आपल्या देशात स्मारक हे एक चर्चेचं आणि वादाचा विषय असतो… देशात अनेक स्मारक आहेत, आणि अजून काही होणार आहेत… पण बऱ्याच स्माराकांवरून ह्या आधीही वाद झाले आहेत आणि आजही होत आहेत… मुळातच एखाद्या व्यक्तीच स्मारक हा जितका लोकांच्या भावनांशी निगडीत विषय आहे तेवढाच राजकारणाचाही आहे…
आज ह्या मुद्द्यावर लिहायचं कारण एवढाच की काही दिवसांपूर्वी एक बातमी पाहिली कि प्रतापगड ढासळतोय… प्रतापगड म्हणजे शिवरायांच्या अतुलनीय पराक्रमाचा साक्षिदार… स्वराज्यावरील मोठे, महाकाय संकट म्हणजे अफजल खान आणि त्याची स्वारी… त्याच अफजलखानाचा जिथे शिवरायांनी कोथळा बाहेर काढला आणि खान संपवला तो प्रतापगड… काही दिवसांपूर्वी हि बातमी वृत्तवाहिन्यांवर दाखवली होती… महाराष्ट्रातील गड-किल्ल्यांची दुरावस्था काही लपून राहिलेली नाही… बहुतांश गडावर हीच परिस्थिती आहे, एकतर गड ढासळतो किंवा मग गडावर जाणारे प्रेमवीर आपल्या प्रेमाची निशाणी त्या गडावर सोडून येतात ( बदाम आणि बाण )… अशी एकीकडे गडांची दुरावस्था असताना आपण मात्र स्मारकात अडकलोय… कितीतरी हजार कोटींच स्मारक उभारतायत म्हणे शिवाजी महाराजांचं, आनंदच आहे… भव्य स्मारक व्हाव हि माझीही इच्छा आहे, आपला राजा कोण होता, किती महान कार्य आहे हे प्रत्येकाला कळाल पाहिजे पण शिवरायांच खरी स्मारके म्हणजे त्यांचे गडकोट आहेत… हेच काही हजार कोटी मधले काही पैसे गडकिल्ले संवर्धनासाठी वळवले तर तो इतिहास जिवंत राहील… स्मारक काय आज नाही तर उद्या होईलच पण हे दुर्ग कोसळले तर असे दुर्ग पुन्हा होणे नाही… ज्या काळी, ज्या भौगोलिक अवस्थेत हे गड-किल्ले बांधले आणि तेव्हा असलेली तंत्रज्ञानाची उपलब्धता लक्षात घेता, हे गड-किल्ले चमत्कारापेक्षा काही वेगळे नाहीत. अशा वास्तूंचे संवर्धन होणे अत्यंत गरजेचे आहे.
गड किल्ल्याच संवर्धन कस करायचं ह्याबद्दल मी मागे एकदा राज ठाकरेंच्या ब्ल्यू प्रिंट मध्ये वाचल होत… अतिशय अभ्यासपूर्ण अस लिहिलेल होत… त्याची link मी शेवटी दिली आहे, त्यावर जाऊन आपण वाचू शकता… खर बघायला गेल तर गडांची काळजी घेण हे आपल्या सर्वांच काम आहे… ट्रेक ला जाताना गडावर कचरा होणार नाही हे पहाव आणि हे बदामवाल्यांनी गड हि आपली property समजून त्यावर आपली नाव कोरण टाळाव… ह्या सर्व गोष्टीला सरकारची साथ मिळायला हवी… आणि असे झाले तर ती खरी शिवरायांना दिलेली आदरांजली ठरेल…
जय महाराष्ट्र
प्रथमेश तेंडुलकर
लिंक:- http://mnsblueprint.org/m_06_09_marathiPride_conservationOfForts.html
surekh lekh
ReplyDeletethank u mitra.. asech vachat raha.. :)
Deleteखुप छान लेख आहे.
ReplyDeleteस्मारक बनवण्यासाठी कितीतरी कोटी व नंतर त्याच्या संरक्षणासाठी कित्येक कोटी रूपये लागतील..
शिवाजी महाराजांचे गड किल्ले व जलदुर्ग यांचे जर संवर्धन केले तर पुढच्या कितीतरी पिढ्यांच्या ह्रदयात महाराजांचे अढळ स्मारक निर्माण होईल.
khara ahe.. smaarkanmadhe vaad karnyapeksha samvaad karun kahi changlya goshti hou shaktat.. :)
Delete