आज पहाटे कॉ. पानसरे ह्यांच्या निधनाची बातमी आली आणि महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर अजून एक डाग लागला… आज ह्या विषयावर लिहिण्याच कारण एकच , काही दिवसापूर्वी चार्ली हेब्दो वरील हल्ल्याबद्दल आपल्याला सर्व माहित आहे… अमुक एका समुदायाच्या भावना दुखावल्यामुळे त्या व्यंगचित्रकाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली… हे सर्व करणारा गट हा अतिरेकी होता हे सुद्धा स्पष्ट आहे… पण काही दिवसांपूर्वी कॉ. पानसरे ह्यांच्यावर हल्ला झाला आणि पुन्हा एकदा अश्या घटनेची आठवण झाली… मी चार्ली हेब्दो घटना आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्याची बरोबरी करत नाही आहे… चार्ली हेब्दो वरील हल्ला आणि कॉ. पानसरे ह्यांच्यावरील हल्ला ह्यात साम्य एकच, ते म्हणजे दोन्ही वेळा माणूसकीला काळीमा फासणारी घटना होती…
तूर्तास हिंसा, अहिंसा जर बाजूला ठेवली तर आपल्याला एक कळेल कि हा हल्ला समोरच्या व्यक्तीचे विचार दाबण्यासाठी केलेला एक केविलवाणा पण क्रूर प्रयत्न होता… पण संतांसोबत ज्येष्ठ विचारवंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात हे व्हाव म्हणजे हे तर महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत असल्याच लक्षण आहे… टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि आज विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी आज ती वेगळ्या मार्गाने लढली जातेय… प्रत्येकाचे मत सर्वांना पटेलच अस नाही हे खरं आहे पण त्यासाठी समोरच्याला शारीरिक इजा करण्याचे प्रकार होत आहेत… कॉ. पानसरे हे त्या वृत्तीला बळी पडलेले अजून एक… काही महिन्यांपूर्वी नरेंद्र दाभोलकर ह्यांचासोबत असंच झालं होतं… पण ह्याने नरेंद्र दाभोलकर नावाची व्यक्ती आज जगात नाही पण त्यांच्या विचारांनी ती अंनिस च्या प्रत्येक कार्यकर्त्यात जिवंत आहेत… माणसाचा देह संपवता येतो त्याचे विचार नाही…
दु:ख ह्याच गोष्टीच आहे कि महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांनी हातात शस्त्र घेतली पण ती घेतलेली शस्त्र हे शौर्याचं लक्षण होतं पण आत्ता ह्या काहींनी घेतलेली शस्त्रे हे शौर्याच नाही तर क्रौर्याच लक्षण आहे… अश्या वृत्तींना आळा घालणे आपल्याच हातात आहे… बाकी आपला समाज सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे… शेवटी कॉ. पानसरे ह्यांना विनम्र आदरांजली…
जय महाराष्ट्र…
प्रथमेश तेंडूलकर
तूर्तास हिंसा, अहिंसा जर बाजूला ठेवली तर आपल्याला एक कळेल कि हा हल्ला समोरच्या व्यक्तीचे विचार दाबण्यासाठी केलेला एक केविलवाणा पण क्रूर प्रयत्न होता… पण संतांसोबत ज्येष्ठ विचारवंतांची परंपरा लाभलेल्या आपल्या महाराष्ट्रात हे व्हाव म्हणजे हे तर महाराष्ट्राची संस्कृती लोप पावत असल्याच लक्षण आहे… टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर अशा अनेक विचारवंतांची परंपरा असलेला आपला महाराष्ट्र आणि आज विचारांची लढाई विचारांनी लढण्याऐवजी आज ती वेगळ्या मार्गाने लढली जातेय… प्रत्येकाचे मत सर्वांना पटेलच अस नाही हे खरं आहे पण त्यासाठी समोरच्याला शारीरिक इजा करण्याचे प्रकार होत आहेत… कॉ. पानसरे हे त्या वृत्तीला बळी पडलेले अजून एक… काही महिन्यांपूर्वी नरेंद्र दाभोलकर ह्यांचासोबत असंच झालं होतं… पण ह्याने नरेंद्र दाभोलकर नावाची व्यक्ती आज जगात नाही पण त्यांच्या विचारांनी ती अंनिस च्या प्रत्येक कार्यकर्त्यात जिवंत आहेत… माणसाचा देह संपवता येतो त्याचे विचार नाही…
दु:ख ह्याच गोष्टीच आहे कि महाराष्ट्राचे दैवत शिवाजी महाराजांनी हातात शस्त्र घेतली पण ती घेतलेली शस्त्र हे शौर्याचं लक्षण होतं पण आत्ता ह्या काहींनी घेतलेली शस्त्रे हे शौर्याच नाही तर क्रौर्याच लक्षण आहे… अश्या वृत्तींना आळा घालणे आपल्याच हातात आहे… बाकी आपला समाज सुज्ञ सुशिक्षित आणि सुसंस्कृत आहे… शेवटी कॉ. पानसरे ह्यांना विनम्र आदरांजली…
जय महाराष्ट्र…
प्रथमेश तेंडूलकर
महाराष्ट्र वेगाने बदलत आहे पण तो बदल सकारात्मक नाही हे दुःखद आहे.
ReplyDeletetrue.. but samaj prabodhan marfat ase prakar kami hou shaktat.. :)
Delete