Thursday 9 April 2015

एक पत्र देवाला

प्रथमेश तेंडूलकर
                 मुंबई 
प्रति,
देवबाप्पा.

                                                  विषय:-  तुझ्या काही गोष्टी न आवडल्या बद्दल

          देवा, आज तुला पत्र लिहायची हि माझी पहिलीच वेळ… कदाचित बोलण्याच्या ओघात काहीतरी जास्त बोलून जाईन तर राग मानू  नकोस, थोड्या आमच्या भावना समजून घे…

          आज नेहमीप्रमाणे मी ऑफिस ला आलो आणि येतानाच एक दुखद बातमी समजली… आम्ही ज्या चैतन्य ग्रूप तर्फे सामाजिक उपक्रम करतो त्या समूहातील एक मृदुला तांबे ह्याचं हृदयविकाराच्या झटक्याने दादर येथील त्यांच्या घरी निधन झाले… माझ्यासाठी हा एक अतिशय दुखद धक्का होता कारण काही दिवसांपूर्वीच त्याचं आणि माझ फोन वर संभाषण झाल होत, आम्ही आमच्या ग्रूप ला घेऊन जव्हार येथे जाणार होतो पण त्या आधीच हे अस झाल…

          देवा, तुला पत्र लिहायचं कारण एवढच की आज जगात खूप कमी चांगले लोक उरले आहेत, लोकांसाठी निस्वार्थीपणे काम करणारे लोक खूप कमी उरले आहेत… त्यातही तू एक एक करून सर्वांना अस आपल्यासोबत नेलस तर देवा एकदिवशी असे चांगले लोक पूर्णपणे जगातून संपतील… मला ह्याच गोष्टीची तक्रार आहे तुझ्याकडे… मी इतर काही लोकांसारखा नास्तिक नाही, म्हणून ह्या माझ्या छोट्या आयुष्यात ज्या काही चांगल्या वाईट गोष्टी घडतात त्या तुझ्या इच्छेने घडतात ह्यावर माझा ठाम विश्वास आहे… 

          देवा, तू सर्वांची परीक्षा घेतोस हे मला नीट माहित आहे… पण देवा परीक्षा घेताना इतका कठोर होऊ नकोस रे… परीक्षा द्यायला कोणीच नाही म्हणत नाही आहे, पण चांगल काम करणाऱ्यांची जास्त परीक्षा घेऊ नकोस, नाहीतर एकदिवशी देव ह्या संकल्पनेवरून लोकांचा विश्वास उडेल… तुझी आम्हाला गरज आहे, द्रौपदीच वस्त्रहरण होताना जसा तू श्रीकृष्ण रूपाने तिच्या मदतीला धाऊन आलास तसच चांगली माणसं संकटात असताना त्यांना मदत कर रे… दुर्दैव हेच आहे कि फार पूर्वीपासून हे असेच सुरु आहेत, म्हणजे बाजीरावाला चाळीस वर्षांच आयुष्य आणि औरंगजेबला नव्वद वर्षाचं आयुष्य हा जो प्रकार आहे ना तो बंद कर…

          तुझ्याशी असलेल्या नात्याने निदान हक्काने मी हे तुला सांगतो आहे… जर काही चुकल असेल तर माफ कर…


तुझा एक भक्त,

प्रथमेश तेंडूलकर

No comments:

Post a Comment