वीर गमावले पण भाऊंसारखा कुशल सेनानी गमावण ही मराठी फौजेची कधीच न भरून येणारी हानी होती. भाऊसाहेब पेशवे दिलेल्या शब्दाला किती जागणारे होते याचं एक उत्कृष्ट उदाहरण पानिपत पुस्तकात आहे. युद्ध संपल्यानंतर अब्दालीच्या सैन्याने इब्राहीमखान गारदीला अटक करून दरबारात पेश केले. अब्दाली तसाही इब्राहीमखानाच्या पराक्रमावर बेहद खुश होताच पण त्याने त्याला म्हटले की आपण एकाच धर्माचे आहोत. तू आमच्यासोबत अफगाणिस्तानला चल. तिथल्या सैन्याचा सेनापती हो. त्यावर इब्राहीमखानाने जे उत्तर दिले त्यातून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंचा शब्दाला पक्के असण्याचा स्वभाव दिसतो. इब्राहीमखान म्हणाला, " आलमपनाह, भाऊसाहेबांनी मला युद्धाला निघताना वचन दिलेलं. काहीही झालं तरी पाय मातीत रोवून ते युद्धात उभे राहतील आणि आमची साथ सोडणार नाहीत. माझ्या धान्याने त्याचा शब्द पाळला, इतकंच नाही तर त्यासाठी आपला जीव सुद्धा पणाला लावला. आणि त्या पश्चात मी त्यांच्याशी गद्दारी करू? नाही जमणार." इब्राहीमखानाच्या या उत्तरावरून त्याची भाऊंप्रती असलेली निष्ठा आणि भाऊंची दिलेल्या वाचनाला जगण्याची वृत्ती दिसून येते. अशा या पराक्रमी, वीर सुपुत्राला मानाचा मुजरा.</div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-13830004319843460842018-01-08T00:12:00.001-08:002018-01-08T00:15:03.872-08:00चैतन्य - चला देऊ मदतीचा हात..... करू कुपोषणावर मात....<div dir="ltr" style="text-align: left;" trbidi="on">
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<b>पौष्टीक खाऊ उपक्रम</b></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
२०१७च्या बालदिनानिमित्ताने १२ नोव्हेंबर २०१७ पासून चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या पालघर जिल्ह्यातील आदिवासी विभागातील शाळेत पौष्टीक खाऊ देण्याचा उपक्रम सुरु केला. या उपक्रमाला आता २ हिने पूर्ण होत आहेत त्यानिमित्ताने घेतलेला आढावा.</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<b>पौष्टीक खाऊ उपक्रम का व कोणासाठी ?</b></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
सप्टेंबर २०१७ मध्ये आम्ही चैतन्य ग्रूपतर्फे श्री प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी आणि परिसरातील इतर मुला-मुलींसाठी मोफत आरोग्य शिबीर घेतले होते. या शिबिराचा मूळ उद्देश आजूबाजूच्या परिसरातील असलेल्या लोकांची तपासणी करणे, त्यांना योग्य मार्गदर्शन करणे आणि आरोग्यसेवेबद्दल विश्वास निर्माण करून जनजागृती करणे हा होता.<br />
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhnSax_d2oLr1OFpAigcSTSmuCIv90W92LpcHo_9TjUg-I6MpfwasZX3MAT6XRHVrQ4HnEtJ2jeKiozO6gymVZgrwJ_RSgpB01dXpVxdQvG7J1F85f38rnBWctIqaA1D6wJmQPOgm8dGMll/s1600/medical+camp1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="530" data-original-width="960" height="220" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEhnSax_d2oLr1OFpAigcSTSmuCIv90W92LpcHo_9TjUg-I6MpfwasZX3MAT6XRHVrQ4HnEtJ2jeKiozO6gymVZgrwJ_RSgpB01dXpVxdQvG7J1F85f38rnBWctIqaA1D6wJmQPOgm8dGMll/s400/medical+camp1.jpg" width="400" /></a></div>
<span style="font-size: 12.8px;"><br /></span>
<span style="font-size: 12.8px;">या उपक्रमातून आम्हाला अनेक गोष्टींची माहिती मिळाली, त्यातीलच एक म्हणजे शाळेतील असलेल्या मुला-मुलींमध्ये ८०% पेक्षा जास्त मुलांची वजन हे कमी होते (BMI calculation नंतर). अनेक मुला-मुलींमध्ये चक्कर येण्याचे प्रमाण जास्त होते. याची दोन प्रमुख कारणं होती,<b> १) सकस-पोषणयुक्त आहाराचा अभाव आणि २) भुकेल्यापोटी काही किलोमीटर शाळेसाठी केलेला प्रवास. </b>शाळेला सरकारी अनुदान नसल्याने शाळेत पोषण आहार योजना नव्हती आणि म्हणूनच चैतन्य ग्रूपतर्फे पोषण आहार नाही पण मधल्या सुट्टीत त्यांना पौष्टीक खाऊ देण्याचा विचार आम्ही केला. शाळेतील शिक्षकांनीसुद्धा यासर्वांसाठी आम्हाला सहयोग दिला आणि बालदिनाचे औचित्य साधून १२ नोव्हेंबर २०१७ पासून या उपक्रमाला सुरवात झाली.</span><span id="goog_192909647"></span></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<div>
<b>पौष्टीक खाऊ उपक्रमाचे स्वरूप</b></div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
पौष्टीक खाऊ उपक्रम करताना आम्ही चैतन्य ग्रूपमधील सर्व डॉक्टर्स आणि काही माझे आहारतज्ञ मित्र यांच्या सल्ल्यानुसार त्या मुला-मुलींना खाऊ म्हणून काय देता येईल याचा एक तक्ता तयार करण्यात आला. यामध्ये गूळ-चणे (कडधान्य), गूळ-शेंगदाणे, खजूर, केळी, ग्लुकोज बिस्किट्स इ. अनेक गोष्टींचा समावेश करण्यात आला आणि आठवड्याच्या प्रत्येक दिवशी मुलांना त्याचे वाटप करण्यात आले.<br />
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6sr7W1YZGeTrPsA_7MULU2BWmfDEqq3xNJR-Dku7LMUlEaVGEF75DZ2Mn_iJCtOsZMuwNHEA9vhua5-GHxRsmdmaB0svdhBVC5nMnJ5UUB7C6zwrJTGMFco8u8k9WX09dULP4a5RJyns4/s1600/nutrients+food+1.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="566" data-original-width="960" height="235" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEh6sr7W1YZGeTrPsA_7MULU2BWmfDEqq3xNJR-Dku7LMUlEaVGEF75DZ2Mn_iJCtOsZMuwNHEA9vhua5-GHxRsmdmaB0svdhBVC5nMnJ5UUB7C6zwrJTGMFco8u8k9WX09dULP4a5RJyns4/s400/nutrients+food+1.jpg" width="400" /></a></div>
<br />
<div class="separator" style="clear: both; text-align: center;">
<a href="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPJPahuO2wo90yVjR4ltJjEEaqmK2bV3voXGXw4K-aZLuYMMxJ_XhxM8xNF11SS79nrRfGBg0-CoWGeMTh70T711MeKQS_SLAmB5cZuER1GmwEzwrPWPcEYJ-rcAo1lKP5x9h3-CnEO1wh/s1600/nutrients+food+2.jpg" imageanchor="1" style="margin-left: 1em; margin-right: 1em;"><img border="0" data-original-height="563" data-original-width="960" height="233" src="https://blogger.googleusercontent.com/img/b/R29vZ2xl/AVvXsEgPJPahuO2wo90yVjR4ltJjEEaqmK2bV3voXGXw4K-aZLuYMMxJ_XhxM8xNF11SS79nrRfGBg0-CoWGeMTh70T711MeKQS_SLAmB5cZuER1GmwEzwrPWPcEYJ-rcAo1lKP5x9h3-CnEO1wh/s400/nutrients+food+2.jpg" width="400" /></a></div>
<br /></div>
</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<div>
<b>उपक्रमाचे फलीत - उपक्रमाचे यश</b></div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
कोणतीही चांगली गोष्ट घडायची असेल तर त्याला थोडा वेळ जावा लागतो. या उपक्रमाची सुरवात आम्ही १२ नोव्हेंबर २०१७ रोजी केली. त्यानंतर २४ डिसेंबर २०१७ रोजी पुन्हा सर्व मुलांचे वजन आणि इतर प्राथमिक तपासणी करण्यात आली. या तपासणीतून काही निष्कर्ष जे शाळेतील शिक्षक, विद्यार्थी आणि पालक यांच्याकडून नोंदवण्यात आले ते पुढील प्रमाणे :-</div>
<div style="font-size: 12.8px;">
१) शाळेतील विद्यार्थ्याचे वजन सरासरी २ किलोने वाढले. </div>
<div style="font-size: 12.8px;">
२) शाळेतील विद्यार्थ्यामध्ये दररोज कोणाला तरी चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार व्हायचे कारण त्या मुलांनी उपाशीपोटी केलेला प्रवास. पौष्टीक खाऊ उपक्रम सुरु केल्यानंतर चक्कर येणे, भोवळ येणे असे प्रकार बंद झाले.</div>
<div style="font-size: 12.8px;">
३) दिवसभर उपाशी असल्याने विद्यार्थ्याचं अभ्यासात लक्ष न लागणे असे अनेक प्रकार शिक्षकांच्या लक्षात आले होते पण या उपक्रमामुळे ते कमी झाले.</div>
<div style="font-size: 12.8px;">
४) सर्वात महत्वाचं, शाळेत विद्यार्थ्याच्या उपस्थितीत लक्षणीय वाढ झाली. आजकाल मराठी शाळा त्यात खेड्यातील शाळा बंद होत असताना या शाळेत मात्र मुलांची उपस्थिती वाढताना दिसली.</div>
</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<div>
<b>आभार :-</b></div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
उपक्रम यशस्वी होण्यासाठी आम्हाला अनेकांची मदत झाली.</div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
१) सर्वात आधी आभार मानावे तर प्रगट विघ्नेश शाळेतील शिक्षकांचे. शाळेतील शिक्षक हे स्वेच्छेने, एकही रुपया मानधन, पगार न घेता तिथे काम करत आहेत. त्यांचे मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. अनेक चांगले उपक्रम अयोग्य नियोजन आणि अयोग्य अंमल बजावणी यामुळे पूर्ण होत नाहीत पण शाळेतील शिक्षकांनी योग्य नियोजन करून हा उपक्रम पूर्ण केला. त्याबद्दल त्यांचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत.</div>
<div style="font-size: 12.8px;">
२) त्यानंतर अनेक लोकांनी या उपक्रमासाठी आम्हाला आर्थिक मदत केली. संयुक्त कोंकणी सभा पुणे या ग्रूपमधून अनेकांनी मदतीचा हात देऊ केला. प्रत्येकाची नावं इथे मी देऊ शकत नाही पण त्या सर्वांचे मनापासून आभार.</div>
<div style="font-size: 12.8px;">
३) त्यासोबतच श्री. शशिधर भट, श्री. संतोष कुमार शानभाग, श्री. गुजर सर इ. अनेकांनी काही मुलांचा खर्च स्वतः उचलला आणि मदतीचा हात दिला. त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. </div>
<div style="font-size: 12.8px;">
४) आणि चैतन्य ग्रूपच्या टीमच नाव घेतल्याशिवाय हि यादी पूर्ण होणारच नाही. टीम चैतन्य म्हणून काम करताना सर्वानी एकत्रित प्रयत्न करून हा उपक्रम पूर्ण केला त्याबद्दल चैतन्य ग्रूपला शुभेच्छा.</div>
</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<div>
<b>पुढील वाटचाल :-</b></div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
पौष्टीक खाऊ उपक्रमासोबतच विद्यार्थी, पालक आणि श्री प्रगट विघ्नेश विद्यालय यांच्या सहमतीने आणि सहकार्याने जानेवारी महिन्यापासून प्रत्येक आठवड्यातून एक दिवस सर्व विद्यार्थ्यांना खिचडी सुद्धा देणार आहोत. या उपक्रमात आम्हाला सौ. अमुल्या मंगेश तेंडुलकर, श्री. राजाध्यक्ष सर आणि श्री. गवाणकर सर यांची मोलाची मदत झाली आहे. खिचडी हा उपक्रम आम्ही जानेवारी आणि फेब्रूवारी हे दोन महिने राबवणार आहोत. तसेच शाळेतील परीक्षा कालावधी लक्षात घेता पौष्टीक खाऊ उपक्रम सुद्धा १५ मार्च २०१८ नंतर थांबवण्यात येईल.</div>
<div style="font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="font-size: 12.8px;">
<b>जून २०१८ पासून हे दोन्ही उपक्रम (पौष्टिक खाऊ आणि खिचडी उपक्रम) पुन्हा राबवण्यात येतील.</b></div>
</div>
<div style="background-color: white; color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="background-color: white;">
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
हे दोन्ही उपक्रम जून २०१८ पासून, शाळा सुरु झाल्यानंतर पुन्हा नियमितपणे सुरु होतील. आपणही या उपक्रमात सहभागी होऊ शकता त्यासाठी मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्र. वर संपर्क करू शकता. </div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<b>धन्यवाद.</b></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<b> प्रथमेश श. तेंडुलकर (९८६९३७१५८०)</b></div>
<div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif;">
<b>चैतन्य मित्रमंडळ</b></div>
<div style="font-size: 12.8px;">
<span style="color: #999999; font-family: "courier new" , "courier" , monospace;"><br /></span></div>
<div style="font-size: 12.8px;">
<span style="color: #0b5394; font-family: "courier new" , "courier" , monospace;">Visit our Fb page for more details....👇</span></div>
<div style="color: #222222; font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px;">
<br /></div>
<span style="color: #222222; font-family: "arial" , sans-serif;"><span style="font-size: 12.8px;">https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=bookmarks</span></span></div>
</div>
</div>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-89130195775041700302017-10-13T08:20:00.001-07:002017-10-13T08:20:23.088-07:00दिवाळी आणि फटाके<p dir="ltr">जसं दिवाळी आणि दिवे, दिवाळी आणि रांगोळी, दिवाळी आणि फराळ ह्याच अतूट नातं आहे तसंच दिवाळी आणि फटाक्यांच सुद्धा एक अतूट नातं आहे. लहानपणी अजिबातच फटाके वाजवले नाहीत असे फारच कमी लोक सापडतील. लहान मुलांना फटाक्यांच एक विशिष्ट आकर्षण असतं, मला सुद्धा होतं. माझ्या लहानपणी बाबा मस्जिद बंदरवरुन होलसेल रेट मधे फटाके घेऊन यायचे आणि मग घरी आम्हा दोन भावांमध्ये समसमान वाटणी व्हायची. फुलबाज्या, अनार, भुईचक्र आणि लवंगी एवढेच काय ते फटाके आम्ही वाजवले. खूप मजा यायची. दिवाळीच्या पहिल्या दिवशी लवकर, पहाटे उठा, अभ्यंगस्नान करा, देवाची पूजा करा, देवासमोर फराळ ठेऊन मग त्यावर यथेच्छ ताव मारा. एवढ सगळं झालं की मग फटाके घेऊन फोडायला आम्ही मोकळे. एक वेगळाच आनंद मिळायचा त्यात. बरं तुम्ही म्हणाल आज ह्यावर का बोलतोय ? कारण इतकंच आहे की फटाकेबंदीचा निर्णय आला आणि एक विचार सहज डोक्यात आला की आमच्या लहानपणी अशी बंदी असती तर? ह्या छोट्या छोट्या गोष्टीतला आनंद आम्ही घेतला असता का? उत्तर "नाही" असंच आहे.</p>
<p dir="ltr">दिल्ली न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार दिल्लीमधे दिवाळीचे ५ दिवस आणि नंतर काही दिवस (१०-१५ दिवस) फटाके वाजवणे आणि निवासी भागात फटाके विकणे ह्यावर बंदी केली. आणि ह्याच बंदीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुद्धा असा कायदा करायचा सरकारचा विचार असल्याचे आपले मंत्री म्हणाले. मुळातच सरसकट बंदीला माझा विरोध आहे. कुठलीही बंदी सरसकट असू नये. हो त्यावर काही निर्बंध असावेत जेणेकरून काही चुकीच्या गोष्टींना आवर घालता येईल. पण आजकाल आपण बघतोय सणांच्या वेळी, विशेषतः हिंदू सणांमध्ये काही चुकीच्या गोष्टींना आळा घालण्यासाठी उत्सव साजरे करण्यावर बंदी येतेय आणि हेच चुकीचे आहे. विषय दिवाळीचा आहे तर तेवढ्यापुरतच बोलतो. आज ही बंदी येण्याच किंवा होईल भविष्यात, त्याच कारण काय, तर प्रदूषण (हवेच, आवाजाच), वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती ह्यांना होणारा त्रास. खरं आहे, दिवाळीच्या ५ दिवसात खूप फटाके फोडले जातात, खूप आवाज होतो, पण ह्यावर बंदी हा एकमेव पर्याय नाही ना. चायनीज फटाके आज बाजारात खूप स्वस्त आणि खूप मोठ्या प्रमाणात विकले जातात. एका सर्वे नुसार चायनीज फटाके हे आपल्या देशी फटाक्यांपेक्षा अधिक म्हणजे जवळपास दुप्पट प्रदूषण करतात. असे फटाके आज सर्रास विकले जातात. मुळातच चायनीज फटाके भारतात विकायला परवाना नाही तरी कायदा मोडून ते विकले जातात. ह्यावर कंट्रोल कोण करणार?</p>
<p dir="ltr">बरं प्रदूषण प्रदूषण आपण म्हणतोय तर त्यावर जरा बोलू. दिल्लीमधे प्रदूषण मंडळाने एक वर्ष सर्वे केला. त्यातून असे निष्पन्न झाले की सोमवार ते शुक्रवार ह्या दिवशी दिल्ली मधे सरासरी ८०% हवेचे प्रदूषण झाले. शनिवार-रविवार मिळून सरासरी ६०-६५% हवेचे प्रदूषण झाले. आणि दिवाळीच्या ५ दिवसात सरासरी ८४% हवेचे प्रदूषण झाले. ह्याचाच आधार घ्यायचा झाला तर दिवाळीतील हवेचे प्रदूषण हे सरासरी ४% ने वाढले. मग उरलेल्या ८०%च काय ? ते कमी करण्यासाठी आम्ही काय केलं ? आज डिजेल, पेट्रोलच्या गाड्या प्रदूषण करत नाहीत का? आज मुम्बई मधे अनेक सधन एका कुटुम्बामागे 2 चारचाकी व 1 दुचाकी वाहनाची नोंद होते. ह्याला आवर कोण घालणार? आज दुचाकी-चारचाकी वाहनांच्या वापरावर आपण निर्बंध घालू शकत नसताना फटाके बंदीची मागणी करणं म्हणजे निव्वळ दुटप्पीपणा आहे. वाहनातून होणारे प्रदूषण रोखण्यासाठी आज इलेक्ट्रिक कार किंवा बाईकचा पर्याय आहे, लहान अंतर सायकलने किंवा चालत जाऊ शकतो, असे अनेक उपाय करता येतील. प्रत्येक कुटुम्बावर गाडी खरेदी करताना निर्बंध घातले जाऊ शकतात, असे अनेक उपाय करु शकतो पण सरकारची ती इच्छाशक्ति आहे का? की ह्या गाड्या प्रदूषण करतात म्हणून त्यांच उत्पादन बंद करणार?</p>
<p dir="ltr">राहिला फटाक्यांचा प्रश्न, तर त्यावर तोडगा नाही निघू शकत ? जसं चायनीज फटाके जे जास्त प्रदूषण करतात, मोठ्या आवाजाचे फटाके जे ध्वनीप्रदूषण करतात, ह्यावर बंदी लादून इतर फटाके लोकवस्ती सोडून एखादं मैदान घ्यावं जिथे हे फटाके फोडावेत. हे आपण रेग्युलेट करु शकत नाही का? बाहेरच्या देशात (न्यूझीलँड इ.) फटाके वाजवायला एक मोकळं मैदान असतं, जिथे परवानगी असलेलेच फटाके फोडता येतात. मग हे आपल्या देशात आपण का करु शकत नाही? तत्सम गोष्टींना सरसकट बंदिचे नियम लावण्यापेक्षा काही मध्यममार्ग काढले तर पर्यावरण आणि लोकभावना दोन्हीचा समतोल राखता येईल, असं मला वाटत. कारण एका बाजूला विकास पाहिजे म्हणून मेट्रो साठी हजारो झाडे तोडायला निघालेले लोकांना पर्यावरण रक्षणाची शपथ देत फटाके बंदीची मागणी करतात तेव्हा हसावं की रडावं हाच प्रश्न उरतो. बाकी आपण सूज्ञ आहातच.</p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com1tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-11547816588239241842017-08-31T04:40:00.001-07:002017-08-31T04:40:28.383-07:00रोज मरे त्याला कोण रडे...<p dir="ltr">२६ जुलै २००५, मुम्बईच्या इतिहासातील एक काळा दिवस. मिठी नदीला आलेला पूर आणि सतत पडणारा पाऊस. जीवितहानि, वित्तहानि असं कितीतरी घडलं होतं त्या दिवशी. तब्बल ९००मीमी पाऊस पडला आणि कधी न मंदावणारी मुम्बई थाम्बली होती. आता तुम्ही म्हणाल की ह्या दिवसाची आठवण हा का बरं करून देतोय? ह्या दिवसाची आठवण कोणालाच नकोय पण २ दिवसापुर्वी म्हणजे २९ ऑगस्ट २०१७ रोजी असाच पाऊस इथे पडला आणि सर्वांना २६ जुलैची आठवण झाली. सकाळपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी अगदी थैमान घातले आणि परिणामी मुम्बई भरली, पावसाच्या पाण्याने. ट्रेन थाम्बल्या, गाड्यांचा वेग मंदावला. दुपारी गुढगाभर असलेलं पाणी संध्याकळी कमरेपर्यँत आलं. नंतर पाऊस जसा थाम्बला तसं ते ओसरल पण तब्बल ८-९ तास ह्या पावसाच्या पाण्यात मुंबईकर अडकला होता.</p>
<p dir="ltr">दरम्यानच्या काळात अनेकांनी मदतीचे हात पुढे केले. जाती, धर्म विसरून सर्व एकमेकांना मदत करत होते ते फक्त मुंबईकर म्हणून. दुसऱ्या दिवशी मुम्बई पुन्हा त्याच वेगाने कामाला लागली. सर्वांनी मुंबईकरांच कौतुकसुद्धा केले. बघा, स्पिरिट बघा. मुंबईकरांच स्पिरिट ह्यावर रकानेच्या रकाने भरून लेख आले. पण कसले स्पिरिट आणि कसलं काय. खरंतर हा नाईलाज आहे मुंबईकरांचा. एक वर्ष दाखवा की मुम्बईमधे गुडघाभर पाणी साचल नाही, रस्त्यांना खड्डे नाहीत. असं एक वर्ष दाखवा फक्त. बरं भौगोलिक परिस्थिती आहे सर्व मान्य आहे पण आता जरा facts वर बोलुया. २००५ साली ९००मिमी पाऊस पडला आणि २९ ऑगस्ट २०१७ला जवळपास ३००मिमी. म्हणजे तब्बल ६००मिमी पाऊस कमी पडला. पण ह्या ३००मिमी पावसाने मुम्बई कमरेभर "भरून दाखवली" पण जर ९००मिमी पडला असता तर त्याने मुम्बई "बुडवून दाखवली" असती. ह्याची कल्पना करून बघा. असं काही झाल की एकतर भौगोलिक स्तिथि किंवा मग मुम्बईकर लोकांनी केलेला कचरा असं म्हणून त्यांच्यावर खापर फोडायला आम्ही मोकळे. कचरा हे एक कारण आहेच ह्या सर्वाचे पण त्यापेक्षाही जास्त ढिसाळ व्यवस्थापन आहे. जागोजागी मेट्रोमुळे पडलेले खड्डे, रस्त्यावर तर रस्ता तसाही दिसत नाही, खड्डेच खड्डे ह्यामुळे पावसामुळे त्रासलेल्या मुम्बईचा वेग खड्ड्यात गेला.</p>
<p dir="ltr">मग आपण म्हणणार की पाऊसच इतका पडला त्याला आम्हीतरी काय करणार? बरोबर ना साहेब. पावसाने त्याच्या पद्धतीने पडून दाखवलं पण त्या आधी व्यवस्थापन नीट करून आपण का नाही दाखवलं? आता पाऊस काय तुम्हाला विचारून पडणार का? की बाबा झाली का तयारी? पडू का आता? नाही ना? प्रत्येक शहराची एक आपत्ति व्यवस्थापन नावाचा प्रकार असतो. काही वर्षापूर्वी चेन्नई मधे असाच पाऊस पडला. चेन्नई अगदी पाण्याखाली गेलेलं. त्यानंतर ते चिखलफेक नाही करत बसले. त्यांनी एक अभ्यास कमिटी बसवली. त्या कमिटीने एक रिपोर्ट दिला आणि त्यात म्हटले होते की हवामानात होणारे बदल ह्यामुळे आता पावसाचे प्रमाण वाढेल आणि किमान २००मिमी पाऊस दरवर्षी पडण्याची शक्यता वर्तवली होती. २००५ ते २०१७, तब्बल १२ वर्षे झाली तरी आपण ह्यातून काही धडा घेत नाही. ३५०००कोटी वार्षिक बजेट असलेली आमची महापालिका नक्की करतेय काय? आमच्या घरात डेन्ग्यूच्या अळ्या सापडल्या की आपण आमच्यावर कारवाई करणार मग रोज खड्ड्यात जाऊन येऊन ज्यांना मणक्याचे, पाठीचे आजार झालेल्या लोकांनी महापालिकेला का दोषी ठरवू नये. तुम्बलेल्या पाण्यातून लेप्टो सारखे आजार पसरून ज्यांना त्याचा त्रास होईल त्याची नैतिक जबाबदारी महापालिका घेणार काय?</p>
<p dir="ltr">बॉम्बस्फोट असो, आतंकवादी हल्ला असो किंवा हे कालसारखी तुम्बलेली मुम्बई असो, मुम्बईकर आपलं स्पिरिट नेहमीच दाखवतात. त्याबद्दल मुम्बईकरांना सलाम. पण किती वर्ष हे स्पिरिट दाखवायच? ह्या स्पिरिटमधे नाईलाज आहे. मुम्बईची ही अवस्था पाहता एकच म्हणावं लागेल, "रोज मरे त्याला कोण रडे?"</p>
<p dir="ltr">---- एक मुम्बईकर</p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-37691347444488077142017-07-27T23:52:00.001-07:002017-07-27T23:52:38.557-07:00आरोग्यम धन संपदा....<p dir="ltr">आरोग्यम धन संपदा</p>
<p dir="ltr">मागच्या एका ब्लॉग मध्ये मी पालघर जिल्ह्यातील आदिवासी पाड्यात असलेल्या अंधश्रद्धेविषयी माहिती दिली होती. मेडिकल ट्रीटमेंटच्या अभावी कशाप्रकारे एका मुलीला आपला जीव गमवावा लागला ह्याची माहिती मी दिली होती. (त्या ब्लॉगची लिंक मी देत आहे दुर्दैव.... http://prathamesh10dulkar.blogspot.com/2017/07/blog-post.html ) ह्यावर आमच्या ग्रुप मार्फत काही करता येईल का हे मी पाहात होतो. त्यासाठी मी काही डॉक्टर्स सोबत चर्चा केली. काही सामाजिक संस्थांसोबत चर्चा केली. त्यानंतर एका निष्कर्षाप्रत मी पोहोचलो.</p>
<p dir="ltr">त्यातील आरोग्यासंबंधीचा मुद्दा मी आपल्या समोर मांडत आहे. सप्टेंबर महिन्यात आम्ही त्या विभागात एक आरोग्य शिबीर करणार आहोत. ह्या आरोग्य शिबिरात शाळेतील व गावातील इतर मुलांची तपासणी करण्यात येईल. त्याचे रेकॉर्डस् आमच्याकडे ठेवण्यात येतील. त्या रेकॉर्डस् नुसार तिथे एक फॉलोअप घेतला जाईल. त्यासाठी महिन्यातून एकदा डॉक्टर्स तिथे जातील आणि तपासणी करतील. काही मेजर आजार दिसला तर त्यांचे उपचार करण्यासाठी मदत करण्यात येईल. आरोग्य सोबतच त्या गावकऱ्यांच्या मनातील अंधश्रद्धा काढून टाकण्यासाठी काही वर्कशॉप्स, लेक्चर्स सुद्धा आम्ही करणार आहोत. साधारणतः मेडिकल ट्रीटमेंटला नकार हा ३ गोष्टींमुळे दिला जातो. १) अंधश्रद्धा, २) भीती आणि ३) उपचारांसाठी लागणाऱ्या पैशांची कमी. ह्यातील मुद्दा क्रमांक १ आणि २ ह्या दूर करण्यासाठी आपले लेक्चर्स, वर्कशॉप्स हे उपयोगी पडतील. तसेच मेडिकल ट्रीटमेंट नंतर जे काही लोक बरे होतील तसं त्यांच्या मनातून ह्या गोष्टी हळू हळू कमी होतील. पण ह्या गोष्टीला बराच वेळ द्यावा लागेल. राहिला मुद्दा क्रमांक ३, पैशांची कमतरता. आजूबाजूच्या विभागातले लोक हे दैनंदिन रोजावर काम करतात. वीटभट्टी वैगरे वरती ते कामाला आहेत. त्यामुळे उत्पन्नाचे साधन हे अत्यंत कमी आहे. त्यासाठी म्हणून गावातील गरजूंना, विशेषकरून स्त्रियांच्या हाताला काम कसे मिळवून देता येईल ह्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत. जेणेकरून त्यांनी बनवलेल्या वस्तूंना मुंबई, पुणे सारख्या शहरात मार्केट उपलब्ध करून देता येईल आणि त्यातून त्यांच्या उत्पन्नाची सुरुवात होईल. सुरवात हि अगदीच मोठी नसेल, पण काही दिवसातच हि लहानशी सुरुवात मोठी व्हायला वेळ सुद्धा लागणार नाही. </p>
<p dir="ltr">हे काम आमच्या एका ग्रूपमार्फत करताना आम्हाला समाजातील विविध संस्थांची, व्यक्तींची गरज आहे. जे ह्या उपक्रमात आपापल्या परीने जी मदत करू शकतील ती मदत अपेक्षित आहे. आपण डॉक्टर असाल तर तुम्ही महिन्यातून १ दिवस (रविवार) ह्या कामासाठी देऊ शकता. आपण एखाद्या संस्थेचे सदस्य असाल तर संस्थे मार्फत आरोग्य शिबिराला मदत करू शकता. वैयक्तिकरित्या आपण आरोग्य शिबिरात होणाऱ्या, पुढील फॉलोअप मधील येणाऱ्या खर्चाचा वाटा तुमच्यापरीने उचलून, श्रमदान करून आम्हाला मदत करू शकता.</p>
<p dir="ltr">बाबा आमटेंचं एक फार सुंदर वाक्य ह्या निमित्त्ताने मला आठवलं. " निःस्वार्थ सेवा हा सामाजिक कार्याचा आत्मा असतो". आपली मदत हि आमच्यासाठी आणि त्यापेक्षाही जास्त समाजातील त्या दुर्बल घटकांसाठी अमूल्य असेल. आपल्याला आमच्यासोबत ह्या कार्यात सहभागी व्हायचं असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करा.</p>
<p dir="ltr">धन्यवाद. </p>
<p dir="ltr">प्रथमेश श. तेंडुलकर (चैतन्य मित्रमंडळ)<br>
संपर्क :- <a href="tel:9869371580">९८६९३७१५८०</a> (Whatsapp वर उपलब्ध) / <a href="tel:7039464291">७०३९४६४२९१</a></p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-8589736609771567962017-07-23T20:59:00.001-07:002017-07-23T20:59:48.202-07:00वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...<p dir="ltr"><b>#वृक्षवल्ली आम्हा सोयरी - २०१७...</b></p>
<p dir="ltr">चैतन्य मित्रमंडळातर्फे गेल्या 3 वर्षात अनेक उपक्रम करण्यात आले. त्यातील एक महत्वाचा उपक्रम म्हणजे वृक्षारोपण. जुलै २०१६ मधे वात्सल्य ट्रस्टच्या व्रुद्धाश्रमाच्या जागेवर आम्बा, साग, वड अश्या एकूण ५५-६० झाडांचे रोपण आम्ही केले होते. हा आमच्या ग्रूप तर्फे केलेला पहिला वृक्षारोपण कार्यक्रम. तेव्हा सांगितल्याप्रमाणे वर्षभर आम्ही त्या झाडांची नीट काळजी घेतली आणि त्याचा परिणाम म्हणजे लावलेल्या झाडान्पैकी १००% झाडे जगली.</p>
<p dir="ltr">गेल्यावर्षीप्रमाणे ह्या वर्षीसुद्धा आम्ही <i><b>( </b></i><i><b>चैतन्य</b></i><i><b> </b></i><i><b>मित्रमंडळ</b></i><i><b> - बाळशिवाजी </b></i><i><b>ग्रूप</b></i><i><b> - </b></i><i><b>स्वराज्य</b></i><i><b> ग्रूपतर्फे )</b></i> २३ जुलै २०१७ रोजी वाशिन्द येथील रावतेपाडा येथील प्रगट वीघ्नेश माध्यमिक शाळेच्या परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. जाम्भूळ, आम्बा, पारिजातक अश्या एकूण ५५ झाडांचे रोपण आम्ही केले. तीनही ग्रूप मिळून काम करतानाचा हा अनुभव खूप मस्त होता.</p>
<p dir="ltr">ह्या झाडांचे रोपण करताना एक अभिनव कल्पना आम्ही राबवली. <b>प्रत्येक</b><b> झाडाला शिवाजी महाराजांच्या </b><b>एक</b><b> </b><b>एक</b><b> गडाचे </b><b>नाव</b><b> आम्ही दिले.</b> रोपण करताना आणि त्या आधी मुलांना प्रत्येक गडाबद्द्ल माहिती दिली गेली. गडांचा इतिहास आणि महत्व सांगण्यात आले. ह्याचा उद्देश एकच होता, तो म्हणजे आपल्या महाराजांचा इतिहास, गडकिल्ल्यांची माहिती एका पिढी कडून दुसऱ्या पिढी पर्यंत पोहोचवणे आणि आपला वारसा, वैभव जतन करणे. गडकोट हे आपले वैभव आहे, महाराजांनी केलेल्या पराक्रमाचे साक्षीदार आहेत. ह्याच गडकिल्ल्यांच्या संवर्धनाचा मेसेज आम्ही लोकांना देण्याचा एक प्रयत्न केला.</p>
<p dir="ltr">वृक्षारोपण झाल्यावर पुढील उपक्रमाची आखणी व त्यावर चर्चा करण्यात आली. त्याबद्दल वेळोवेळी आपल्याला कळवले जाईलच. प्रत्येक उपक्रमात आमचा ग्रूप थोडा थोडा वाढतोय. <b>प्रतिपदेचा </b><b>चंद्र</b><b> जसे कलेकलेने वाढतो </b><b>तसंच</b><b> </b><b>चैतन्य</b><b> </b><b>मित्रमंडळ</b><b> ह्या ३ </b><b>वर्षात</b><b> कलेकलेने </b><b>वाढलय</b><b>. सुरूवतीला १० हातांनी (५ व्यक्ती) होणारी </b><b>मदत</b><b> </b><b>आज</b><b> ३० हातांनी </b><b>होतेय</b><b>. </b><b>ह्याच</b><b> ३० </b><b>हातांच</b><b> </b><b>बळ</b><b> ३०० </b><b>हातांच</b><b> व्हावे </b><b>म्हणून</b><b> आपणही आमच्या </b><b>उपक्रमात</b><b> सहभागी व्हा ही </b><b>नम्र</b><b> विनंती.</b></p>
<p dir="ltr">सहभागी झालेल्या सर्व सहकार्याँचे मनापासून धन्यवाद. ह्यापुढेसुद्धा तुमची अशीच साथ मिळेल ही अपेक्षा. कोणाला आमच्या ग्रूप सोबत उपक्रमात सहभागी व्हायचे असेल तर मेसेजच्या शेवटी दिलेल्या नम्बर वर सम्पर्क करा.</p>
<p dir="ltr"><b>चैतन्य</b><b> </b><b>मित्रमंडळ</b><br>
<b>सम्पर्क</b><b> :- </b><b><a href="tel:9869371580">9869371580</a></b><b> / </b><b><a href="tel:7039464291">7039464291</a></b></p>
<p dir="ltr"><b>*Please visit our fb page. Click on the link given bellow...</b></p>
<p dir="ltr">https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/</p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0tag:blogger.com,1999:blog-1668391033345848758.post-85780443664299367092017-07-15T09:26:00.001-07:002017-07-16T02:47:17.655-07:00दुर्दैव....<p dir="ltr">दुर्दैव....</p>
<p dir="ltr">चैतन्यचं काम करताना अनेक आदिवासी पाड्यांना भेट आम्ही देत असतो. त्या निमित्ताने आम्ही वासिंद जवळील रावतेपाडा येथे भेट देण्याचा योग्य आला. तिथल्या प्रगट विघ्नेश माध्यमिक विद्यालय येथे ई - लर्निंग सुविधा आम्हाला सुरु करायची होती. तेव्हा तिथल्या सरांकडून इयत्ता नववीत शिकणाऱ्या मुलीबद्दल मला समजलं. त्या मुलीला काहीतरी आजार झाला इतकंच मला समजलं होतं. मी माझ्या ओळखीतल्या डॉक्टरांना कॉन्टॅक्ट केला तेव्हा त्यांनी तिला हॉस्पिटल मध्ये घेऊन यायला सांगितले. खरा प्रॉब्लेम तर इथून सुरु झाला होता. आदिवासी पाडा आणि तिथले लोक हे औषधं, डॉक्टर ह्यापासून चार हात नव्हे तर किंबहुना कोसो दूर असल्याचं आम्हाला दिसलं. कारण जेव्हा त्या मुलीच्या पालकांना त्या शिक्षकांनी डॉक्टरांकडे घेऊन जायची तयारी दर्शवली तेव्हा त्यांनी त्याला साफ नकार दिला. त्या विभागात फिरताना आम्हाला जवळपास एखादं हॉस्पिटल तर सोडाच पण साधा दवाखानासुद्धा दिसला नाही. सरकारी आस्थेच हे एक अपयशच म्हणावं लागेल. पण मुंबईसारख्या मेट्रोसिटी पासून काही किलोमीटर अंतरावर असूनसुद्धा मूलभूत सुविधांचा अभाव हे सर्वांसाठीच लज्जास्पद आहे आणि सरकारसाठी जास्त.</p>
<p dir="ltr">आमच्या काही प्रयत्नांमुळे त्या मुलीचे पालक तिला के.ई.एम. हॉस्पिटलला घेऊन यायला तयार झाले. ९ जुलैला त्या मुलीचे पालक तिला घेऊन आले. तिची परिस्थिती बघवत नव्हती. तिचा एक पाय पूर्ण काळा पडला होता आणि ती वेदनेने कळवळत होती. ओळखीचे डॉक्टर तिथे होतेच. शाळेचे एक सर, आणि आमच्या ग्रुपचे मेम्बर्स तिथे प्रत्यक्ष हजर होते. डॉक्टरांनी ताबडतोब तिचं चेकअप केलं आणि त्यात काही धक्कादायक गोष्टी समोर आल्या. त्या मी पुढे सांगेनच. पण तिला गँगरीन झाला होता आणि तो पसरला होता. तिचा पाय कापावा लागणार होता आणि पर्याय नव्हता. तिच्या पालकांनी ऑपेरेशन करायला साफ नकार दिला. डॉक्टरांनी त्यांना खूप समजावले आणि हे सुद्धा सांगितलं की जर हिच्यावर आता उपचार झाले नाहीत तर पुढील १५-२० दिवसात हिला जीव गमवावा लागेल. पण इतक ऐकून सुद्धा ते तयार झाले नाहीत. कारण त्यांचा डॉक्टर, हॉस्पिटल ह्या गोष्टींवर विश्वासच नव्हता. शेवटी ते तिला घेऊन गेले घरी. आणि आज १५ जुलैला त्या मुलीचा दुर्दैवी अंत झाला.</p>
<p dir="ltr">ह्या गोष्टीला जबाबदार कोण? त्या मुलीचे आई वडील? मूलभूत आरोग्य, शिक्षण न पुरवणारं सरकार? की त्यामुलीचं नशीब? कारण जेव्हा डॉक्टरांनी त्या मुलीचं चेकअप केलं तेव्हा अनेक धक्कादायक गोष्टी माझ्या समोर आल्या. त्या मुलीला गँगरीन झाला होता. आणि ह्या गोष्टीला १ महिन्यापेक्षा जास्त होऊन गेलेला. आणि म्हणूनच ते विष त्या मुलीच्या शरीरात पसरत गेलं. मग एक महिना हे लोक करत काय होते? ह्या प्रश्नाचा शोध घ्यायचा प्रयत्न मी केला तेव्हा काही शक्यता समोर आल्या. त्या म्हणजे सगळ्यात आधी एखाद्या रोगाबद्दल तिथल्या लोकांचं असलेलं अज्ञान. दुसर म्हणजे गरिबी आणि शिक्षणाचा अभाव. तिसरं म्हणजे मूलभूत सोयी सुविधा जस आरोग्य सुविधांचा अभाव आणि जरी त्या उपलब्ध झाल्या तरी तिथपर्यंत पोहोचण्यासाठी लागणाऱ्या दळणवळणाच्या गोष्टींचा अभाव आणि सर्वात महत्वाचं म्हणजे अंधश्रद्धा. लोक ताप खोकला ह्यासाठी सुद्धा बुवा-बाबाकडे जातात. स्वतःला पुरोगामी म्हणवणर्या आपल्या सर्वांसाठी ही एक चपराक आहे.</p>
<p dir="ltr">Whatsapp, फेसबुक ह्यासारख्या virtual जगात राहणाऱ्या आपल्या नेटकरी लोकांपर्यंत ह्या बातम्या क्वचितच पोहोचत असतील. अश्या कितीतरी मुली आपला जीव ह्यामुळे गमावत असतील. आता ह्यासाठी आम्ही आमच्या ग्रुपतर्फे जे जे जमेल ते ते करणार आहोत. कारण निदान रावतेपाडा विभागात तरी पुन्हा कोणाची अशी अवस्था होऊ नये अशी अपेक्षा आहे. ह्याला आपण एक लढा म्हणू शकतो. हा लढा कुठल्या व्यक्ती विरुद्ध किंवा सरकार विरुद्ध नाही. हा लढा आहे विचारांचा. आपले विचार त्यांना पटवून देण्याचा. हे काम करताना, हा विचारांचा लढा लढताना, ह्या कामात आम्हाला आपल्या मदतीची सुद्धा गरज लागेल. निदान आत्तातरी ह्या व्हर्च्युअल जगातून बाहेर येऊया आणि सर्वांनी मिळून एक विचाराने ह्यासाठी काम करूया.</p>
<p dir="ltr">आमच्या चैतन्य ग्रुपची लिंक मी शेवटी देत आहे. ज्यांना आमच्या ग्रुप सोबत काम करायचे आहे किंवा आपले काही सजेशन असतील तर आम्हाला संपर्क करू शकता. वाट बघतो आहे.</p>
<p dir="ltr">प्रथमेश श. तेंडुलकर<br>
९८६९३७१५८० / ७०३९४६४२९१</p>
<p dir="ltr"><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">https://www.facebook.com/%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A4%9A%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A5%88%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A4%A4%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A4%A8%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A5%8D%</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">E0</a><a href="https://www.facebook.com/%E0%A4%9A%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A4%A8%E0%A5%8D%E0%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel">%A4%AF-377275462464189/?ref=aymt_homepage_panel</a></p>
Prathameshhttp://www.blogger.com/profile/05789233955357156855noreply@blogger.com0