Wednesday 28 August 2019
मंतरलेले दिवस
Wednesday 29 May 2019
हा ABP, माझा नाही..
हा ABP, माझा नाही..
भारताच्या स्वतंत्र्यलढ्यातील हुतात्म्यांच्या बलिदानाची किंमत स्वातंत्र्योत्तर भारतात किती आहे? हा प्रश्न विचारायचे कारण म्हणजे ABP माझावरील २८ मे रोजी झालेली चर्चा. २८ मे म्हणजे स्वतंत्र्यवीर सावरकर यांची जयंती. कदाचित २ ऑक्टोबर इतकी फेमस नसल्याने कुठल्याही वृत्तपत्रात त्याची बातमी नसेलच हे अपेक्षितच होतं. कारण सावरकर म्हटलं की या कणा नसलेल्या लोकांच्या लेखण्या खुंटतात आणि तोंडं सुटतात आणि हाच प्रकार केला ABP माझाने. सावरकर - नायक की खलनायक? यावर एक चर्चा आणि प्रसन्न जोशी सारखे पत्रकार असले की समजून जायचं की चर्चा एकांगी होणार. प्रसन्न सोबत नम्रता वागळे पण होत्या पण "नमस्कार मी नम्रता वागळे. एबीपी माझाच्या माझा विशेष मध्ये आपलं स्वागत आहे... etc एवढंच बोलण्यापुरतं त्यांचा सहभाग होता. असो तो मुद्दा नव्हे. मुद्दा हा की एबीपी माझाला या चर्चेसाठी जो मुहूर्त मिळाला त्याचं टायमिंग आणि कार्यक्रमाचे मुद्दे.
आज एबीपी माझा म्हणतंय की "कार्यक्रमातून सावरकरांचा अपमान करायचा हेतू नव्हता, सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर शंका घेणं हा उद्देश नव्हता इ." मूळातच कार्यक्रमाच्या शीर्षकातूनच (सावरकर - नायक की खलनायक) सावरकरांच्या राष्ट्रभक्तीवर संशय घेतला गेला. जर एबीपी माझाने सावरकरांचे कार्य दाखवणारे कार्यक्रम दाखवले होते आणि त्यांच्या मनात सावरकरांच्या राष्ट्रभक्तीबद्दल शंका नव्हती तर "नायक की खलनायक" हे शीर्षक का? आणि यातून शंका उत्पन्न करायची नव्हती? आणि जर एबीपी माझाच्या (प्रसन्नच्या किंवा त्यांच्या इतर पत्रकारांच्या) मनात शन्का होती तर त्यांनी ती शंका सावरकर वाचून दूर करायला हवी होती, त्याचा जहीर कार्यक्रम घेण्याची काय गरज? कोणत्या प्रेक्षकाने एबीपी माझाकडे मागणी केली की "भौ आमची माहिती अपूर्ण आहे तर कार्यक्रम घेऊन पूर्ण करा.''? जर अशी कोणती मागणी नाही, तुम्हाला शंका घ्यायची नव्हती (जाहीर केलेल्या पत्रकाप्रमाणे), तर असा जाहीर कार्यक्रम घेण्याची गरजच नव्हती.
दुसरा मुद्दा. कार्यक्रम सावरकरांवर होता ना? मग सावरकर नायक की खलनायक हा प्रश्न विचारत प्रसन्न जोशी शेवटी हिंदूराष्ट्रवाद या त्याच्या आवडत्या विषयाकडे वळला आणि भाजपच्या प्रवक्त्याला "तुम्ही हे मान्य करा की त्यांचा हिंदुत्ववाद, हिंदूराष्ट्रवाद तुम्हाला मान्य नाही की मान्य आहे.." मुळात कार्यक्रम सावरकरांच्या विषयाचा असताना भाजपाच्या प्रवक्त्याला हा प्रश्न का विचारला गेला? याचं उत्तर एबीपी माझा ने द्यावं. आणि जेव्हा स्वतः गांधीवादी प्रवक्ते सावरकरांच्या हिंदुत्वाचा मुद्दा मांडताना जे बरोबर बोलले ते ऐकून सुद्धा त्याविरुद्ध प्रश्न हिंदुत्ववादी प्रवक्त्याला प्रसन्न जोशी एकांगीपणे विचारत असताना एबीपी माझाला सावरकरांच्या कोणत्या कार्याचा आदर करायचा होता?
आज पत्रक काढून त्यावर आपली बाजू मांडणाऱ्या एबीपी माझाने असाच कार्यक्रम २ ऑक्टोबरला घेण्याची हिंमत करावी. कारण जसे काही लोक सावरकर आणि त्यांच्या विचारसरणीच्या विरोधात आहेत तसेच काही जण गांधीवाद न मानणारे सुद्धा आहेत, म्हणून त्याचीही "चिकित्सा" एबीपी माझाने जाहीर कार्यक्रम घेऊन करावी. आणि प्रसन्न जोशीने एकाच प्रश्नाच उत्तर द्यावं की जर तू फक्त अहिंसाच परमोधर्म मानतो तर भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात स्वतःचे बलिदान देणाऱ्या भगतसिंग सारख्या क्रांतिकारकांचे योगदान तुम्ही अमान्य करणार का? कारण भारताला स्वातंत्र्य फक्त उपोषण करून मिळालं नाही हेही तितकंच सत्य आहे.
असल्या टुकार चर्चा बघितल्या की आपल्या क्रांतिकारकांच्या बलिदानाकडे बघून कुसुमाग्रज म्हणजेच वि. वा. शिरवाडकर यांच्या कवितेतल्या काही ओळी आठवतात,
नाचविता ध्वज तुझा, गुंतले शृंखलेत हात..
तुझ्या यशाचे पवाड गाता, गळ्यात ये तात..
चरणांचे तव पूजन केले म्हणुनी गुन्हेगार,
देता जीवन-अर्घ्य तुला ठरलो वेडेपीर..
देशील ना पण तुझ्या कुशीचा वेड्यांना आधार,
आई वेड्यांना आधार..
गर्जा जयजयकार क्रांतीचा, गर्जा जयजयकार..!
या ओळींनीसह सर्व क्रांतिकारकांना वंदन करून या लेखाचा शेवट करतो. जय हिंद.
प्रथमेश श. तेंडुलकर
Monday 18 March 2019
कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...
कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती...
राजकारणाबद्दल जेव्हापासून वाचायला लागलो, काही नेत्यांबद्दल आदरयुक्त कुतूहल वाटू लागलं. अशी काही व्यक्तिमत्व नेहमीच आदरणीय आहेत. अटलजी, प्रमोद महाजन आणि मनोहर पर्रिकर ही यातील अशी नावं आहेत की वैचारिक मतभेद असो अथवा नसो पण यांच्याबद्दल चुकूनही वाईट विचार येत नाहीत. अजातशत्रू या शब्दाचा खरा अर्थ इथेच समजतो. पण भारतीय राजकारणाचं, भारतीयांचं दुर्दैव हेच की वरील तीनही जण आज हयात नाहीत. काल मनोहर पर्रिकर गेले ही बातमी वाचली आणि मन सुन्न झालं. एक चांगला नेता हरपला ही सर्वांचीच भावना होती. पण मला जाणवलेले पर्रिकर पाहता एक चांगला माणूस हरपला हेच राहून राहून मनाला वाटत होतं.
दीड दोन वर्षांपूर्वी पर्रिकरांना live ऐकायचं भाग्य मिळालं. मास्टर्सचं शिक्षण घेत असताना डिफेन्स संदर्भातील एका जागतिक परिषदेत भाग घेण्याचं भाग्य मिळालं आणि मी ती परिषद फक्त पर्रिकरांना live ऐकण्यासाठी attend केली. पर्रिकर तेव्हा देशाचे संरक्षणमंत्री होते. IIT मधून passout झालेले संरक्षणमंत्री अशी एक प्रतिमा त्यांच्याबद्दल माझ्या मनात होती. मनोहर पर्रिकर आणि रघुनाथ माशेलकर यांना live ऐकण्याची इच्छा फार होती आणि त्यातली एक इच्छा त्यादिवशी पूर्ण होत होती. सकाळी 10 वाजता वाशीच्या International Conference Hallमध्ये पर्रिकरांचं भाषण होतं. मिळेल तशी जरा स्टेजच्या जवळची सीटवर बसलो होतो. इतर नेत्यांप्रमाणे पर्रिकर उशिरा येतील अशी सगळ्यांची अटकळ होती आणि तिथेच पर्रिकरांनी सिक्सर मारला. वेळेच्या 10मिनिटं आधीच पर्रिकर आले. बरोब्बर 10 वाजता उदघाटन झालं आणि 10:20ला पर्रिकर सर्वांशी बोलायला उभे राहिले. अभियांत्रिकी क्षेत्राशी निगडीत कार्यक्रम असल्याने समोर सर्व अभियांत्रिकी क्षेत्रातील विद्यार्थी, शिक्षक आणि कंपन्यांचे एम्प्लॉयी बसले होते. पर्रिकरांनी भाषणाची सुरवातच अभियंता आणि त्यांचं देशातील त्यांच्या योगदानाने सुरु झालं. ज्ञान कसे घ्यावे इथून सुरु झालेलं भाषण मधेच एखादा विनोद करत पर्रिकरांना त्यांच्या कॉलेज जीवनात घेऊन गेलं. IITमधली शिक्षणाची पद्धत, तिथे त्यांनी शिकलेल्या गोष्टींसोबतच शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिक्षण कसे द्यावे या विषयावर बोलताना पर्रिकरांनी दिलेलं त्यांच्या वडिलांचे उदाहरण आजही लक्षात आहे. सकाळी 10:20ला सुरु झालेलं पर्रिकरांचं भाषण 10:55ला संपलं. तो 30-35 मिनिटांचा संवाद आजही मनात घर करून आहे. त्यानंतर पर्रिकर कॉन्फरेन्स हॉल मधून Exhibition Hallमध्ये आले. सर्व उपकरणांची आणि इतर प्रोजेक्ट्सची पर्रिकर नीट आणि कुतूहलपूर्वक माहिती घेत होते.
