मराठी चित्रपट मल्टीप्लेक्स मध्ये प्राईम टाईम मध्ये दाखवावा म्हणून राज्यसरकार ने विधीमंडळात काल एक मत दिले आणि त्याची अंमल बजावणी करण्याचे आदेश दिले… आदेश येतो न येतो तोच काही हिंदी "celebrities" ची टिव टिव twitter वरून ऐकू आली… अनेकांनी स्वागत केले आणि अनेकांनी जाहीर विरोध केला… ह्या विरोधकांसाठी माझा एक ब्लॉग…
महाराष्ट्रात मराठी भाषा आणि त्या भाषेशी निगडीत सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे हे माझ स्पष्ट मत आहे… मराठी नाटक, मराठी सिनेमे, मराठी साहित्य हे सर्व मराठी भाषेशी निगडीत विषय आहेत… मराठी चित्रपटाच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार काही करू पाहत असेल तर ह्या काही लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण ते काय? एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि " आम्हाला आता choice उरलेली नाही…" choice ? काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात? म्हणजे तुमच्या choice प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे ? कि मराठीत दर्जेदार सिनेमे नसतात?
हे तथाकथित celebrity ज्या माध्यमातून पैसा कमवत आहेत ते चित्रपट सृष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली आहे… अगदी सुवर्ण कमळ वीजेता श्यामची आई पासून ते ऑस्कर ला जाणार्या श्वास पर्यंत मराठी चित्रपट आहेत… एवढच कशाला, विहीर, देऊळ, नटरंग सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट मराठीच आहेत… अहो एवढच कशाला… २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथात जे गाणं वाजल आणि ज्याला पहिल्या क्रमांकच बक्षीस मिळाल ते मराठी चित्रपटातील आहे आणि संगीतकार सुद्धा मराठीच आहेत… तरी तुम्ही मराठीचा दुस्वास करणार, कारण मराठी चित्रपट, मराठी माणूस म्हटला कि तुमची नाक आपोआप मुरडतात… मग हाच शहाणपणा तुम्ही दक्षिणेकडे शिकवता का? तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का? कि जाणूनबुजून केलेला हा विरोध आहे?
मुद्दा एवढाच आहे कि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अग्रस्थानी असेल आणि जर हे ऐकून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी पोटदुखीच औषध घ्याव किंवा आमचे मराठी सिनेमे बघायला शिकावेत… नसेल जमत तर प्राइम टाईम सोडून इतर वेळी असलेले हिंदी किंवा इतर भाषिक (तुमच्या आवडीचे) सिनेमे बघा… कोणी अडवलय…
जय महाराष्ट्र
प्रथमेश तेंडूलकर
महाराष्ट्रात मराठी भाषा आणि त्या भाषेशी निगडीत सर्वच गोष्टींना प्राधान्य मिळायला हवे हे माझ स्पष्ट मत आहे… मराठी नाटक, मराठी सिनेमे, मराठी साहित्य हे सर्व मराठी भाषेशी निगडीत विषय आहेत… मराठी चित्रपटाच्या फायद्यासाठी जर राज्य सरकार काही करू पाहत असेल तर ह्या काही लोकांच्या पोटात दुखण्याचे कारण ते काय? एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणतेय कि " आम्हाला आता choice उरलेली नाही…" choice ? काय पूर्ण दिवसभर मराठी चित्रपट दाखवणार अस हे बोलण आहे आणि तुम्हाला तुमच्या choice ची पडलेली आहे पण मराठी माणसाकडे एवढा दिवस कुठला choice नव्हता तेव्हा कुठे गेलेलात? म्हणजे तुमच्या choice प्रमाणे आम्ही चित्रपट बघायचे ? कि मराठीत दर्जेदार सिनेमे नसतात?
हे तथाकथित celebrity ज्या माध्यमातून पैसा कमवत आहेत ते चित्रपट सृष्टी एका मराठी माणसाने निर्माण केली आहे… अगदी सुवर्ण कमळ वीजेता श्यामची आई पासून ते ऑस्कर ला जाणार्या श्वास पर्यंत मराठी चित्रपट आहेत… एवढच कशाला, विहीर, देऊळ, नटरंग सारखे राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारे चित्रपट मराठीच आहेत… अहो एवढच कशाला… २६ जानेवारी २०१५ रोजी महाराष्ट्राच्या चित्ररथात जे गाणं वाजल आणि ज्याला पहिल्या क्रमांकच बक्षीस मिळाल ते मराठी चित्रपटातील आहे आणि संगीतकार सुद्धा मराठीच आहेत… तरी तुम्ही मराठीचा दुस्वास करणार, कारण मराठी चित्रपट, मराठी माणूस म्हटला कि तुमची नाक आपोआप मुरडतात… मग हाच शहाणपणा तुम्ही दक्षिणेकडे शिकवता का? तिथे आजही प्राइम टाईम मध्ये त्यांचे सिनेमे दाखवले जातात मग तुमचा विरोध मराठीलाच का? कि जाणूनबुजून केलेला हा विरोध आहे?
मुद्दा एवढाच आहे कि महाराष्ट्रात मराठी भाषा आणि मराठी माणूस हेच अग्रस्थानी असेल आणि जर हे ऐकून कोणाच्या पोटात दुखत असेल तर त्यांनी पोटदुखीच औषध घ्याव किंवा आमचे मराठी सिनेमे बघायला शिकावेत… नसेल जमत तर प्राइम टाईम सोडून इतर वेळी असलेले हिंदी किंवा इतर भाषिक (तुमच्या आवडीचे) सिनेमे बघा… कोणी अडवलय…
जय महाराष्ट्र
प्रथमेश तेंडूलकर
Jai Maharashtra...surekh lekh
ReplyDeletejay maharashtra bhau..
Delete