Thursday 11 December 2014

खानाच्या फौजेतील मराठी सरदार…?

आज ह्या विषयावर लिहिण्याचं कारण एकच… काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेसाठी          ( आणि विकासासाठी ) २ "मित्र" पक्ष एकत्र आले… विधानसभेच्या निवडणुकीत एकमेकांवर तुफान हल्ला चढवणारे आज मात्र एकत्र आहेत… तळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वावरताना आणि अनेक कट्टर समर्थक असलेल्यांच्या भावना पाहताना अनेक गोष्टी लक्षात आल्या त्या आपल्या समोर मांडण्याचा केलेला एक छोटासा प्रयत्न…

अनेक दिग्गजांनी एकत्र येउन केलेली आणि हिंदुत्व हा समान धागा पकडून असलेली अनेक वर्षांची युती विधानसभेच्या निवडणुकी आधी काही दिवस संपली… युती तुटू नये हि अनेकांची भावना होती कारण पक्षांचे कार्यकर्ते युतीत मानाने एकत्र आले होते… एक भावनिक नात निर्माण झालं होतं… युती का तुटली, कोणामुळे तुटली ह्या वादात मला पडायचं नाही कारण त्याची कारणं अनेक आहेत… युती तुटली आणि मग दोन्ही मित्र (जुने मित्र ) एकमेकांविरुद्ध निवडणुकीत उभे ठाकले… मग आरोप प्रत्यारोपांचे "बाण" सुटले… जुन्या मित्रांची तुलना अफजल खानशी झाली… कालपर्यंत एकमेकांसोबत प्रचार करणारे कार्यकर्ते आज मात्र एकमेकांना दोष देत होते… "पाठीत खंजीर खुपसला", "आता मनं तुटली आहेत ती जोडली जातील असा वाटत नाही " अशी अनेक वक्तव्य ऐकायला मिळाली… अश्या वातावरणात निवडणूक पार पडली… आणि निवडणुकीचे निकालही लागले…

निवडणुकीचे निकाल लागले आणि चित्र बदलल… निवडणुकीत कोणालाच स्पष्ट बहुमत मिळाल नव्हत त्यामुळे खानाच्या फौजेला सत्तेसाठी कोणाची तरी गरज लागणार होती… मग भेटी सुरु झाल्या, गुप्त बैठका झाल्या… आज पाठींबा देणार, उद्या नाही अशा अफवा उठायला लागल्या … "आम्ही देऊ ते घ्या " अशा गोष्टी समोर आल्या… त्यात दोन गट पडले, एक होते सत्तेत जाऊ म्हणणारे आणि दुसरे होते ते सत्तेत न जाता आत्मसन्मान न गमावता विरोधात बसू म्हणणारे… पण बराच काळ विचार झाल्यानंतर निर्णय सत्तेत जाण्याचा झाला आणि बरेचसे जुने आणि निष्ठावंत सैनिक नाराज झाले… "गद्दारांना क्षमा नाही… " अस म्हणणाऱ्या मोठ्या साहेबांची आठवण आणि कमतरता  त्या निमित्ताने सर्वांना जाणवली…

ह्या घटनेने समर्थकांच्या आणि मराठी अस्मितेच्या मुद्द्यावर ज्यांनी मतदान केल त्यांना हा निर्णय फारसा पटला नाही… but Boss is Always Right ह्याप्रमाणे कदाचित नाईलाजास्तव हा निर्णय सर्वांनी हे मान्य केलेला आहे… पण ह्यात सरशी कोणाची झाली आणि कोण हरल ह्यापेक्षा मतदारंच्या भावना राजकारणी लोकांसाठी किती लवचिक असतात ह्याच दर्शन सर्वांना झाल… ह्यात  गोंधळाला तो मात्र मराठी माणूस आणि कट्टर सैनिक…

ह्या नंतर सुद्धा अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतात पण अद्यानांत शहाणपण असते अस म्हणून आपल समाधान करून घ्यायचं एवढाच काय ते आपल्या हाती…

एक मराठी माणूस
जय महाराष्ट्र…

(** वरील लेखातून कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता आणि जर कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मात्र त्याबद्दल क्षमस्व...)

No comments:

Post a Comment