अर्ध्या तासाच्या भाषणादरम्यान आणि Exhibition Hallमध्ये पर्रिकरांना न्याहाळताना त्यांच्यातला माणूस दिसला. जगातल्या सर्वात मोठ्या लोकतंत्र असलेल्या देशाचे संरक्षणमंत्री आणि इतकी साधी राहणी, जाणवतच नव्हतं. निळा हाफस्लीव्हचा शर्ट, काळी ट्राउसर असा पोशाख परीधान केलेल्या पर्रिकरांमधल्या साध्या माणसाचं दर्शन तेव्हा झालं, हल्लीच्या काळात नगरसेवकसुद्धा सुटा-बुटात फिरतात हो. पर्रिकरांचा साधेपणाच सर्वांना भावणारा होता. पर्रिकरांसाठी त्यांच काम आणि देशावरील प्रेम हे सर्वश्रेष्ठ होतं. कर्करोगाने त्रस्त असतानाही ते गोव्याच्या विधिमंडळात उपस्थित होते. माझ्या लेखाचं शीर्षक, "कार्यमग्नता जिवन व्हावे, मृत्यू ही विश्रांती..." याचा अर्थच मुळात हा आहे की स्वतःला सतत देशसेवेच्या कर्तव्यात मग्न ठेवणाऱ्या पर्रिकरांना मृत्यूने विश्रांती दिली. पर्रिकरांना नेताना मृत्यूचेही मन कदाचित हेलावले असेल. पण काय करणार, नियतीपुढे कोणाचे चालते. पण एक मात्र नक्की, पर्रिकर सर, तुमची एक्सिट मन हेलावणारी ठरली.
प्रथमेश श. तेंडुलकर
Tuesday 29 January 2019
Travelog - One Day Trek to Sinhagad 2019
Travelog - One Day Trek to Sinhagad 2019
सिंहगड ट्रेक अनुभव
सिंहगड - अखेरचा टप्पा
जसा जसा गड जवळ येत होता तश्या शिवगर्जना ऐकू येत होत्या. खालून वर येताना तर URI मधलं "How's the Josh" करत सर्व वर येत होते. गडाच्या माथ्यावर उभं राहिल्यावर गेले काही तास आम्ही जी मेहनत केली ती सफल झाल्याचं समाधान वाटलं. वरून खाली बघताना "आपण एवढं वर चढून आलो?' असा प्रश्नही मनात आला. पण हो, आम्ही गडावर होतो, माथ्यावर.
सिंहगड दर्शन आणि जेवण
पुणेकरांना तसंही स्वतःचे (पुण्यातले) पदार्थ जगात भारी असतात हे वाटतच असतं (गैरसमज) पण मटक्यातलं दही हे चवीच्या दृष्टीनेतरी जगात भारी होतं.माझं नशीब जोरात, ज्या ज्या गोष्टी जेवायला आवडतात त्या त्या अगदी भारी चवीच्या तिथे मिळाल्या.
परतीचा प्रवास
आपण ट्रेक करतो त्यात एक मजा असते पण त्यासोबत आपल्याला आपल्या मर्यादा कळतात. आपल्या limits आपण किती स्ट्रेच करू शकतो हे कळतं आणि सिंहगडाच्या माथ्यावर पोहचून जेव्हा खाली बघतो तेव्हा २ तास केलेल्या मेहनतीचं जे फळ मिळतं आणि जे समाधान मिळतं त्याची तोड कशालाच नाही.