Friday 17 April 2015

मैत्री… तुझी माझी …

अचानक हे असे काय झाले,
तुझे मन आणि माझे शब्द अनोळखीच झाले…

अनोळखी होतो जरी शब्द होते सोबतीला
साथ होती तुझ्या मनाची भावना समजायला…

आज ना साथ उरली ना साद उरली कोणाला द्यायला
शब्दच झाले पोरके मनाला भावना समजायला….

मन तरी बिचारे काय करेल, बावरले असेल बिचारे ते सुद्धा
निखळ मैर्त्रीच्या मध्ये कुठून आला इगोचा मुद्दा?

एकमेकांच्या चुका काढण्याची सवय मैत्री वर बेतली
शब्द माघार घेत नाही पाहून बिचार्या मनाने तरी माघार घेतली…

मैत्री दोघांनाही हवीय पण पहिली माघार कोण घेणार?
शब्दांवर मोठा झालेला इगो सोडून पुढे कोण जाणार?

मैत्री मध्ये नसावे हेवेदावे नसावेत शब्दांचे बाण
देवाकडे एकाच प्रार्थना, आमच्या जुन्या मैत्रीला परत आण ….

प्रथमेश तेंडूलकर

No comments:

Post a Comment