Monday 30 March 2015

मराठी शाळा जागवा आणि जगवा

आज मराठी शाळा ह्या विषयावर लिहायचे कारण हेच की गेल्या बर्याच दिवसापासून वृत्तपत्रांमध्ये मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अस बरच काही वाचायला मिळतंय..  कदाचित माझी मतं सर्वांनाच पटतील अस नाही पण ह्या सर्वांचा सारासार विचार व्हायला पाहिजे म्हणून हे माझ मत…

मराठी भाषा म्हणजे फक्त संभाषणाच मध्यम नाही… मराठी भाषा हा आपला अभिमान आहे, मराठी हि एक संस्कृती आहे… पण आपल्या महाराष्ट्रातच मराठी शाळा जगवा आणि वाचवा हीं ओरड ऐकायला मिळणे हे आपल दुर्दैव आहे… पण ह्यासाठी फक्त सरकारी धोरण जबाबदार आहे का? कि मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये घालणारे पालक? वास्तविक पाहता ह्यासाठी फक्त कोणा एकाला जबाबदार धरता नाही येणार…

सरकारी धोरणाबरोबर मराठी शाळा सुद्धा काहीप्रमाणात ह्यासाठी जबाबदार आहेत… आज लोकांमध्ये इंग्रजी माध्यमाच्या शाळांबद्दल जो "अतिविश्वास" निर्माण झाला आहे त्याला ह्या लोकांपेक्षा मराठी शाळांचा बेजबाबदारपणा  सुद्धा काहीप्रमाणात जबाबदार आहे… एखादे पालक आपल्या पाल्याला इंग्रजी माध्यमात टाकताना त्यांचा विचार हा असतो कि आपल्या पाल्याला उत्तम प्रतीच शिक्षण मिळाव आणि ह्यात त्यांची काही चूक असते अस वाटत नाही… पण आपण तेच दर्जेदार शिक्षण मराठी शाळांमध्ये का नाही देऊ शकत? आज जगातल्या लोकांशी स्पर्धा करायची असेल तर आपल्याला इंग्रजी येणं अत्यंत गरजेच आहे पण त्या तोडीच (काही इंग्रजी माध्यमात शिकवल्या जाणार्या इंग्रजी च्या) इंग्रजी भाषेच शिक्षण आपण मराठी शाळात देत आहोत का? हाताच्या बोटावर मोजता यॆतिल अशा काही शाळांमध्ये दर्जेदार इंग्रजी शिकवलं जात पण अनेक शाळांमध्ये इंग्रजी हा विषय सुद्धा मराठीत शिकवला जातो…

पाल्याच प्राथमिक शिक्षण हे त्याच्या मातृभाषेत झाल तर तो विषय त्या पाल्याला जास्त चांगल्या प्रकारे समजतो पण इतर विषयांसोबत जगाशी टक्कर घेताना त्या दर्जाच इंग्रजी भाषेच ज्ञान आपल्या मराठी शाळेत दिल गेल तर मला विश्वास आहे कि पालक स्वताहून मुलांना मराठी माध्यमात शिकायला पाठवतील… फक्त गरज आहे ती सर्वांनी एकत्र मिळून काम करण्याची… कोणा एका व्यक्तीला, संस्थेला दोष न देता अश्या शाळा निर्माण करू कि  मराठी शाळा टिकवा, मराठी शाळा जगवा अशी ओरड करायची गरजच लागणार नाही…

लेख संपवताना एक उदाहरण द्यावेसे वाटते कि एखाद्या पेपर वर दुसर्यापेक्षा आपली रेख मोठी करण्यासाठी दुसर्याची रेख रबर ने खोडण्यापेक्षा स्वतःची रेख मोठी कशी करता येईल ह्याचा विचार झाला पाहिजे… ह्यापुढे आपण असच काहीस करू आणि स्वतःची क्षमता वाढवू…

जय महाराष्ट्र

प्रथमेश तेंडूलकर

No comments:

Post a Comment