Saturday 16 May 2015

अणुऊर्जा :- शाप की वरदान

आज अणुऊर्जा ह्या विषयावर लिहायचं कारण एवढंच की गेले अनेक दिवस बातम्यांमध्ये एक मुद्दा खूप गाजतोय, तो म्हणजे जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प… ह्या प्रकल्पाला विरोध सुद्धा आहे आणि समर्थन करणारे सुद्धा खूप आहेत… म्हणून माझ्यापरीने मी माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि तीच माहिती मी इथे share करत आहे… कदाचित हि माहिती अपूर्ण असेल पण मला मिळालेल्या माहिती च्या आधारावर मी माझे मत व्यक्त करत आहे… ह्यात internet ह्या माध्यमाचा आणि मधु मंगेश कर्णिक ह्यांच्या जैतापूरची बत्ती ह्या पुस्तकाचा खूप उपयोग झाला…

आज वीज निर्माण करण्यासाठी पाणी, कोळसा, सौरऊर्जा किंवा gas ह्याचा वापर केला जातो… अणू  पासून वीजनिर्मिती हे तंत्रज्ञान पाश्चिमात्य देशांचं विशेषतः अमेरीकेच… पण १९४५ साली हिरोशिमा नागासाकी प्रकारानंतर पहिल्यांदाच अणूऊर्जा आणि त्याच्या शक्तीचा प्रत्यय सर्व जगाला आला… भारताचा विचार करायचा झाला तर १९ डिसेंबर १९४५ रोजी टाटा institute ऑफ fundamental Researchची स्थापना झाली… त्यानंतर साधारण १० वर्षांनी डॉक्टर होमी भाभा, पंडित नेहरू ह्यांच्या समन्वयाने आणि कॅनडा च्या मदतीने भारतात न्युक्लिअर reactor बांधण्यास समर्थन दर्शवले… BARC ने प्रथमच तयार केलेला Cirus- Reactor ह्याच प्रयत्नातून जन्माला आला… त्यानंतर भारतात अणु-रेणू चे संशोधन सातत्याने सुरु राहिले… गेल्या पन्नास वर्षात भारतात २० अणुऊर्जा प्रकल्प कार्यरत आहेत आणि त्यातले १७ प्रकल्प उभारणारे शास्त्रज्ञ वैज्ञानिक हे भारतीय आहेत हि अभिमानाची गोष्ट आहे… डॉक्टर होमी भाभा, डॉक्टर राजा रामण्णा ह्यांची परंपरा जपत डॉक्टर अनिल काकोडकर ह्यांच्यासारखे अनेक अणुवैज्ञानिक आपल्याकडे आहेत…

सध्या विजेची जी गरज आहे ती येत्या ३०-४० वर्षात १० पटीने वाढणार आहे… त्यावेळी कोळसा आणि इतर स्त्रोत हे कमीच पडणार हे दिसतंय… तेव्हा समोर २ पर्याय येतात, एक सौरऊर्जा आणि दुसरा अणुऊर्जा… सौरउर्जेचा पर्याय ह्या सध्या तरी खूप महागडा आणि प्रचंड विस्तीर्ण जमीन मागणारा आहे… तेव्हा समोर एकमेव पर्याय उभा राहतो तो म्हणजे अणुऊर्जा… १९५४ - १९५५ नंतर देशात अनेक अणुऊर्जा प्रकल्प कार्यान्वित आहेत ते पुढीलप्रमाणे :- तारापूर (महाराष्ट्र), रावतभाटा (राजस्थान), कल्पकम (तामिळनाडू), नरोरा ( उत्तरप्रदेश), काकरापार  ( गुजरात), आणि कैगा (कर्नाटक) येथे आहेत आणि त्यातून ४७८० megawatt वीज तयार होते…पण आपल्या देशात चांगल्या माहितीच्या आधी पोचते ती अफवा… अशा अनेक अफवा जस कि किरणोत्साराने माणसं मारणार, नपुंसक होणार, मुले अपंग होणार अश्या अनेक अफवा ह्या प्रकल्पाच्या बाबतीत पसरल्या, की पसरवल्या?

ह्या अफवांना अनिल काकोडकर ह्यांनी उत्तर देताना अस म्हटल आहे कि, अणुउर्जा प्रकल्पातून निघणारे उत्सर्जन हे अतिशय नगण्य असते, ह्यापेक्षा कितीतरी जास्त नैसर्गिक उत्सर्जनाला आपण रोज तोंड देत असतो… उलट अणुऊर्जा हि इतर कोळसा आणि इतर प्रकल्पांपेक्षा कितीतरी पटीने स्वच्छ प्रक्रिया आहे… अजून एक अफवा अशी होती कि अणुऊर्जा प्रकल्पामुळे पाण्यातील जीवांना धोका असतोजेव्हा … जेव्हा संयन्त्रातील वाढीव तापमानाचे पाणी समुद्रात सोडतात तेव्हा त्याची मर्यादा हि ७ अंश से. इतकी मर्यादित आहे आणि जैतापूर येथील ६ यंत्रे कार्यान्वित झाली तरी ५ अंश पेक्षा से पेक्षा कमी तापमानाचे पाणी सोडण्यात येईल आणि त्यामुळे जलचरांना कुठलाही अपाय होणार नाही… आणि राहिला प्रश्न भूकंपाचा तर चेर्नोबिल येथे जो भूकंप झाला आणि जी भट्टी उध्वस्त झाली ती अतिशय जुनी होती, प्रगत तंत्रज्ञान त्यात वापरले नव्हते उलट भारताच्या अणुभट्ट्यांची सुरक्षितता जगमान्य आहे,तारापूर अणुभट्टीची मूळ २५ वर्षाची मुदत संपण सुद्धा आपण ती पुन्हा कार्यान्वित करू शकलो ह्यावरूनच आपले तंत्रज्ञान किती प्रगत आहे ह्याचा अंदाज येतो… आणि जैतापूर भूकंप प्रवण भागात येत नाही… भारत सरकारच्या भूकंप विभाग च्या नकाशा नुसार हि जैतापूर प्रकल्पाची जागा विभाग ३ मध्ये येते…

प्रश्न एवढाच आहे की आगीमुळे अंग भाजते म्हणून आग हि व्यर्ज झाली का? नाही, तर तिचा योग्य वापर करून माणसाने स्वतःचे पोट भरलेच… सध्या आपली विजेची भूक वाढत चालली आहे तर ती भागवणे गरजेचे आहे म्हणून कोणताच पर्याय व्यर्ज नको… त्यावर त्या त्या विषयाच्या संबंधित लोकांनी एकत्र येउन अभ्यास झाला पाहिजे… शाळेत असताना विज्ञान शाप कि वरदान असा निबंध यायचा, विज्ञानाचा वापर चांगल्या आणि वाईट दोन्हीसाठी करता येतो, फक्त तो कसा करायचा (चांगला करायचा की वाईट) हे आपल आपण ठरवायला पाहिजे… म्हणूनच जर विजेची गरज भागवणार असेल तर खरच अणुउर्जा हे आपल्यासाठी वरदानच ठरेल…

प्रथमेश तेंडूलकर

2 comments: